शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

अखेर निर्यात मुक्त

By admin | Updated: December 26, 2015 02:10 IST

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीला मान देऊन अखेर केन्द्र सरकारने या उत्पादनाच्या निर्यातीसाठी असलेली किमान निर्यात दराची अट रद्द करुन टाकल्याने तिचे वर्णन या

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीला मान देऊन अखेर केन्द्र सरकारने या उत्पादनाच्या निर्यातीसाठी असलेली किमान निर्यात दराची अट रद्द करुन टाकल्याने तिचे वर्णन या शेतकऱ्यांच्या नेत्यांनी सरकारला उशीरा सुचलेले शहाणपण असे केले आहे. पण उशिरा का होईना शहाणपण सुचले हे काही कमी नाही. निर्यात खुली झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या साऱ्या समस्या आता दूर झाल्या असे म्हणता येईलच असेही नाही. दरवर्षीप्रमाणेच विलंबित खरिपाच्या कांद्याने मागणीच्या तुलनेत कितीतरी अधिक प्रमाणात उत्पादन तयार केल्याने जी समस्या निर्माण झाली तिच्यावर तोडगा काढताना सरकारने आधी निर्यातीचा दर कमी केला व आता तो शून्यावर आणून ठेवला. याचा अर्थ निर्यातीचा मार्ग मोकळा झाल्याने जास्तीचे सारे उत्पादन विदेशी बाजारात विकले जाईल असे नाही. त्याची दोन कारणे. पावसाळ्यापूर्वी किरकोळ बाजारात कांद्याच्या दरानी जो उच्चांक केला तो पाहून सरासरीच्या तिपटीने शेतकऱ्यांनी कांदा लावला. म्हणजे यंदाचे संकटही सरासरीच्या तुलनेत खूप अधिक आहे. विदेशी म्हणजेच आखाती बाजारपेठेत भारतीय कांद्याची स्पर्धा प्रामुख्याने चिनी कांद्याशी आहे. चीन हा जगातील सर्वाधिक कांदा पिकविणारा देश. गेल्या मार्च महिन्यात तिथे इतका कांदा पिकला की त्याची काढणीही महाग झाल्याने शेतकऱ्यांनी ‘फ्री फॉर आॅल’ धोरणाचा स्वीकार केला. म्हणजे या आणि कांदा उपटून फुकट घेऊन जा. याचा अर्थ जागतिक बाजारपेठेतही दर मिळण्याची मारामार टळत नाही. तसेही भारतीय कांद्याच्या निर्यातीचे प्रमाण एकूण उत्पादनाच्या बारा ते पंधरा टक्क््यांचा आतच राहिलेले आहे. हे झाले विलंबित खरिपाचे. पण रब्बी वा उन्हाळ कांद्याची लावणीदेखील सरासरीच्या तिपटीने झाली आहे व त्यासाठी ऊसाचे क्षेत्र काही प्रमाणात कमी झाले आहे. ऊस कमी होणे केव्हांही चांगलेच, पण कांदा तिपटीने वाढल्याने आगामी मोसमात टिकाऊ समजला जाणारा उन्हाळ कांदाही विक्रमी उत्पादनाची समस्या निर्माण करील अशी शक्यता आहे. किमान निर्यात दर कमी वा रद्द करणे हा मानसोपचार तर आता करुन झाला आहे. मग पुढचा उपाय म्हणजे सरकारने बाजार हस्तक्षेप योजना सुरु करण्याची मागणी. ती जोवर मंजूर होत नाही तोवर मंत्र्यांच्या मोटारींवर कांदाफेक!