शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी पुन्हा संपावर जाण्यापूर्वी...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 04:10 IST

मार्चच्या पहिल्या आठवड्यात नाशिक ते मुंबई लॉँग मार्च काढून सुमारे ४० हजार शेतकºयांनी साºया देशाचे लक्ष वेधले होते. किसान सभा या डाव्या पक्षाच्या संघटनेने लॉँग मार्चचे आयोजन केले होते

मार्चच्या पहिल्या आठवड्यात नाशिक ते मुंबई लॉँग मार्च काढून सुमारे ४० हजार शेतकºयांनी साºया देशाचे लक्ष वेधले होते. किसान सभा या डाव्या पक्षाच्या संघटनेने लॉँग मार्चचे आयोजन केले होते. महाराष्टÑातील सत्ताधारी आणि डाव्या पक्षांचे जन्मजात हाडवैर असताना लॉँग मार्चचे अभूतपूर्व स्वागत करण्यास सरकारच पुढे सरसावले होते. सविस्तर चर्चा झाली आणि लेखी पत्राद्वारे मागण्या मान्य करून त्या कशा पद्धतीने सोडविल्या जाणार याचा कालबद्ध कार्यक्रमही जाहीर करण्यात आला.किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले कोल्हापूरच्या दौºयावर आले असताना त्या मान्य केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी येत्या १ जूनपर्यंत झाली नाही तर पुन्हा लॉँग मार्च नव्हे, तर संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.लॉँग मार्चवाल्यांच्या मागण्या सोडविण्याचे लेखी आश्वासन देऊन त्यांना परत जाण्याची खास तजबीज केली गेली. आता डॉ.अजित नवले सांगताहेत की, मध्यस्थी करणारे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी फसवणूक केली आहे. कर्जमाफीचा नाराही फसवा होता असे सांगून डॉ. नवले यांनी आकडेवारी सादर केली. त्यांच्या मतानुसार सरकारने घोषणा केली होती की, ८९ लाख शेतकºयांचे ३४ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात येईल. प्रत्यक्षात ४० लाख शेतकºयांचे १३ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. ही सर्वांत मोठी लबाडी होती.सरकारने हा सर्वांत ऐतिहासिक निर्णय आहे. आजवरची सर्वांत मोठी कर्जमाफी आहे, असाही दावा केला हाता. डॉ. नवले यांनी सरकारने दिलेल्या लेखी आश्वासनाचे पत्र बाहेर काढावे आणि त्यातील प्रत्येक मुद्यावर आपले म्हणणे जनतेसमोर सादर करावे. त्यानंतर संपावर जाण्याचा निर्धार स्पष्ट करावा. लाल वादळ शमलं आहे. त्यामुळे नवले यांच्या सादरीकरणावर सरकारतर्फे चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन कसे तुटून पडणार हे एकदा दिसेल.वास्तविक डाव्या पक्षांनी किंवा भाजपवाल्यांनी शेतकºयांच्या मूळ दुखण्यावर कधीच भाष्य केले नाही. निर्णय घेतला नाही. शेतमालाला योग्य भाव दिला पाहिजे, यासाठी या पक्षांनी जेवढी आंदोलने केली त्यापेक्षा अधिक आंदोलने महागाई कमी करावी, या मागणीसाठी करीत यापूर्वीच्या कॉँग्रेसच्या सरकारवर शेतमालाचे भावे पडतील, याच्या उपाययोजना करण्यासाठी दबाव आणण्याचे राजकारण केले आहे.हा सर्व इतिहास झाला तरी शेतमालाला योग्य भाव मागतानाच महागाई वाढत असल्याची तक्रार करून शेतकºयांच्या मालाचे दरच वारंवार सांगितले गेले. शेतमालाला भाव वाढून किंवा किफायतशीर मिळण्यासाठी त्या उपाययोजना हव्या आहेत, त्यासाठी अधिक आंदोलन छेडली गेली पाहिजेत. त्याचवेळी शेती करण्यासाठी येणाºया खर्चावर नियंत्रण कसे आणता येईल याचा कधी विचार करणार आहोत की नाही? खते, औषधे, बियाणे आणि अवजारे यांचा व्यापार तेजीत आहे. त्यांचे भाव गगनाला भिडलेले आहेत. त्यांची महागाई कमी करा असे कुणीच म्हणत नाही. महाराष्टÑात केवळ द्राक्षे पिकविण्यासाठी २० हजार कोटी रुपयांची खते आणि औषधांचा धंदा होत आहे.किफायतशीर भावासाठी उत्पादन खर्चावर नियंत्रण आणणे आणि शेती करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अधिक गुंतवणूक करायला हवी आहे, याचीही जोड द्यावी. मगच संपाचा इशारा द्यावा, अन्यथा प्रश्न सुटणार नाहीत.- वसंत भोसले