शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
4
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
5
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
6
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
7
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
8
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
9
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
10
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
11
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
12
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
13
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
14
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
15
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
16
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
17
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
18
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
19
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
20
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य

सीमावासीयांचा लढा एकसंघच होऊ शकतो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:22 IST

गेल्या दोन-तीन निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समिती एकच उमेदवार देण्यात अपयशी ठरू लागली आहे. बंडखोरीमुळे होणारी मराठी मतदारांची विभागणी त्याला कारणीभूत ठरत आहे.

- वसंत भोसलेगेल्या दोन-तीन निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समिती एकच उमेदवार देण्यात अपयशी ठरू लागली आहे. बंडखोरीमुळे होणारी मराठी मतदारांची विभागणी त्याला कारणीभूत ठरत आहे. यावेळी हे टाळायचे असेल तर अंतर्गत राजकारण बाजूला ठेवून एकसंघपणे लढण्याची तयारी समितीने करायला हवी आहे. कर्नाटक विधानसभेची निवडणूक जाहीर झाली की, सीमावासीय मराठी भाषिक मतदारांमध्ये उत्साह संचारत असतो. विशेषत: बेळगाव आणि खानापूर या अस्सल मराठी भाषिक पट्ट्यात या उत्साहाबरोबर उमेदवार निवडीवरून मतदारांमध्ये चिंताही असते. कारण गेल्या दोन-तीन निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समिती एकच उमेदवार देण्यात अपयशी ठरू लागली आहे. परिणामी बंडखोरीमुळे मराठी मतदारांमध्ये विभागणी होऊन भारतीय जनता पक्ष किंवा काँग्रेसचा लाभ होत आहे. गेल्या निवडणुकीत दोन मतदारसंघांत एकसंघपणा दाखविताच विजय मिळाला आणि इतर दोन मतदारसंघांत केवळ मराठी भाषिकांच्या मतविभागणीमुळे पराभव झाला. पुढील आठवड्यात प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मात्र, अद्याप उमेदवार निश्चित झालेले नाहीत. महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि प्रा. एन. डी. पाटील यांनीच उमेदवार निश्चित करावेत, असाही एक प्रस्ताव पुढे आला आहे.मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर होणारी ही तिसरी निवडणूक आहे. २००८ मध्ये झालेल्या निवडणुकीत या रचनेमुळे महाराष्ट्र एकीकरण समितीचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. साठ वर्षांच्या मराठी भाषिकांच्या लढाईत प्रथमच असे घडले होते. त्याची खंत मराठी भाषिक मतदारांत होती. त्यात थोडी सुधारणा झाली आणि बेळगाव दक्षिण मतदारसंघ आणि खानापूर मतदारसंघातून एकीकरण समितीचे उमेदवार निवडून आले. मावळत्या सभागृहात दोनच आमदार आहेत. बेळगाव जिल्ह्यात एकूण अठरा मतदारसंघ आहेत. त्यापैकी बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण, खानापूर आणि निपाणी या पाच मतदारसंघांत मराठी भाषिक मतदारांचे वर्चस्व आहे. त्यापैकी निपाणी विधानसभा मतदारसंघात मराठी भाषिकांनी लढाई सोडूनच दिली आहे. १९८३ नंतर या मतदारसंघातून मराठी एकीकरण समितीचा उमेदवार विजयी झालेला नाही. मात्र काँग्रेस, जनता दल किंवा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आला तरी तो मराठीच असतो. तसेच तो सीमावासीयांच्या लढाईतही अग्रेसर राहतो. त्यामुळे एकीकरण समितीसह सर्वच पक्षांचे उमेदवार सीमावासीयांच्या बाजूने आहेत.बेळगाव शहर आणि ग्रामीण भागातील तिन्ही मतदारसंघांत एकीकरण समितीने एकच उमेदवार दिला आणि बंडखोरी झाली नाही, तर सहज विजय मिळू शकतो. गेल्या निवडणुकीत (२०१३) बेळगाव ग्रामीण मतदारसंघात समितीच्या दोन उमेदवारांमुळे भाजपला काठावर विजय मिळाला. बेळगाव दक्षिणमध्ये समितीचा एकमेव उमेदवार असल्याने विद्यमान भाजपच्या आमदारांचा पराभव करता आला. बेळगाव उत्तर मतदारसंघात कानडी आणि उर्दू भाषिक जातीय समीकरणामुळे एकत्र आले आहेत. परिणामी मराठी भाषिकांचे वर्चस्व असूनही गेल्या चार निवडणुकीत समितीला पराभव स्वीकारावा लागत आहे. खानापूर हा मराठी भाषिकांचा बालेकिल्ला आहे. एकच उमेदवार दिल्यास सर्व राष्ट्रीय पक्षांचा पराभव करणे सहज शक्य आहे.मराठी भाषिकांचा लढा तीव्र करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निवडून यावेत, अशी तीव्र भावना मराठी मतदारांमध्ये असते. मात्र, समितीच्या अंतर्गत राजकारणामुळे वारंवार होणाऱ्या पराभवामुळे मतदारांचा उत्साहही निवळू लागला आहे. या निवडणुकीत चारही मतदारसंघांत मराठी भाषिकांचा लढा निर्णायकी होऊ शकतो. त्यासाठी एकसंघ लढाई लढण्याची तयारी करायला हवी आहे. याउलट भाजप, काँग्रेस आणि जनता दलामध्ये असंतोष आहे. सत्तास्पर्धा आणि गटबाजी आहे. त्याचा लाभ उठवायला हवा आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक