शहरं
Join us  
Trending Stories
1
Thane Video: पतीला मारहाण करत शिवीगाळ, मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात; ठाण्यातील घटना
2
संतापजनक! प्रेमानंद महाराजांची भेट करुन देण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये महिलेवर अत्याचार, मथुरा येथे आरोपीला अटक
3
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर
4
Viral Video: तिकीट न काढता मेट्रोतून प्रवास करण्याचा जुगाड, व्हिडीओ पाहून डोक्याला माराल हात!
5
IND vs WI 2nd Test Day 3 Stumps : फॉलोऑनची नामुष्की ओढावल्यावर या दोघांची बॅट तळपली, अन्...
6
IND vs WI: यशस्वी जयस्वालवर चेंडू फेकणं जेडेन सील्सला महागात पडलं; आयसीसीनं ठोठावला 'इतका' दंड!
7
चाबहार बंदर, वाघा बॉर्डर आणि..; भारत-अफगाणिस्तानात 'या' मुद्द्यांवर चर्चा, मुत्ताकी यांची माहिती
8
अफगाणिस्तानच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार; तालिबान सरकारने ISIS बद्दल काय सांगितलं?
9
संतापजनक! बहिणीला भेटायला चाललेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर रस्त्यातच सामूहिक बलात्कार
10
AI नाही, भारतीयांच्या टॅलेंटची कमाल! या तरुणाच्या क्रिएटिव्हिटीने लावले सर्वांना वेड; व्हिडीओ एकदा बघा
11
'मुलींनी रात्री बाहेर पडू नये', दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरणावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त वक्तव्य
12
घरात घुसली ८ फूट लांब आणि ८० किलोंची मगर; पठ्ठ्याने एकट्यानेच नेली उचलून
13
धक्कादायक! कपडे उतरवून पोलिसांनी हैवानासारखं मारलं, धमन्या फुटल्या; तरुणाचा मृत्यू
14
'वनडे क्वीन' स्मृतीनं रचला नवा इतिहास; ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन विरुद्ध साधला मोठा डाव
15
“कोकणाच्या भूमीतील या न्याय मंदिरातून स्थानिकांना जलद गतीने न्याय मिळेल”: एकनाथ शिंदे
16
‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम
17
गृह कर्जाचा हप्ता भरणं जड जातंय? ईएमआय कमी करण्यासाठी 'या' ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा आणि मोठी बचत करा!
18
“दादा भुसेंचे ट्रम्प यांच्याशी घनिष्ट संबंध असतील, पालकमंत्रीपद...”; गिरीश महाजनांचा टोला
19
अर्धा संघ तंबूत धाडत कुलदीप यादवनं रचला इतिहास; दिल्लीच्या मैदानात मारला विश्वविक्रमी 'पंजा'
20
तुम्हालाही मस्त नेलपेंट लावायला आवडते? ठरेल जीवघेणं, वाढू शकतो स्किन कॅन्सरचा धोका

सत्कर्माची फुलझाडे

By admin | Updated: June 8, 2016 04:12 IST

शुद्ध हवा नाही़, पाणी नाही़ निसर्गाचे संतुलन बिघडत चालले आहे़ माणूस श्रीमंत होताना निसर्ग मात्र कंगाल होतो आहे़

शुद्ध हवा नाही़, पाणी नाही़ निसर्गाचे संतुलन बिघडत चालले आहे़ माणूस श्रीमंत होताना निसर्ग मात्र कंगाल होतो आहे़ जंगलतोड करू नका, पाणी अडवा-पाणी जिरवा यासारख्या घोषणा नित्याच्याच झाल्या आहेत़ आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या ‘आकासिया’ नावाच्या वृक्षाची रोपे सर्वत्र लावली गेली़ कोणीतरी शोध लावला, आकासियाच्या लागवडीला विरोध केला़ ‘ही झाडे जमिनीतील पाणी मोठ्या प्रमाणावर शोषून घेतात़ पक्षी या झाडावर असत नाहीत़ झाडाला ना फुले येतात ना फळे. गर्द सावली सुद्धा पडत नाही़ ही झाडे विषारी आहेत़ बापरे! आपण काय करत चाललो आहोत याचे भान तरी उरले आहे का?’ ‘हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट सांग गो चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट़’खंडाळ्याच्या घाटाने हिरवाई केव्हाच गमावली आहे़ पर्यावरणाचे पुस्तकी शिक्षण किती मदत करेल, ही शंकाच आहे़ कचरा विल्हेवाट या विषयावर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विद्वान चर्चासत्रे घेत आहेत, परिषदांचे आयोजन देशोदेशी होत आहे़ परिस्थिती मात्र जैसे थे नव्हे, तर वरचेवर बिघडतच चालली आहे़ बदलणाऱ्या सृष्टीचक्रापुढे मनुष्यप्राणी हतबल झाला आहे़ माणसाची सोयरी समजली जाणारी वृक्षवल्ली दुर्मिळ झाल्यावर पक्षी सुस्वर आळवणार कोठून? ज्या अर्थी प्रश्न आहे त्या अर्थी त्याचे उत्तर आहे़ कुलूप आहे तर किल्ली असणारच़ किल्लीशिवाय कुलूप अजून तरी जन्मा आले नाही़ मनात आले म्हणजे केव्हातरी संतकवी श्रीदासगणु महाराज विरचित ‘गजानन विजय’ ग्रंथाचे पारायण करतो़ तेवढेच बरे वाटते़ अध्याय पाच ओवी क्रमांक १४५ने माझे लक्ष वेधून घेतले़‘सत्कर्माची फुलझाडे लावीन मी जिकडे तिकडे’पर्यावरणाचे उत्तर सापडले़ केवळ झाडे लावून काम होणार नाही तर मनुष्याने सत्कर्माची झाडे जिकडे तिकडे लावली पाहिजेत़ माणसाने आयुष्यभर सत्कर्म करावयाचे ठरविले तर पर्यावरणाचा प्रश्र्न चुटकीसरशी सुटून जाईल़ प्रत्येकाने आपले घर स्वच्छ ठेवले आणि कचऱ्याची विल्हेवाट लावली तर गल्लीत कचरा होणार कोठून? अंगणात तुळस आणि दारातील पारिजात जगवला तऱ़ प्रश्न जर तरचा़ मला सांगावेसे वाटते; पण करावे मात्र दुसऱ्याने हे कसे चालेल?एकमेका साह्य करूअवघे धरू सुपंथहा तुकोबांचा वसा आणि वारसा महाराष्ट्राने जपला तर त्रैलोक्य आश्चर्यचकित होईल़ ‘पेरा पेरा पेरते व्हा’ ही एक बाजू ‘निगराणी करा’ दुसरी बाजू़ चला तर, आजपासून आपण सत्कर्मासाठी प्रतिज्ञाबद्ध होऊ या!-डॉ.गोविंद काळे