शहरं
Join us  
Trending Stories
1
Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक
2
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
3
“आता आमच्यातील मैत्री पुढे टिकेल का, ते माहिती नाही”; मस्क यांच्या विधानावर ट्रम्प थेट बोलले
4
भाजपासह काँग्रेसला खिंडार; माजी खासदार, पदाधिकारी अजित पवार गटात, NCPचे घड्याळ बांधले हाती
5
राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांच्या पत्नी रात्री जेवून झोपल्या, सकाळी उठल्याच नाहीत; सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यू
6
१९५७पासून कुटुंब काँग्रेससोबत, पण आता २ बंधू शिवसेनेत; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
7
बँक मॅनेजरने घरच्यांसह ग्राहकांच्या ११० खात्यातून काढले कोट्यवधी; शेअर मार्केटमध्ये टाकून फसली
8
लेख: आज दोस्ती आहे; पण उद्या कुस्ती होऊ शकते! महाराष्ट्राचं राजकारण रंजक वळणावर
9
Raja Raghuvanshi : "बेटा, मला तुझी आठवण आली, तू काही खाल्लंस का?"; राजा रघुवंशीचा आईसोबतचा शेवटचा संवाद
10
१२ वर्षांनी बुध-गुरु युती: १६ दिवस ७ राशींना दुप्पट लाभ, व्यापार-नोकरीत यश; शुभ-कल्याण होईल!
11
"चीन १०० वर्षांच्या योजना आखतो, भारत भूतकाळात अडकलाय," दिग्गजानं फरक समजावून केलं मोठं वक्तव्य
12
आजचे राशीभविष्य: ०६ जून २०२५; आर्थिक लाभ होईल, खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल
13
मोदी पाकिस्तानशी जहाल भाषेत का बोलतात? ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरच्या भाषणात दिसली झलक
14
उद्धव-राज यांनीच एकमेकांशी बोलायला हवे, आम्ही बोलून फरक पडणार नाही- अमित ठाकरे
15
प्लास्टिकला नो, पर्यावरणाला हो म्हणा; पंकजा मुंडे यांचे आवाहन; प्लास्टिकविरोधी मोहीम सुरू
16
धारावी पुनर्वसन: भाजपाचे आशिष शेलार अन् काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात ‘तू तू मै मै’
17
अकरावी प्रवेश: येत्या रविवारी गुणवत्ता प्रवेश फेरी; १२.७ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; मुदत संपुष्टात
18
रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची सुरक्षितता अजूनही वाऱ्यावरच; आगीच्या घटनेने जनतेत राग
19
विधि सीईटीत १०० पर्सेंटाईलचे चार विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात; गैरप्रकाराचा संशय
20
राज्यातील २९५ शिक्षण संस्थांची मान्यता रद्द; कामगिरी मूल्यांकन अहवाल न दिल्याने कारवाई

दुष्टचक्रात शेतकरी

By admin | Updated: June 20, 2016 03:01 IST

‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पाच्या चिंधड्या उडविण्याचा मनसुबा महाराष्ट्रातील भाजपा मंत्र्यांनी निश्चित केलेला दिसतो

‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पाच्या चिंधड्या उडविण्याचा मनसुबा महाराष्ट्रातील भाजपा मंत्र्यांनी निश्चित केलेला दिसतो. पंधरा वर्षांच्या कालावधीनंतर राज्यात सत्ता मिळाल्यानंतर समजुतदारपणा आणि संयमी वृत्तीने भाजपाची मंडळी वागतील, असे वाटत असताना, अवघ्या दीड वर्षात भाजपाची मंडळी जनतेला ‘बुरे दिन’ दाखवू लागली आहे. रोज एक तरी मंत्री किंवा नेता वादात अडकत आहे. एकनाथराव खडसे यांनी मंत्री असताना घेतलेल्या भोसरीच्या जागेचा वाद ताजा असताना खान्देशातील दुसरे मंत्री गिरीश महाजन हे देखील विरोधी आमदार असताना घेतलेल्या जागेवरुन अडचणीत आले आहेत. खडसेंप्रमाणेच तेही कोलांडउड्या मारीत आहे. ही जागा माझ्या नावावर आहे हेच मुळी मला माहित नव्हते, या जागेतून मला काहीही उत्पन्न मिळालेले नाही, त्यामुळे प्राप्तीकर विवरणपत्रातही त्याचा उल्लेख नाही. मागणी असेल तर त्या शेतकऱ्याला ती जागा परत करायला तयार असल्याचे त्यांचे विधान तर जबाबदार लोकप्रतिनिधीला नक्कीच शोभेसे नाही. पण या गदारोळात मूळ जमीनमालक असलेल्या शेतकऱ्यावरील अन्याय नजरेआड होत आहे. साखर कारखाने, उद्योगांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घ्यायच्या किंवा भूसंपादन करायचे. जमीन घेताना विकासाचे मोठे लोभसवाणे चित्र उभे करायचे. सिंगापूर, कॅलिफोर्निया अवतरेल. भूमिपुत्रांना नोकरी मिळेल, अशा आश्वासनांचे गाजर दाखवायचे. प्रत्यक्षात मात्र तसे घडत नाही. अगदी महाजन यांच्या मानपूर येथील जागेचे उदाहरण बोलके आहे. एकनाथराव खडसे मुख्य प्रवर्तक असलेल्या तापी-पूर्णा साखर कारखान्यासाठी ८१ एकर जमीन खरेदी करण्यात आली. १५ वर्षांनंतरही हा कारखाना उभारला गेलेला नाही. शेतकऱ्याची जमीन गेली, मुलांना नोकरीही मिळाली नाही, ही कुटुंबे आर्थिक विवंचनेत आली. राजकीय मंडळींच्या ताब्यात जमीन येताच तेथे सिंचन योजना मंजूर झाली. पडीक जमिनीत आता फळबाग लागवड होत आहे. आणि शेतकरी मूकपणे बघत आहेत. साखर कारखाने, उद्योग बंद पडले. पर्यायाने ते बँकांच्या वा शासनाच्या ताब्यात गेले. उपजाऊ जमीन पडीक झाली. काही आजारी कारखाने राजकीय मंडळींनी विकत घेऊन लाभ मिळविले आहेत. शेतकरी या दुष्टचक्रात फसला आहे आणि ते भेदण्याऐवजी मंत्रिगणाचे सारे लक्ष आत्मोद्धाराकडे लागले आहे.