शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘कावीळ’ग्रस्त व शिंदेंचा सत्कार

By admin | Updated: July 28, 2016 04:19 IST

क्षेत्र कुठलेही असो, आपल्या गावाची ओळख देशभर निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान भूमिपुत्राचा अभिमान त्या गावातील प्रत्येक माणसाला असतो. याला अपवाद ठरतात ते वैचारिक, सामाजिक

- राजा माने क्षेत्र कुठलेही असो, आपल्या गावाची ओळख देशभर निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान भूमिपुत्राचा अभिमान त्या गावातील प्रत्येक माणसाला असतो. याला अपवाद ठरतात ते वैचारिक, सामाजिक आणि राजकीय ‘कावीळ’ जडलेले मूठभर लोक. सध्या नेमक्या याच काविळीने सोलापूरचे भूमिपुत्र सुशीलकुमार शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त महापालिकेच्या वतीने होणाऱ्या नागरी सत्कार व मानपत्र प्रदान सोहळ्यास खोडा घातला जात आहे.संपूर्ण देशात आपल्या गावाची ओळख निर्माण करून देणाऱ्या भूमिपुत्राचा अमृतमहोत्सवी वाढदिवस हा त्या व्यक्तिमत्त्वाला सलाम करण्याचा आणि त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करण्याचा असावा ही आपली संस्कृती. पण नेहमी संस्कृतीच्या गप्पा मारणारेच या संस्कृतीला विसरले आहेत.महापालिका हे जनतेचे सभागृह मानले जाते. त्याच कारणाने महापालिकेच्या वतीने होणारा सोहळा हा तिथल्या जनतेचा सोहळा असतो. राज्यात सुशीलकुमार शिंदे यांचा अमृतमहोत्सव साजरा व्हावा, अशी भावना घेऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रेम करणारे सर्वच क्षेत्रातील मान्यवर काही महिन्यांपूर्वीपासून कामाला लागले. मुंबई-दिल्लीत मोठा सोहळा व्हावा, असा त्यांचा मानस होता. त्यात प्रातिनिधिक स्वरूपात माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्याकडे पुढाकाराची सूत्रे देण्यात आली. ‘मी आज जो काही आहे ते सोलापुरातील ढोर गल्लीपासून सुरू झालेल्या माझ्या प्रवासातील प्रत्येक वळणावर साथ देणाऱ्या सोलापूरकरांमुळे आहे. त्यामुळे देशातील कुठल्याही सत्कारापेक्षा सोलापूरकरांचे प्रेम मला महत्त्वाचे आहे’, अशी भूमिका सुशीलकुमार शिंदे यांनी घेतली. सोलापूरची महापालिका आज काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. साहजिकच काँग्रेसच्या महापौर सुशीलाताई आबुटे, सभागृह नेते संजय हेमगड्डी, गट नेते पद्माकर काळे, उप महापौर प्रवीण डोंगरे, माजी महापौर यु.एन.बेरिया, यांच्यासह सत्ताधारी नगरसेवकांनी महापालिकेच्या वतीने नागरी सत्कार व्हावा यासाठी पाठपुरावा केला. महापालिकेच्या सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवकांनी तसा एकमताचा ठरावही केला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, सोनिया गांधी यांच्यासह राष्ट्रीय पातळीवरील अनेक नेत्यांचे चार सप्टेंबरच्या कार्यक्रमासाठीचे सोलापूर दौरेही निश्चित झाले. या पार्श्वभूमीवर सोलापुरात भाजपा-सेना यांच्यासह कॉ. आडम मास्तर यांनी कार्यक्रमाच्या खर्चाच्या मुद्यावरून सत्कार सोहळ्याला ब्रेक लावण्याचा प्रयत्न सुरू केला होता. अनाठायी खर्च आणि उधळपट्टी याचे समर्थन कोणीही करणार नाही. परंतु खर्चाचे निमित्त करून नेहमीची राजकीय धुणी धुण्याचा प्रयत्न कुणी करू लागले तर मात्र ते ओंगळवाणे ठरेल. राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, संसदीय काँग्रेस पक्षाचे नेते या उच्च पदांपर्यंत पोहोचणे सोपे आहे काय? त्या पदांपर्यंत सुशीलकुमार शिंदे आपल्या कर्तृत्वाने पोहोचले! एक अजातशत्रू अशी त्यांची प्रतिमा आहे. राष्ट्रीय पातळीवर त्यांनी बजावलेल्या अनेक भूमिकांबद्दल त्यांचा गौरवच केला जातो. अतिरेक्यांना फाशी देण्याच्या निर्णयावेळी केन्द्रीय गृहमंत्री म्हणून त्यांनी दाखविलेला कणखरपणा असो वा देशात पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात दलित-आदिवासींपासून कुडमुड्या जोशींचा अंतर्भाव करताना त्यांनी मुख्यमंत्री म्हणून दाखविलेली सामाजिक कणव असेल, असे अनेक संदर्भ सर्वच क्षेत्रातील लोकांना अभिमानाचे वाटत आले आहेत.विविध क्षेत्रात नाव कमावणारी उत्तुंग व्यक्तिमत्त्वं ही त्या गावाची सामाजिक संपत्ती व ठेवा असतात. तो ठेवा जतन करण्याची जबाबदारी सर्वांचीच असते. शिंदेंच्या नागरी सत्काराच्या निमित्ताने त्या जबाबदारीची जाणीव कावीळग्रस्तांना आणि त्यांच्या बोलवित्या धन्यांना कोण आणि कशी देणार? ती जाणीवच काविळीवर जालीम उतारा ठरेल !