शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

सरणकळा आणिमरणकळा

By admin | Updated: January 21, 2016 03:04 IST

‘माझ्या मौतीला या’ असे बिनदिक्कत आवतन देणारा माणूस खरोखर आत्महत्त्या करणार यावर कोणीही विश्वास ठेवत नाही, तर अशा गोष्टी हसण्यावारी आपण नेत असतो.

‘माझ्या मौतीला या’ असे बिनदिक्कत आवतन देणारा माणूस खरोखर आत्महत्त्या करणार यावर कोणीही विश्वास ठेवत नाही, तर अशा गोष्टी हसण्यावारी आपण नेत असतो. त्याकडे गांभीर्याने पाहत नाही. जालना जिल्ह्यातील खरपुडीच्या शेषराव सखाराम शेजूळ या शेतकऱ्याने गुरुवारी गावात असे आमंत्रण दिले, त्यावेळी तो असे काही खरोखरच करणार याचा विचारही गावकऱ्यांच्या मनात आला नव्हता; पण गुरुवारी पहाटे अंगणातील लिंबाच्या झाडावर गळफास घेऊन लटकणारा त्याचा मृतदेह पाहून अनेकांच्या काळजाचा ठाव चुकला. टोकाचे पाऊल उचलणारा शेषराव हा मराठवाड्यातील काही पहिलाच शेतकरी नाही. वर्षभरात ३२२८ शेतकऱ्यांनी सरणाची ही वाट निवडली आहे; पण वेगळेपण हेच की शेषरावने त्याचा निर्धार जाहीरपणे बोलून दाखविला. परिस्थितीने गांजून तो निराश झाला होता. कातळावर डोके आपटून कपाळमोक्षच होतो याची त्याला पूर्ण कल्पना होती. परिस्थितीच्या या रेट्यातून उभे राहूच शकत नाही याची जेव्हा खात्री पटली तेव्हा त्याने हा निर्णय घेतला. आपल्या मरणाचे आमंत्रण देऊन जीवनयात्रा संपविणारी ही घटना मन विषण्ण करणारी आहे.नव्या वर्षाच्या पहिल्या पंधरवड्यातील ही मराठवाड्यातील सहावी आत्महत्त्या होती. २०१६ हे वर्ष आणखी किती शेषरावांचा घास घेणार हा खरा प्रश्न आहे, तो यासाठी की, अशा अनेक शेषरावांना जगण्याची उमेद वाटेल असे काही घडण्याची सूतराम आशा नाही. खरे तर खरपुडी हे गाव अगदी जालना शहराच्या वळचणीला. विशेष म्हणजे या गावातच देशात नावाजलेले कृषी विज्ञान केंद्र आहे. असे असताना ही घटना घडते. महाराष्ट्रात २००१ पासून पंधरा वर्षांत २०५०४ शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या. सरकार आत्महत्त्याग्रस्त कुटुंबाला मदत करते; पण वर्षभरात झालेल्या ३२२८ पैकी केवळ १८४१ कुटुंबेच फक्त अशा सरकारी मदतीला पात्र ठरली आहेत. त्यापैकी ९०३ अपात्र ठरली, तर ४८४ प्रकरणे चौकशीसाठी आहेत. सरकारने आत्महत्त्या रोखण्यासाठी दिलेले पॅकेज म्हणजे केवळ मलमपट्टी आहे. पॅकेजऐवजी शेतकरी शेतीत कसा उभा राहील अशा सर्वंकष कृषी धोरणाचीच गरज आहे. यावर्षी महाराष्ट्राच्या बहुसंख्य भागात दुष्काळ आहे आणि या दुष्काळ निवारणासाठी १९००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी वीजबिलात साडेपस्तीस टक्के सवलत, विद्यार्थ्यांना फी माफी, शेतसाऱ्यात सवलत, शेतकऱ्यांना विशेष अपघात योजना, प्रत्येक जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, मका खरेदी केंद्र चालू करणे अशा घोषणा केल्या. वीजबिल सवलती किंवा शेतसारा वसुलीत सवलत या योजना फसव्या आहेत. विहिरीत पाणीच नाही तर बिल येणार कोठून? किंवा महाराष्ट्रात ८५ टक्के शेतकरी हे अल्पभूधारक आहेत त्यांना शेतसारा माफ आहे. दुष्काळाने पिचलेले शेतकरीही अल्पभूधारक आहेत. कोरडवाहू शेतकरी आहेत. अशांना वीजबिल माफी, शेतसारा माफीचा काय लाभ? वर्षानुवर्षे त्याच त्या घोषणा करीत राहायच्या म्हणजे शेतकऱ्यांना आपण काही तरी दिले असा आविर्भाव आणायचा ही सत्ताधाऱ्यांची मनोवृत्ती असते. भलेही सत्तेत कोणीही असो. शेतकऱ्यांसमोर सध्या दोन प्रश्न आहेत आणि तेच आत्महत्त्यांचे मूळ कारण. नैसर्गिक आपत्तीमुळे तो हैराण झाला आणि त्याच्यासाठी शेती जुगारासारखी बेभरवशाची झाली आहे. दुसरी समस्या आहे शेतमालाला मिळणाऱ्या बाजारभावाची. आज कोणतेही पीक किमान नफा देणारे आणि शेतकऱ्यांची उभारी वाढविणारे नाहीत. शिवाय बाजारभावावर नियंत्रण करण्यासाठी सरकार बाजारात हस्तक्षेप करीत नाही. यामुळे सरकारने कितीही मलमपट्टी केली तरी मूळ समस्या तशीच राहणार. २००७ साली केंद्र सरकारने सरसकट कर्जमाफी दिली होती. त्यानंतर पुढची तीन वर्षे आत्महत्त्यांच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली होती. याचाही विचार केला जावा, नसता शेतकऱ्यांच्या नशिबी चिकटलेला सरणकळा आणि मरणकळांचा भोग सुटणार नाही.- सुधीर महाजन