शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 00:19 IST

अधिक महिना संपत आला. अधिकात सगळंच अधिक. म्हणजे तीन वर्षांचा तारखांचा गोंधळ तो मिटवतो. पुन्हा वर्ष सुरळीत. त्याचा हिशेब सुरूच. नदीवर बघा सर्वांना पुण्य वाटण्याची, घेण्याची, देण्याची घाईच. प्रत्येक सासरा जावयाला काहीतरी देण्यासाठी उत्सुक.

- किशोर पाठकअधिक महिना संपत आला. अधिकात सगळंच अधिक. म्हणजे तीन वर्षांचा तारखांचा गोंधळ तो मिटवतो. पुन्हा वर्ष सुरळीत. त्याचा हिशेब सुरूच. नदीवर बघा सर्वांना पुण्य वाटण्याची, घेण्याची, देण्याची घाईच. प्रत्येक सासरा जावयाला काहीतरी देण्यासाठी उत्सुक. म्हणजे खास जावयाला बोलावले जाते. हे सारे का? तर नैसर्गिक संतुलन. जे जे अधिक आपल्याकडे आहे, आलंय ते सर्वांना वाटायचं. समत्व हवे. ती भावना समाजात रुजावी म्हणून बत्ताशापासून तर अनारसेपर्यंत सारंच वाटतात लोक. पण हे वाढवणं आणि वाढत जाणं लहानपणापासूनच माणूस शिकतो. त्याला लहानपणीच बेरीज-वजाबाकी शिकवलेली असते. एखादी गोष्ट मिळवायची, वाढवायची असेल तर अधिक म्हणतो. म्हणजे बेरीज, बेरजेचे राजकारणही असतं. हे आपल्यात काहीतरी वाढवतं. अर्थात हे वाढवणं प्रगतीचं असेल तर ठीक, पण नुसतंच वाटणं असेल तर त्यालाही आपण अधिकच म्हणतो. प्रत्येक जावयाच्या घरात एकतरी वस्तू नवीन दिसतेच. कुणीही विचारतो काय? अधिक का? आता अधिकात सरकारने काहीतरी अधिक चांगलं करावं याकरिता अधिकस्य अधिकं फलम्! या महिन्यातलं प्रत्येक पाऊल नव्या पदपथाकडे, प्रगती, विकासाकडे असतं. एखादा हुशार कर्तबगार जावई अधिकात काहीतरी वेगळं कमावतो तो सासऱ्याला म्हणतो मी माझ्या कामात हे अधिक केलंय. नवीन यश, कर्तृत्व, कष्ट दिसतात. त्याच्यात मला अजून काही नको, आता जुना झालो तुमचा दुसरा मुलगा म्हणून हे करतोय. पण असं म्हणणारे किती. सासºयाच्या जीवावर लाखोंच्या उड्या मारणारे तरुण कर्तृत्वसंपन्न म्हणायचे की पत्नीला तुझे बाबाही थकलेत. त्यांना आपण अमूक एक घेऊन देऊ किंवा त्यांना ट्रिपला पाठवू करा म्हातारा-म्हातारी मजा. असं म्हणणारा माणूस हा खरंतर अधिकाचं वाणच म्हणायला हवं. अलीकडे अशा समजूतदार माणसांची वाणच त्याला पैशांची, संपत्तीची, मालमत्तेची हावच आहे. तो ती टाळू शकत नाही. किंबहुना मिळेल तेवढं ओरबाडून घेणारेच जास्त असतात. समाजात स्वास्थ्य आणि आनंद हेच निर्माण न करता माणूस बिघडवतात. सध्या एकतर अधिक महिन्यात एक अधिक काम करू या. सामाजिक म्हणजे शहर स्वच्छता, पर्यावरणाची जपणूक, वाढ, पाण्याची जपणूक, पावसाळ्यात पुरात लोकांना मदत, गरिबांना वह्या-पुस्तकांची मदत यातील काहीही वृद्धांना वेळ देणं, त्यांच्याशी बोलणं. ते तर कायम बोलतच असतात. कधी एकटेच. हे त्यांचं अधिक बोलणं ऐकूया. माणुसकीचं एक काम करूया मग अधिकाचं हेच पुण्य नक्की मिळेल. हेच वाण.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकHinduismहिंदुइझम