शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
3
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
4
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
5
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
6
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
7
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
8
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
9
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
10
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
11
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
12
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
13
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
14
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
15
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
16
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
17
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
18
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
20
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

टोकाचे राजकारण

By admin | Updated: May 11, 2016 02:52 IST

सत्ताधारी आणि विरोधक हे राजकारणात सवतींसारखेच वागताना दिसतात. विरोधी बाकावर बसणारे सत्ताधारी कसे वाईट व जनतेच्या प्रश्नांशी कुत्सितपणे वागत आहेत

सत्ताधारी आणि विरोधक हे राजकारणात सवतींसारखेच वागताना दिसतात. विरोधी बाकावर बसणारे सत्ताधारी कसे वाईट व जनतेच्या प्रश्नांशी कुत्सितपणे वागत आहेत अशा कुरघोड्या करण्यातच पाच वर्षे खर्ची घालत असतात. तीच भूमिका पुढील काळात सत्ताधारी विरोधात गेल्यावर बजावत असतात. यालाच म्हणतात केवळ विरोधासाठी विरोध. पूर्वीचे राजकारणी नैतिकता पाळायचे. आरोप-प्रत्यारोप करायचे मात्र त्यास नैतिकतेचे अधिष्ठान असायचे. हल्लीच्या राजकारणाने नैतिकता गुंडाळून ठेवली असल्याचे प्रत्यंतर वारंवार येऊ लागले आहे. राजकारणी लोकांना विरोधकांवर शरसंधान साधण्यासाठी मुद्द्याचे बंधन नसते. राईचा कण जरी मिळाला तरी तिचा पर्वत करण्यात ते पटाईत असतात. कधी जातप्रमाणपत्रावर आक्षेप घेतला जातो, कधी विदेशीपणाचा मुद्दा पुढे केला जातो तर कधी चारित्र्यहननापर्यंत मजल जाते. आता त्यात भर म्हणून की काय नेते-मंत्र्यांच्या पदव्या खऱ्या की बनावट याचा ऊहापोह होऊ लागला आहे. काही महिन्यांपूर्वी सुषमा स्वराज यांच्या शैक्षणिक पात्रतेवर आक्षेप घेतल्यानंतर विनोद तावडे यांच्या पदवी आणि विद्यापीठाच्या मान्यतेबाबतही शंका उपस्थित करण्यात आली होती. आता तशाच पद्धतीचा आक्षेप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिक्षणाबद्दल आणि पदवी प्रमाणपत्रावरील नावाबाबत घेण्यात आला. मोदी यांनी त्यांच्या पदव्या जाहीर कराव्यात, असे आव्हान केजरीवाल यांनी दिले होते. पंडित नेहरू यांच्या मंत्रिमंडळापासून तर अलीकडच्या काळापर्यंत अनेक अल्पशिक्षित लोकप्रतिनिधींनी मंत्रिपदे भूषविली आहेत. तेव्हा कधी शिक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला नाही किंवा करण्यात आला नाही, आत्ताच हा मुद्दा पुढे करण्यामागचा हेतू नेमका काय असू शकतो? कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिद्धीच्या झोतात राहणे आणि कुरघोड्या करून राजकीय वातावरण दूषित करणे हाच त्यामागचा हेतू असू शकतो. वास्तविक ज्या लोकप्रतिनिधींना लाखो लोकांनी संविधानाने दिलेला अधिकार बजावून विधानसभा आणि लोकसभेत पाठविलेले असते, त्यांच्या पात्रते-अपात्रतेबद्दल शंका घेणे म्हणजे मतदारांच्या निवड प्रक्रियेवरच शंका घेण्यासारखे आहे. आरोपच करायचे झाल्यास राज्यात आणि देशात अनेक समस्या आपल्या भवताली आहेत, त्या उपस्थित करून सरकारला कोंडीत पकडता येऊ शकते; परंतु तसे न करता शैक्षणिक पात्रतेवर घसरून टोकाचे राजकारण करण्यात काय अर्थ आहे? दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शिक्षणाचा जर इतका कळवळा असेल तर त्यांना शैक्षणिक पद्धतीवर आणि त्या अनुषंगाने चालणाऱ्या गैरप्रकारांवरही आक्षेप घेता आला असता. त्यामुळे शैक्षणिक सद्यस्थितीवर भांडणारा एक नेता जनतेच्या बाजूने आहे, याचे समाधान जनतेला वाटू शकले असते. पण अशाने काय साध्य होणार आहे?