शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

दुष्टचक्रात शेतकरी

By admin | Updated: June 20, 2016 03:01 IST

‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पाच्या चिंधड्या उडविण्याचा मनसुबा महाराष्ट्रातील भाजपा मंत्र्यांनी निश्चित केलेला दिसतो

‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पाच्या चिंधड्या उडविण्याचा मनसुबा महाराष्ट्रातील भाजपा मंत्र्यांनी निश्चित केलेला दिसतो. पंधरा वर्षांच्या कालावधीनंतर राज्यात सत्ता मिळाल्यानंतर समजुतदारपणा आणि संयमी वृत्तीने भाजपाची मंडळी वागतील, असे वाटत असताना, अवघ्या दीड वर्षात भाजपाची मंडळी जनतेला ‘बुरे दिन’ दाखवू लागली आहे. रोज एक तरी मंत्री किंवा नेता वादात अडकत आहे. एकनाथराव खडसे यांनी मंत्री असताना घेतलेल्या भोसरीच्या जागेचा वाद ताजा असताना खान्देशातील दुसरे मंत्री गिरीश महाजन हे देखील विरोधी आमदार असताना घेतलेल्या जागेवरुन अडचणीत आले आहेत. खडसेंप्रमाणेच तेही कोलांडउड्या मारीत आहे. ही जागा माझ्या नावावर आहे हेच मुळी मला माहित नव्हते, या जागेतून मला काहीही उत्पन्न मिळालेले नाही, त्यामुळे प्राप्तीकर विवरणपत्रातही त्याचा उल्लेख नाही. मागणी असेल तर त्या शेतकऱ्याला ती जागा परत करायला तयार असल्याचे त्यांचे विधान तर जबाबदार लोकप्रतिनिधीला नक्कीच शोभेसे नाही. पण या गदारोळात मूळ जमीनमालक असलेल्या शेतकऱ्यावरील अन्याय नजरेआड होत आहे. साखर कारखाने, उद्योगांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घ्यायच्या किंवा भूसंपादन करायचे. जमीन घेताना विकासाचे मोठे लोभसवाणे चित्र उभे करायचे. सिंगापूर, कॅलिफोर्निया अवतरेल. भूमिपुत्रांना नोकरी मिळेल, अशा आश्वासनांचे गाजर दाखवायचे. प्रत्यक्षात मात्र तसे घडत नाही. अगदी महाजन यांच्या मानपूर येथील जागेचे उदाहरण बोलके आहे. एकनाथराव खडसे मुख्य प्रवर्तक असलेल्या तापी-पूर्णा साखर कारखान्यासाठी ८१ एकर जमीन खरेदी करण्यात आली. १५ वर्षांनंतरही हा कारखाना उभारला गेलेला नाही. शेतकऱ्याची जमीन गेली, मुलांना नोकरीही मिळाली नाही, ही कुटुंबे आर्थिक विवंचनेत आली. राजकीय मंडळींच्या ताब्यात जमीन येताच तेथे सिंचन योजना मंजूर झाली. पडीक जमिनीत आता फळबाग लागवड होत आहे. आणि शेतकरी मूकपणे बघत आहेत. साखर कारखाने, उद्योग बंद पडले. पर्यायाने ते बँकांच्या वा शासनाच्या ताब्यात गेले. उपजाऊ जमीन पडीक झाली. काही आजारी कारखाने राजकीय मंडळींनी विकत घेऊन लाभ मिळविले आहेत. शेतकरी या दुष्टचक्रात फसला आहे आणि ते भेदण्याऐवजी मंत्रिगणाचे सारे लक्ष आत्मोद्धाराकडे लागले आहे.