शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही; मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
2
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
3
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
4
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
5
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
6
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
7
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
8
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
9
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
10
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
11
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
12
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
13
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
14
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
15
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
16
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
17
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
18
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
19
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

अखेर नमावे लागले!

By admin | Updated: October 5, 2016 03:53 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या तंबीसमोर अखेर कर्नाटक सरकारला नमावेच लागले आहे. कावेरीतील पाणी सोडा असा स्पष्ट आदेश न्यायालयाने देऊनही कर्नाटक राज्य त्यास तयार होत नव्हते

सर्वोच्च न्यायालयाच्या तंबीसमोर अखेर कर्नाटक सरकारला नमावेच लागले आहे. कावेरीतील पाणी सोडा असा स्पष्ट आदेश न्यायालयाने देऊनही कर्नाटक राज्य त्यास तयार होत नव्हते. उलट त्या राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन पाचारण केले. फक्त पिण्यापुरते पाणी सोडू येथपासून तो राज्य सरकारला सर्वाधिकार बहाल करेपर्यंत काही ठराव अधिवेशनात संमत केले गेले. पण आपल्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याबाबत राज्य सरकार टंगळमंगळ करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याचे गंभीर परिणाम होतील अशीे तंबी जेव्हां न्यायालयाने दिली तेव्हां कुठे पाणी सोडण्याचा ठराव विधिमंडळाने संमत केला आणि कावेरीतून ६८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग केला गेला. एक आॅक्टोबरपासून सलग सहा दिवस रोजी ६००० क्युसेक पाणी सोडण्याचे न्यायालयाचे जे मूळ आदेश होते, त्यांचे पालन करण्याचे अभवचनही आता कर्नाटक सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिले आहे. देशातील अनेक राज्या-राज्यांमध्ये आणि काही राज्यांतर्गतदेखील पाण्याचे वाटप हा संघर्षाचा विषय बनला आहे. सबब कर्नाटक आणि तामिळनाडू सरकारमधील कावेरी नदीच्या पाण्याच्या वाटपाचा प्रश्न आजचा नाही आणि नवाही नाही. कर्नाटकातून दक्षिणेकडे वाहत जाणाऱ्या कावेरी नदीच्या पाण्यावर तामिळनाडूची तहान आणि शेती दोन्ही अवलंबून आहेत. पण कर्नाटक जोवर पाणी सोडीत नाही तोवर या दोन्ही बाबी साध्य होत नाहीत व कर्नाटक तसे करण्यास यंदाच नव्हे तर कधीच सहसा राजी असत नाही. याआधी एस.एम.कृष्णा मुख्यमंत्री असताना त्यांनीदेखील तामिळनाडूला ९००० क्युसेक पाणी सोडण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशास झुगारुन लावले होते. त्यापायी त्यांच्यावर न्यायालयाने कारवाईदेखील सुरु केली होती. पण आजदेखील ही कारवाई प्रलंबितच आहे. पाण्याच्या वाटपासंबंधी राज्या-राज्यांमध्ये जे तंटे होतात, त्यात केन्द्र सरकारने मध्यस्थी करावी अशी इच्छा नेहमीच व्यक्त केली जाते. पण सहसा केन्द्र अशा वादात पडत नाही. त्यातून एकदा कोणताही वाद जेव्हां न्यायप्रविष्ट होतो तेव्हां इतर कोणालाही त्यात हस्तक्षेप करण्याची मुभा नसते. पण तरीही तामिळनाडूतील समस्त राजकीय पक्षांनी या वादात केवळ मोदी सरकारच नव्हे, तर काँग्रेस पक्षालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. कर्नाटक विधानसभेच्या दोन वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीकडे या दोन्ही पक्षांचे लक्ष आहे आणि म्हणूनच ते कर्नाटकी जनतेच्या विरोधात जायला तयार नाहीत असा आरोप द्रमुकपासून अण्णा द्रमुकर्यंत सर्वांनीच केला आहे.