शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी जिंकले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 23:43 IST

गेले सहा दिवस नाशिक, नंदूरबार, ठाणे, पालघर जिल्ह्यांतून चालत निघून मुंबईला पोहोचलेल्या आदिवासी व शेतक-यांच्या जवळपास सर्वच मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या, याचे कारण या मोर्चाला केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर संपूर्ण देशातून मिळालेला पाठिंबा.

गेले सहा दिवस नाशिक, नंदूरबार, ठाणे, पालघर जिल्ह्यांतून चालत निघून मुंबईला पोहोचलेल्या आदिवासी व शेतक-यांच्या जवळपास सर्वच मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या, याचे कारण या मोर्चाला केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर संपूर्ण देशातून मिळालेला पाठिंबा. शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस वा शेकाप यांच्या पाठिेंब्यापेक्षा राज्यातील सर्वसामान्य जनतेकडून मिळालेल्या समर्थन व सहानुभूतीचा फडणवीस सरकारवर नैतिक दबाव येणे स्वाभाविकच होते. अन्य मोर्चांना अनेकदा तोंडदेखली आश्वासने देऊन, मोर्चेक-यांची बोळवण केली जाते. असे आजच नव्हे, तर पूर्वापार घडत आले आहे. मार्क्सवाद्यांच्या भारतीय किसान सभेच्या झेंड्याखाली निघालेल्या किसानांच्या तोंडाला पाने पुसणे मात्र शक्यच नव्हते. या मोर्चाला शिवसेना वा मनसे यांचे नेतेही मोर्चेक-यांना भेटायला गेले. असे महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडत होते. ती त्यांची अपरिहार्यता होती. चपलेविना हे आदिवासी व शेतकरी पायपीट करीत येत असल्याचे पाहून त्यांचीही घालमेल झाली असावी. पायाला आलेले फोड, वर टळटळीत उन्ह, तहानेने जीव व्याकूळ झालेला अशा अवस्थेत हे आदिवासी व शेतकरी घोषणा देत, लढ्याची गाणी गात पुढे येत होते. हे सारे पाहून त्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात, त्यांना न्याय मिळायला हवा, असे सामान्यांनाही वाटू लागले होते. त्रिपुरातील पराभवानंतर आपली ताकद वेगळ्या प्रकारे दाखवण्यात डाव्यांना यश आले, असे म्हणता येईल. तब्बल १८० किलोमीटरचे अंतर पार करताना, कुठे गोंधळ नाही, गदारोळ नाही, हजारो शेतकरी शिस्तीत चालताना टीव्हीवर पाहायला मिळत होते. हा किसान मोर्चा असला तरी त्यात प्रामुख्याने आदिवासी व अल्पभूधारक होते. त्यामुळे वनहक्क कायद्याची अंमलबजावणी व्हावी आणि देवस्थान जमिनी व बेनामी जमिनी नावावर करा, या त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या. हे आदिवासी व शेतकरी तीन-चार पिढ्यांपासून या जमिनी कसत आहेत, पण त्यांची मालकी त्यांच्याकडे नाही. त्यामुळे जमिनी हातातून जाण्याची सतत डोक्यावर तलवार. कसेल त्याची जमीन म्हणून, प्रत्यक्षात जमिनीचा हक्क मात्र द्यायचा नाही, असे वर्षानुवर्षे सुरू असून, त्यावर कायमचा तोडगा निघावा, ही त्यांची मागणी न्याय्यच होती. जमिनी नावावर नसल्याने त्यांना कर्ज मिळत नाही आणि त्यामुळे कर्जमाफीही नाही, अशी अवस्था. गायरान जमिनीही आदिवासी पिढ्यान्पिढ्या कसत आहेत. पण सरकारच्या दृष्टीने ते अतिक्रमण आहे. म्हणजे आदिवासींना कुठेच कसू न देता, त्यांना विस्थापित करण्याचा प्रकार. सरकारने या महत्त्वाच्या मागण्या मान्य करताना, त्यांची सहा महिन्यांत अंमलबजावणी करण्याची घोषणा केली आहे. तसे खरोखर केले, तर त्याबद्दल हे हजारो शेतकरी आणि आदिवासी आयुष्यभर मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानत राहतील. जीर्ण झालेले रेशन कार्ड बदलून द्या, ही त्यांची मागणी म्हणजे प्रशासन त्यांना दोन वेळ जेवू द्यायला तयार नसल्याचेच उदाहरण. जीर्ण कार्ड बदलून द्या, ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे करावी लागावी, ही प्रशासनाच्या आडमुठ्या कार्यपद्धतीलाच चपराक आहे. सरकारने तीही मान्य केली आहे. पण त्यास इतका काळ टाळाटाळ का केली, याचा जाब मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाने विचारायला हवा. त्यासाठी आदिवासी व शेतकºयांना पुन्हा पुन्हा रेशन कार्यालये वा सरकारी कार्यालयांत हेलपाटे मारण्याची वेळ येऊ नये. या मोर्चाचे ठिकठिकाणी स्वागतच झाले. कुणी पाण्याची, कुणी वडापावची तर कुणी जेवणाची व्यवस्था केली. डबेवाल्यांनीही त्यांना जेवू घातले. मुस्लीम, शीख समाजानेही मदत केली. डॉक्टर, पोलीस या सर्व यंत्रणाही साह्यासाठी सक्रिय होत्या. मोर्चेकºयांना पुन्हा चालत घरी परतावे लागू नये, म्हणून रेल्वेने विशेष गाड्या सोडल्या. मागण्या मान्य झाल्यावर किसानांच्या नेत्यांनी सरकारचे अभिनंदन केले. शेतकरी लगेच निघूनही गेले. तरीही शेतकºयांच्या मागण्यांना पाठिंबा आहे, असे सांगताना त्यांच्या नेत्यांची तुलना भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांनी शहरी माओवाद्यांशी केली. ज्यांना मुळात लाल रंगांचीच इतकी अ‍ॅलर्जी असते, की कष्टकºयांच्या पायाला झालेल्या जखमांतून येणाºया लाल रक्तातही त्यांना माओवाद दिसत असावा. त्यांच्याच सरकारचे नेते मोर्चेकºयांना सामोरे जात असताना, पूनमबार्इंनी जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला.