शहरं
Join us  
Trending Stories
1
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
2
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
3
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
4
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
5
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
8
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
9
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
10
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
11
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
12
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
13
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
14
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
15
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
16
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
17
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
18
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
19
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
20
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   

टोकाचे राजकारण

By admin | Updated: May 11, 2016 02:52 IST

सत्ताधारी आणि विरोधक हे राजकारणात सवतींसारखेच वागताना दिसतात. विरोधी बाकावर बसणारे सत्ताधारी कसे वाईट व जनतेच्या प्रश्नांशी कुत्सितपणे वागत आहेत

सत्ताधारी आणि विरोधक हे राजकारणात सवतींसारखेच वागताना दिसतात. विरोधी बाकावर बसणारे सत्ताधारी कसे वाईट व जनतेच्या प्रश्नांशी कुत्सितपणे वागत आहेत अशा कुरघोड्या करण्यातच पाच वर्षे खर्ची घालत असतात. तीच भूमिका पुढील काळात सत्ताधारी विरोधात गेल्यावर बजावत असतात. यालाच म्हणतात केवळ विरोधासाठी विरोध. पूर्वीचे राजकारणी नैतिकता पाळायचे. आरोप-प्रत्यारोप करायचे मात्र त्यास नैतिकतेचे अधिष्ठान असायचे. हल्लीच्या राजकारणाने नैतिकता गुंडाळून ठेवली असल्याचे प्रत्यंतर वारंवार येऊ लागले आहे. राजकारणी लोकांना विरोधकांवर शरसंधान साधण्यासाठी मुद्द्याचे बंधन नसते. राईचा कण जरी मिळाला तरी तिचा पर्वत करण्यात ते पटाईत असतात. कधी जातप्रमाणपत्रावर आक्षेप घेतला जातो, कधी विदेशीपणाचा मुद्दा पुढे केला जातो तर कधी चारित्र्यहननापर्यंत मजल जाते. आता त्यात भर म्हणून की काय नेते-मंत्र्यांच्या पदव्या खऱ्या की बनावट याचा ऊहापोह होऊ लागला आहे. काही महिन्यांपूर्वी सुषमा स्वराज यांच्या शैक्षणिक पात्रतेवर आक्षेप घेतल्यानंतर विनोद तावडे यांच्या पदवी आणि विद्यापीठाच्या मान्यतेबाबतही शंका उपस्थित करण्यात आली होती. आता तशाच पद्धतीचा आक्षेप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिक्षणाबद्दल आणि पदवी प्रमाणपत्रावरील नावाबाबत घेण्यात आला. मोदी यांनी त्यांच्या पदव्या जाहीर कराव्यात, असे आव्हान केजरीवाल यांनी दिले होते. पंडित नेहरू यांच्या मंत्रिमंडळापासून तर अलीकडच्या काळापर्यंत अनेक अल्पशिक्षित लोकप्रतिनिधींनी मंत्रिपदे भूषविली आहेत. तेव्हा कधी शिक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला नाही किंवा करण्यात आला नाही, आत्ताच हा मुद्दा पुढे करण्यामागचा हेतू नेमका काय असू शकतो? कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिद्धीच्या झोतात राहणे आणि कुरघोड्या करून राजकीय वातावरण दूषित करणे हाच त्यामागचा हेतू असू शकतो. वास्तविक ज्या लोकप्रतिनिधींना लाखो लोकांनी संविधानाने दिलेला अधिकार बजावून विधानसभा आणि लोकसभेत पाठविलेले असते, त्यांच्या पात्रते-अपात्रतेबद्दल शंका घेणे म्हणजे मतदारांच्या निवड प्रक्रियेवरच शंका घेण्यासारखे आहे. आरोपच करायचे झाल्यास राज्यात आणि देशात अनेक समस्या आपल्या भवताली आहेत, त्या उपस्थित करून सरकारला कोंडीत पकडता येऊ शकते; परंतु तसे न करता शैक्षणिक पात्रतेवर घसरून टोकाचे राजकारण करण्यात काय अर्थ आहे? दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शिक्षणाचा जर इतका कळवळा असेल तर त्यांना शैक्षणिक पद्धतीवर आणि त्या अनुषंगाने चालणाऱ्या गैरप्रकारांवरही आक्षेप घेता आला असता. त्यामुळे शैक्षणिक सद्यस्थितीवर भांडणारा एक नेता जनतेच्या बाजूने आहे, याचे समाधान जनतेला वाटू शकले असते. पण अशाने काय साध्य होणार आहे?