शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

आपस में लढो और दोनो बढो

By admin | Updated: June 13, 2016 06:55 IST

भाजप-शिवसेनेची एकमेकांवर दरक्षणी आगपाखड सुरू असली तरी सत्तेमध्ये मात्र 'नांदा सौख्य भरे' अन् 'पसंत आहे मुलगी' सुरू आहे.

भाजप-शिवसेनेची एकमेकांवर दरक्षणी आगपाखड सुरू असली तरी सत्तेमध्ये मात्र 'नांदा सौख्य भरे' अन् 'पसंत आहे मुलगी' सुरू आहे. एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिक पॉवरफुल झाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राज्यातील सरकार पाडण्याची फार घाई झालेली दिसते. 'मी पोराबाळांबाबत बोलत नसतो, अशी उद्धव ठाकरेंची हेटाळणी त्यांनी काही वर्षांपूर्वी केली होती. आता त्याच उद्धवना ते, 'नालायकांबरोबर सत्तेत का राहता' अशी सवालवजा साद घालत सरकारमधून बाहेर पडण्याचे आवाहन करीत आहेत. आपल्या ताकदीवर सरकार पडत नाही याची पूर्ण कल्पना पवारांना आहे आणि म्हणून ते पोराबाळांची दखल घेऊ लागले आहेत. सरकारविरुद्ध वातावरण पेटविण्याची विरोधी पक्षांमध्ये ताकद नाही. काँग्रेसला तर हुडहुडी भरली आहे. भाजप-शिवसेनेचे 'आपस में लढ.ो, दोनो बढ.ो' या फॉर्म्युल्यावर 'नांदा सौख्य भरे' सुरू आहे. फडणवीस सरकारला विरोधकांपासून धोका नाही. त्यांचा 'आपलाच वाद आपणाशी' सुरू आहे. सत्तापक्षाबरोबरच विरोधी पक्षाचीही 'स्पेस' ही सत्तापक्षांनीच घेतली आहे. १५ वर्षांच्या उपवासानंतर मिळालेली सत्ता भांडणापायी घालविण्याचा असमंजसपणा दाखविला जाईल, असे वाटत नाही. अशावेळी सरकार पडण्याचे स्वप्न पाहण्यापेक्षा राष्ट्रवादीने कधीही जेलमध्ये जाणार नाहीत अशा विश्‍वासार्ह नेत्यांची फळी निर्माण करण्याची आवश्यकता आहे.पूर्वी विरोधी पक्ष हे सत्तापक्षावर आरोपांचे बॉम्ब टाकत आणि माध्यमे त्याला फॉलो करीत असत. गेल्या काही महिन्यांमध्ये माध्यमांनी उचललेल्या मुद्यांवर विरोधी पक्ष पत्रपरिषदा घेत असल्याचे माध्यमअवलंबी चित्र दिसत आहे. मेक इन इंडिया, पायाभूत सुविधा प्रकल्प, स्टार्ट अप इंडिया, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, जलयुक्त शिवारसह या सरकारच्या ड्रीम प्रोजेक्टमधील कामगिरीचा अभ्यास करून धोरणात्मक मुद्यांवर सरकारला अडचणीत आणण्याची कोणतीही सूत्रबद्ध तयारी काँग्रेस वा राष्ट्रवादी काँग्रेस करताना दिसत नाही. अभ्यास न करता उथळ शेरे मारणे सोशल मीडियाबाबत झाले तर ते समजता येऊ शकते. जबाबदार विरोधी पक्षांनी तसेच वागावे हे अपेक्षित नाही. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात पीए, पीएस कुठून आले, कोणाला किती पगार आहे, कोण कुठे राहतो, असे विषय विरोधी पक्षांचा मुख्य अजेंडा बनणार असतील तर त्यांची कीवच केलेली बरी. मुख्यमंत्र्यांची कोंडी करायची तर त्यांच्याइतकाच किंवा जास्त प्रत्येक विषयाचा अभ्यास करणारे लोक समोर आणावे लागतील. विरोधी पक्षांनी त्यासाठी श्ॉडो कॅबिनेट तयार केले, तर राज्यातील प्रश्नांकडे ते गांभीर्याने पाहतात याची खात्री होईल. विशेषत: एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मांड अधिक पक्की झाली आहे. मुख्यमंत्र्यांना एकेरीत बोलावू शकणारा मंत्री आता राज्यात नाही. गडबड करणार्‍या मंत्र्यांनी, 'पुढच्याला ठेच मागचा शहाणा' या न्यायाने स्वत:ला बदलून घ्यावे, असा सुस्पष्ट इशारा भाजप नेतृत्वाने या निमित्ताने दिला आहे. भाजपच्या राज्यातील मंत्र्यांमध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा एक शब्द सर्वांच्या मनात पक्का ठसला आहे. 'निर्दयता से निर्णय लेने पडे.ंगे' हा शहा यांचा संदेश असतो. खडसेंची ज्येष्ठता आदी लक्षात घेऊन मंत्रिमंडळातून त्यांची गच्छंती होण्याबाबत मुख्यमंत्री मागे-पुढे पाहत होते. तेव्हाही शहा यांनी निर्दयतावालाच संदेश दिला म्हणतात. शहांचा हा पवित्रा लक्षात घेता कठोर निर्णयांची मुभाच त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याचे स्पष्ट होते. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी ७५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे नेते मंत्री होणार नाहीत, असे ठरविले होते. फडणवीस यांनी तसे जाहीर न करता हे वय आणखी कमी केलेले दिसते. मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारातदेखील त्याचे प्रतिबिंब दिसेल. शहा सांगतात त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी निर्दयीपणा दाखविला, तर अनेकांना धक्का बसेल. जाता जाता : मुख्यमंत्र्यांचा सही-शेरा असलेली गोपनीय कागदे कंत्राटदार मंडळी गावभर फिरवत आहेत. त्यातून अधिकार्‍यांवर दबाव आणत आहेत. असे कंत्राटदार कोण हे मुख्यमंत्री कार्यालयाने शोधले पाहिजे. मुख्यमंत्री व गिरीश महाजन, राम शिंदे हे मंत्री बसलेले असून, डीजी प्रवीण दीक्षित उभे राहून त्यांच्याशी बोलत असल्याचा फोटो सोशल मीडियावर फिरतोय. प्रश्न हा आहे की, हा फोटो काढणारा कोण होता? अधिकार्‍यांच्या बदल्यांचे कंत्राट घेऊन फिरणार्‍या राजेंद्रसिंह नावाच्या एका माणसाचा बंदोबस्तही करा. -यदू जोशी मुंबई