शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

मावळत्या दिनकरा

By admin | Updated: December 31, 2016 04:40 IST

राजस्थानमधील अरवली पर्वतशृंखलेतील अबू (सिरोही जिल्हा) येथील रंगीबेरंगी वृक्षवेलींनी नटलेल्या सनसेट पॉइंटवर आम्ही बरेच लोक उत्सुकतेने उभे होतो.

- डॉ. सौ. प्रज्ञा आपटेराजस्थानमधील अरवली पर्वतशृंखलेतील अबू (सिरोही जिल्हा) येथील रंगीबेरंगी वृक्षवेलींनी नटलेल्या सनसेट पॉइंटवर आम्ही बरेच लोक उत्सुकतेने उभे होतो. समोर नजर पोहोचेल तिथपर्यंत सपाट आणि विस्तीर्ण वाळवंट दिसत होते. मंद वायुलहरींचा वेग वाढला. मैदानावर उठलेल्या धुळीच्या आणि वाळूच्या ढगांनी क्षितिजाला गिळून टाकले. अस्ताचली निघालेल्या सूर्याला त्या अवडंबराने अकाली वेढून टाकले. या गुजरात टूरची सुरुवातच प्रभास क्षेत्रापासून झाली होती. एकेकाळी श्रीकृष्ण एका अश्वत्थ वृक्षातळी नि:स्तब्ध बसले असताना त्यांचे गुलाबी तळवे जणू मृगाचे कान आहेत असा भास जरा नावाच्या व्याधाला झाला. त्याचा बाण लागण्याचे निमित्त श्रीकृष्णाच्या देहत्यागास पुरेसे वाटले. २०१६ या वर्षाचा अस्त आज मनाला असाच अस्वस्थ करतो आहे.२०१५ सालची सांगता आमच्या सुखाच्या खुज्या मोजपट्ट्यांनुसार छान झाली होती. साहित्य विहारच्या अध्यक्ष सुप्रसिद्ध कवयित्री आशा पांडे आणि पद्मगंधाच्या अध्यक्ष व सुप्रसिद्ध कादंबरीकार शुभांगी भडभडे यांनी शासनाकडून कोणतीही मदत न घेता १९ व २० डिसेंबर २०१५ला नागपूर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उत्तमपणे यशस्वी केले. विदर्भाचा सामाजिक दस्तऐवज म्हणून सा.सं.ची ‘दखल’ ही माझे संपादन असणारी स्मरणिकाही वाखाणली होती.२०१६ हे वर्षही बरे जाणार अशा अपेक्षेत असताना ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले. वैचारिक स्वातंत्र्यासाठीच अमेरिका ओळखली जाते. त्या विकसित लोकशाहीत सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जात नाही कारण विकसित लोकशाहीत मतभेदांना मानाचे स्थान असते. सगळे जग ग्लोबल वॉर्मिंगच्या चिंतेत असताना ‘वी नीड ग्लोबल वॉर्मिंग’ अशा शब्दात पर्यावरणाची काळजीच त्यांनी विक्षिप्तपणे फोल ठरवली. अल्बर्ट आईनस्टाईनने जर्मनीचे नागरिकत्व सोडून अमेरिकेत स्थायिक होण्याचे ठरवले ते या विचारस्वातंत्र्यासाठीच.८ नोव्हेंबरलाच आपल्याकडे विमुद्रीकरणाचा निर्णय प्रसारित झाला आणि बँका, एटीएमसमोर, स्वत:चेच पैसे काढण्यासाठी ताटकळणारी, भविष्याविषयी चिंतित जनता दिसू लागली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या ७० वर्षात आमची प्रगती नव्हे तर अवनतीच केवळ झाली हे ऐकताना वाटले की जणू जुन्याचा पूर्ण विध्वंस करून, उलथापालथ (डिसरप्शन) करून नवे वर्ष येणार आहे. नवे वर्ष पण तारखा त्याच जुन्या क्रमाने असतात. जुन्या भूमीवर दरवर्षी नवे अंकूर, नवे स्वप्न घेऊन उमलतात. याविषयीची कृतज्ञता ‘जो तो वंदन करी उगवत्या’ ही मानसिकता ठेवणारा समाज विसरला का? उज्ज्वल भविष्यासाठी झटणाऱ्या मावळत्या दिनकराला आवर्जून आम्ही वंदन करतो ते याचसाठी. उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठीच. जे दरवर्षी मृगजळाप्रमाणे दूरदूर जात असते.