शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अखेर निर्यात मुक्त

By admin | Updated: December 26, 2015 02:10 IST

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीला मान देऊन अखेर केन्द्र सरकारने या उत्पादनाच्या निर्यातीसाठी असलेली किमान निर्यात दराची अट रद्द करुन टाकल्याने तिचे वर्णन या

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीला मान देऊन अखेर केन्द्र सरकारने या उत्पादनाच्या निर्यातीसाठी असलेली किमान निर्यात दराची अट रद्द करुन टाकल्याने तिचे वर्णन या शेतकऱ्यांच्या नेत्यांनी सरकारला उशीरा सुचलेले शहाणपण असे केले आहे. पण उशिरा का होईना शहाणपण सुचले हे काही कमी नाही. निर्यात खुली झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या साऱ्या समस्या आता दूर झाल्या असे म्हणता येईलच असेही नाही. दरवर्षीप्रमाणेच विलंबित खरिपाच्या कांद्याने मागणीच्या तुलनेत कितीतरी अधिक प्रमाणात उत्पादन तयार केल्याने जी समस्या निर्माण झाली तिच्यावर तोडगा काढताना सरकारने आधी निर्यातीचा दर कमी केला व आता तो शून्यावर आणून ठेवला. याचा अर्थ निर्यातीचा मार्ग मोकळा झाल्याने जास्तीचे सारे उत्पादन विदेशी बाजारात विकले जाईल असे नाही. त्याची दोन कारणे. पावसाळ्यापूर्वी किरकोळ बाजारात कांद्याच्या दरानी जो उच्चांक केला तो पाहून सरासरीच्या तिपटीने शेतकऱ्यांनी कांदा लावला. म्हणजे यंदाचे संकटही सरासरीच्या तुलनेत खूप अधिक आहे. विदेशी म्हणजेच आखाती बाजारपेठेत भारतीय कांद्याची स्पर्धा प्रामुख्याने चिनी कांद्याशी आहे. चीन हा जगातील सर्वाधिक कांदा पिकविणारा देश. गेल्या मार्च महिन्यात तिथे इतका कांदा पिकला की त्याची काढणीही महाग झाल्याने शेतकऱ्यांनी ‘फ्री फॉर आॅल’ धोरणाचा स्वीकार केला. म्हणजे या आणि कांदा उपटून फुकट घेऊन जा. याचा अर्थ जागतिक बाजारपेठेतही दर मिळण्याची मारामार टळत नाही. तसेही भारतीय कांद्याच्या निर्यातीचे प्रमाण एकूण उत्पादनाच्या बारा ते पंधरा टक्क््यांचा आतच राहिलेले आहे. हे झाले विलंबित खरिपाचे. पण रब्बी वा उन्हाळ कांद्याची लावणीदेखील सरासरीच्या तिपटीने झाली आहे व त्यासाठी ऊसाचे क्षेत्र काही प्रमाणात कमी झाले आहे. ऊस कमी होणे केव्हांही चांगलेच, पण कांदा तिपटीने वाढल्याने आगामी मोसमात टिकाऊ समजला जाणारा उन्हाळ कांदाही विक्रमी उत्पादनाची समस्या निर्माण करील अशी शक्यता आहे. किमान निर्यात दर कमी वा रद्द करणे हा मानसोपचार तर आता करुन झाला आहे. मग पुढचा उपाय म्हणजे सरकारने बाजार हस्तक्षेप योजना सुरु करण्याची मागणी. ती जोवर मंजूर होत नाही तोवर मंत्र्यांच्या मोटारींवर कांदाफेक!