शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

अखेर निर्यात मुक्त

By admin | Updated: December 26, 2015 02:10 IST

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीला मान देऊन अखेर केन्द्र सरकारने या उत्पादनाच्या निर्यातीसाठी असलेली किमान निर्यात दराची अट रद्द करुन टाकल्याने तिचे वर्णन या

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीला मान देऊन अखेर केन्द्र सरकारने या उत्पादनाच्या निर्यातीसाठी असलेली किमान निर्यात दराची अट रद्द करुन टाकल्याने तिचे वर्णन या शेतकऱ्यांच्या नेत्यांनी सरकारला उशीरा सुचलेले शहाणपण असे केले आहे. पण उशिरा का होईना शहाणपण सुचले हे काही कमी नाही. निर्यात खुली झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या साऱ्या समस्या आता दूर झाल्या असे म्हणता येईलच असेही नाही. दरवर्षीप्रमाणेच विलंबित खरिपाच्या कांद्याने मागणीच्या तुलनेत कितीतरी अधिक प्रमाणात उत्पादन तयार केल्याने जी समस्या निर्माण झाली तिच्यावर तोडगा काढताना सरकारने आधी निर्यातीचा दर कमी केला व आता तो शून्यावर आणून ठेवला. याचा अर्थ निर्यातीचा मार्ग मोकळा झाल्याने जास्तीचे सारे उत्पादन विदेशी बाजारात विकले जाईल असे नाही. त्याची दोन कारणे. पावसाळ्यापूर्वी किरकोळ बाजारात कांद्याच्या दरानी जो उच्चांक केला तो पाहून सरासरीच्या तिपटीने शेतकऱ्यांनी कांदा लावला. म्हणजे यंदाचे संकटही सरासरीच्या तुलनेत खूप अधिक आहे. विदेशी म्हणजेच आखाती बाजारपेठेत भारतीय कांद्याची स्पर्धा प्रामुख्याने चिनी कांद्याशी आहे. चीन हा जगातील सर्वाधिक कांदा पिकविणारा देश. गेल्या मार्च महिन्यात तिथे इतका कांदा पिकला की त्याची काढणीही महाग झाल्याने शेतकऱ्यांनी ‘फ्री फॉर आॅल’ धोरणाचा स्वीकार केला. म्हणजे या आणि कांदा उपटून फुकट घेऊन जा. याचा अर्थ जागतिक बाजारपेठेतही दर मिळण्याची मारामार टळत नाही. तसेही भारतीय कांद्याच्या निर्यातीचे प्रमाण एकूण उत्पादनाच्या बारा ते पंधरा टक्क््यांचा आतच राहिलेले आहे. हे झाले विलंबित खरिपाचे. पण रब्बी वा उन्हाळ कांद्याची लावणीदेखील सरासरीच्या तिपटीने झाली आहे व त्यासाठी ऊसाचे क्षेत्र काही प्रमाणात कमी झाले आहे. ऊस कमी होणे केव्हांही चांगलेच, पण कांदा तिपटीने वाढल्याने आगामी मोसमात टिकाऊ समजला जाणारा उन्हाळ कांदाही विक्रमी उत्पादनाची समस्या निर्माण करील अशी शक्यता आहे. किमान निर्यात दर कमी वा रद्द करणे हा मानसोपचार तर आता करुन झाला आहे. मग पुढचा उपाय म्हणजे सरकारने बाजार हस्तक्षेप योजना सुरु करण्याची मागणी. ती जोवर मंजूर होत नाही तोवर मंत्र्यांच्या मोटारींवर कांदाफेक!