शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

दुष्टचक्रात शेतकरी

By admin | Updated: June 20, 2016 03:01 IST

‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पाच्या चिंधड्या उडविण्याचा मनसुबा महाराष्ट्रातील भाजपा मंत्र्यांनी निश्चित केलेला दिसतो

‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पाच्या चिंधड्या उडविण्याचा मनसुबा महाराष्ट्रातील भाजपा मंत्र्यांनी निश्चित केलेला दिसतो. पंधरा वर्षांच्या कालावधीनंतर राज्यात सत्ता मिळाल्यानंतर समजुतदारपणा आणि संयमी वृत्तीने भाजपाची मंडळी वागतील, असे वाटत असताना, अवघ्या दीड वर्षात भाजपाची मंडळी जनतेला ‘बुरे दिन’ दाखवू लागली आहे. रोज एक तरी मंत्री किंवा नेता वादात अडकत आहे. एकनाथराव खडसे यांनी मंत्री असताना घेतलेल्या भोसरीच्या जागेचा वाद ताजा असताना खान्देशातील दुसरे मंत्री गिरीश महाजन हे देखील विरोधी आमदार असताना घेतलेल्या जागेवरुन अडचणीत आले आहेत. खडसेंप्रमाणेच तेही कोलांडउड्या मारीत आहे. ही जागा माझ्या नावावर आहे हेच मुळी मला माहित नव्हते, या जागेतून मला काहीही उत्पन्न मिळालेले नाही, त्यामुळे प्राप्तीकर विवरणपत्रातही त्याचा उल्लेख नाही. मागणी असेल तर त्या शेतकऱ्याला ती जागा परत करायला तयार असल्याचे त्यांचे विधान तर जबाबदार लोकप्रतिनिधीला नक्कीच शोभेसे नाही. पण या गदारोळात मूळ जमीनमालक असलेल्या शेतकऱ्यावरील अन्याय नजरेआड होत आहे. साखर कारखाने, उद्योगांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घ्यायच्या किंवा भूसंपादन करायचे. जमीन घेताना विकासाचे मोठे लोभसवाणे चित्र उभे करायचे. सिंगापूर, कॅलिफोर्निया अवतरेल. भूमिपुत्रांना नोकरी मिळेल, अशा आश्वासनांचे गाजर दाखवायचे. प्रत्यक्षात मात्र तसे घडत नाही. अगदी महाजन यांच्या मानपूर येथील जागेचे उदाहरण बोलके आहे. एकनाथराव खडसे मुख्य प्रवर्तक असलेल्या तापी-पूर्णा साखर कारखान्यासाठी ८१ एकर जमीन खरेदी करण्यात आली. १५ वर्षांनंतरही हा कारखाना उभारला गेलेला नाही. शेतकऱ्याची जमीन गेली, मुलांना नोकरीही मिळाली नाही, ही कुटुंबे आर्थिक विवंचनेत आली. राजकीय मंडळींच्या ताब्यात जमीन येताच तेथे सिंचन योजना मंजूर झाली. पडीक जमिनीत आता फळबाग लागवड होत आहे. आणि शेतकरी मूकपणे बघत आहेत. साखर कारखाने, उद्योग बंद पडले. पर्यायाने ते बँकांच्या वा शासनाच्या ताब्यात गेले. उपजाऊ जमीन पडीक झाली. काही आजारी कारखाने राजकीय मंडळींनी विकत घेऊन लाभ मिळविले आहेत. शेतकरी या दुष्टचक्रात फसला आहे आणि ते भेदण्याऐवजी मंत्रिगणाचे सारे लक्ष आत्मोद्धाराकडे लागले आहे.