शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

‘कावीळ’ग्रस्त व शिंदेंचा सत्कार

By admin | Updated: July 28, 2016 04:19 IST

क्षेत्र कुठलेही असो, आपल्या गावाची ओळख देशभर निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान भूमिपुत्राचा अभिमान त्या गावातील प्रत्येक माणसाला असतो. याला अपवाद ठरतात ते वैचारिक, सामाजिक

- राजा माने क्षेत्र कुठलेही असो, आपल्या गावाची ओळख देशभर निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान भूमिपुत्राचा अभिमान त्या गावातील प्रत्येक माणसाला असतो. याला अपवाद ठरतात ते वैचारिक, सामाजिक आणि राजकीय ‘कावीळ’ जडलेले मूठभर लोक. सध्या नेमक्या याच काविळीने सोलापूरचे भूमिपुत्र सुशीलकुमार शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त महापालिकेच्या वतीने होणाऱ्या नागरी सत्कार व मानपत्र प्रदान सोहळ्यास खोडा घातला जात आहे.संपूर्ण देशात आपल्या गावाची ओळख निर्माण करून देणाऱ्या भूमिपुत्राचा अमृतमहोत्सवी वाढदिवस हा त्या व्यक्तिमत्त्वाला सलाम करण्याचा आणि त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करण्याचा असावा ही आपली संस्कृती. पण नेहमी संस्कृतीच्या गप्पा मारणारेच या संस्कृतीला विसरले आहेत.महापालिका हे जनतेचे सभागृह मानले जाते. त्याच कारणाने महापालिकेच्या वतीने होणारा सोहळा हा तिथल्या जनतेचा सोहळा असतो. राज्यात सुशीलकुमार शिंदे यांचा अमृतमहोत्सव साजरा व्हावा, अशी भावना घेऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रेम करणारे सर्वच क्षेत्रातील मान्यवर काही महिन्यांपूर्वीपासून कामाला लागले. मुंबई-दिल्लीत मोठा सोहळा व्हावा, असा त्यांचा मानस होता. त्यात प्रातिनिधिक स्वरूपात माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्याकडे पुढाकाराची सूत्रे देण्यात आली. ‘मी आज जो काही आहे ते सोलापुरातील ढोर गल्लीपासून सुरू झालेल्या माझ्या प्रवासातील प्रत्येक वळणावर साथ देणाऱ्या सोलापूरकरांमुळे आहे. त्यामुळे देशातील कुठल्याही सत्कारापेक्षा सोलापूरकरांचे प्रेम मला महत्त्वाचे आहे’, अशी भूमिका सुशीलकुमार शिंदे यांनी घेतली. सोलापूरची महापालिका आज काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. साहजिकच काँग्रेसच्या महापौर सुशीलाताई आबुटे, सभागृह नेते संजय हेमगड्डी, गट नेते पद्माकर काळे, उप महापौर प्रवीण डोंगरे, माजी महापौर यु.एन.बेरिया, यांच्यासह सत्ताधारी नगरसेवकांनी महापालिकेच्या वतीने नागरी सत्कार व्हावा यासाठी पाठपुरावा केला. महापालिकेच्या सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवकांनी तसा एकमताचा ठरावही केला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, सोनिया गांधी यांच्यासह राष्ट्रीय पातळीवरील अनेक नेत्यांचे चार सप्टेंबरच्या कार्यक्रमासाठीचे सोलापूर दौरेही निश्चित झाले. या पार्श्वभूमीवर सोलापुरात भाजपा-सेना यांच्यासह कॉ. आडम मास्तर यांनी कार्यक्रमाच्या खर्चाच्या मुद्यावरून सत्कार सोहळ्याला ब्रेक लावण्याचा प्रयत्न सुरू केला होता. अनाठायी खर्च आणि उधळपट्टी याचे समर्थन कोणीही करणार नाही. परंतु खर्चाचे निमित्त करून नेहमीची राजकीय धुणी धुण्याचा प्रयत्न कुणी करू लागले तर मात्र ते ओंगळवाणे ठरेल. राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, संसदीय काँग्रेस पक्षाचे नेते या उच्च पदांपर्यंत पोहोचणे सोपे आहे काय? त्या पदांपर्यंत सुशीलकुमार शिंदे आपल्या कर्तृत्वाने पोहोचले! एक अजातशत्रू अशी त्यांची प्रतिमा आहे. राष्ट्रीय पातळीवर त्यांनी बजावलेल्या अनेक भूमिकांबद्दल त्यांचा गौरवच केला जातो. अतिरेक्यांना फाशी देण्याच्या निर्णयावेळी केन्द्रीय गृहमंत्री म्हणून त्यांनी दाखविलेला कणखरपणा असो वा देशात पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात दलित-आदिवासींपासून कुडमुड्या जोशींचा अंतर्भाव करताना त्यांनी मुख्यमंत्री म्हणून दाखविलेली सामाजिक कणव असेल, असे अनेक संदर्भ सर्वच क्षेत्रातील लोकांना अभिमानाचे वाटत आले आहेत.विविध क्षेत्रात नाव कमावणारी उत्तुंग व्यक्तिमत्त्वं ही त्या गावाची सामाजिक संपत्ती व ठेवा असतात. तो ठेवा जतन करण्याची जबाबदारी सर्वांचीच असते. शिंदेंच्या नागरी सत्काराच्या निमित्ताने त्या जबाबदारीची जाणीव कावीळग्रस्तांना आणि त्यांच्या बोलवित्या धन्यांना कोण आणि कशी देणार? ती जाणीवच काविळीवर जालीम उतारा ठरेल !