शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पेरणीच्या तोेंडावर शेतकरी वाऱ्यावर

By admin | Updated: June 4, 2015 05:45 IST

अच्छे दिन’ची भुरळ घालून सत्तेवर आलेल्या केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारला या देशात शेती करणारा एक वर्ग आहे, याचा बहुधा विसर

वसंत भोसले -

‘अच्छे दिन’ची भुरळ घालून सत्तेवर आलेल्या केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारला या देशात शेती करणारा एक वर्ग आहे, याचा बहुधा विसर पडलेला दिसतो. ऊस उत्पादक शेतकरी तर दिवसेंदिवस अडचणीतच येत आहे. महाराष्ट्रात गेली आठ-दहा वर्षे ऊसतोडणी हंगामाच्या सुरुवातीला आंदोलन करण्याचा आणि सरकारने नाही-होय म्हणत म्हणत दर जाहीर करण्यासाठी काहीतरी तोडगा काढायचा, असा प्रघातच पडला होता. मात्र, गतवर्षी केंद्रात आणि राज्यात सत्तांतर झाले. याच आंदोलनाला पाठिंबा देऊन राज्यकर्त्यांवर वारेमाप टीका करणारे भाजपावाले सत्तेवर आले. त्यासाठी भाजपाला शेतकरी संघटनांनीही मदतच केली. एवढेच नव्हे तर निवडणुकीत आघाडी केली; जागा वाटून घेतल्या. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीविरुद्ध जोरदार रान तापविले. शेतकरीवर्गही नाराज झाला होता. मात्र, उसाला कमी-अधिक दर देण्यासाठी सरकार मदत करीत होते.आता उलटाच कारभार होताना अनुभव येतो आहे. शेतकरी संघटनांचाही व्यवहार तसाच आहे. आपणच सत्ताधारी झालो आहोत, काय हवे ते मागा, अशी जणू सांगण्याची वेळ आली, पण देण्यासाठी हातात काय आहे? साखरेचे दर दिवसेंदिवस कोसळत आहेत. ते वाढण्यासाठी काहीच करता येत नाही. कारण याच शेतकरी संघटनांच्या मागण्यांवरून साखर नियंत्रणमुक्त केली. दररोज उत्पादन होणारे साखरेचे पोते थेट बाजारात येत होते. यावर्षी विक्रमी उत्पादन झाले आहे. मागणीपेक्षा जादा साखर असल्याने दर कसे वाढणार? साखरेचे दर २३ ते २४ रुपये किलो असतील, तर ऊसाला १५०० ते १७०० रुपये दर देता येऊ शकतो, असे साखर कारखानदारीचे अर्थकारण सांगते. मात्र, ऊस उत्पादनाचा खर्च आणि साखर उत्पादनाचा कारखान्याचा खर्च कमी झालेला नाही. यावर उपाय म्हणून अतिरिक्त साखरेचा बफरस्टॉक करावा, अशी मागणी आहे. यापूर्वी अनेकवेळा असा प्रयोग करण्यात आला आहे. आता तर पेरणीचा हंगाम सुरू होत आहे. शेतकऱ्यांना नवे पीककर्ज मिळण्यासाठी जुने फेडावे लागणार आहे. जुने कर्ज वेळेत फेडले तर व्याज सवलत मिळते, पण कर्जच फेडलेले नसल्याने नवे कर्जही नाही आणि व्याज सवलतही नाही. बुडत्याचा पाय खोलात अशीच अवस्था शेतकरीवर्गाची झालेली आहे. यावर उपाय काढावा. सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे, पण या सरकारला ना शेतीचे कळते, ना शेतकरीवर्गाचे दु:ख समजते. शेतकरी संघटनांनी एफआरपीनुसार ऊसाला दर द्या, आम्हाला काही सांगू नका, असे टुमणे लावले आहे. तो दर देता येतो का, याचे उत्तर नाही हे शेतकरी संघटनेलाही माहीत आहे. कारखान्यांनी शेवटच्या दोन महिन्यात तोडलेल्या ऊसाला टनाला केवळ १२०० रुपये देण्याची तयारी दर्शविली आहे. म्हणजे शेतकऱ्याला गतवर्षीच्या तुलनेत निम्मेच पैसे मिळणार. त्यातून कर्जे कशी फेडायची, ही अडचणच आहे. शेती आणि शेतकऱ्यांचा कळवळा आणून शेतकरी संघटनांच्या आंदोलनात सहभागी होणारे भाजपावाले गप्प का? साखर कारखानदारी बहुसंख्येने विरोधकांच्या नियंत्रणाखाली असल्याने मोडून गेली तर बरेच, अशी भूमिका आहे का? शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिलेले सरकार सत्तेवर असताना दबाव निर्माण करण्यासाठी आंदोलनाची भाषा करावी लागते, यातच नव्या सरकारचे एका वर्षातच अपयश नाही का? केंद्रीय नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी साखरेचा साठा केल्याने दर चार-पाच रुपयांनी वाढतील, असे म्हटले आहे. याचा अर्थ साखर खाणाऱ्यांची सरकारला चिंता आहे. ती तयार करणारा शेतकरीवर्ग आणि कारखानदारी यांची अडचण समजून घेण्याची मानसिकता नाही. ज्या भागात ऊसशेती विकसीत झाली आहे, साखर कारखानदारी उभी आहे, ती मोडून टाकायची का? याचा तरी विचार करायला हवा. यापूर्वीचा शेतकरीवर्गाचा कळवळा केवळ राजकीय होता. शेती व शेतकरी यांच्याविषयीचे प्रेम, आस्था खोटीच होती, असे मानायचे का?