शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या हद्दवाढीचीच हद्द

By admin | Updated: July 29, 2016 03:23 IST

हद्दवाढ होणे आवश्यक आहे, या मतावर कोल्हापूरचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील ठाम आहेत. मात्र, ग्रामीण भागातील आमदारांचा ठाम विरोध आहे.

- वसंत भोसलेहद्दवाढ होणे आवश्यक आहे, या मतावर कोल्हापूरचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील ठाम आहेत. मात्र, ग्रामीण भागातील आमदारांचा ठाम विरोध आहे. त्यांच्याच पक्षाचे आमदार अमल महाडिक यांचा कडाडून विरोध आहे. भाजपासह सर्वच पक्षांची भूमिका दुटप्पी आहे.कोल्हापूर महापालिकेची म्हणजे शहराची हद्दवाढ करण्याचा निर्णय पुन्हा गुंतागुंतीचा झाला आहे. महापालिका स्थापन होऊन ४४ वर्षे झाली. तेव्हापासून एकाही इंचाने शहराची हद्द वाढलेली नाही. याचे कारण शहराच्या वाढीचा वेगच कमी आहे. मात्र, चार दशकानंतर शहराची वाढ व्हावी, अशी अपेक्षा आणि मागणी होऊ लागली तसे वातावरण तापू लागले. याला कारण आणि दोषीही महापालिकेत सत्तेवर असलेले तसेच प्रशासनही जबाबदार आहे. महापालिकेने कोल्हापूर शहराच्या परिसरातील तब्बल ४१ गावे महापलिकेत घेण्याचा जो पहिला प्रस्ताव तयार केला, तो वेडेपणाचा होता. शहराचा परिसर पंचगंगा नदीच्या खोऱ्यातील आहे. चारी बाजूला सुपीक जमीन आहे. ती गमावण्याची शेतकऱ्यांची तयारी नाही. त्यामुळे सर्व गावांचा शहरात सामील व्हायला विरोध आहे. शिवाय शहराचा विकास नीट होत नसताना शहराचा विस्तार कशासाठी, असा सवालही ग्रामीण भागातील लोक विचारत आहेत. हा जुना वाद सोडविण्यासाठी नव्याने सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने प्रयत्न चालविला आहे. हद्दवाढ होणे आवश्यक आहे, या मतावर कोल्हापूरचे पालक आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील ठाम आहेत. मात्र, त्यांना ग्रामीण भागातील आमदारांचा ठाम विरोध आहे. त्यांच्याच पक्षाचे आमदार (दक्षिण कोल्हापूर मतदारसंघाचे) अमल महाडिक यांचा कडाडून विरोध आहे. भाजपासह सर्वच पक्षांची भूमिका दुटप्पी आहे. ग्रामीण भागातील नेतृत्व हद्दवाढीस विरोध करते, तर शहरातील त्याच पक्षांचे कार्यकर्ते हद्दवाढीसाठी आग्रही आहेत. त्यामुळे वाद संपत नाही. वास्तविक शहराची हद्दवाढ करण्यासाठी कोणताही शास्त्रीय आधार घेऊन प्रशासकीय निर्णय होत नाही. कोल्हापूर शहराचे उदाहरण पाहिले तर शहराच्या पश्चिम आणि उत्तरेस पंचगंगा नदी आहे. नदीच्या दोन्ही बाजूस सुपीक जमीन आहे. शहराच्या वाढत्या विस्ताराबरोबरच पंचगंगा नदीचे प्रदूषण वाढत आहे. नव्या प्रस्तावानुसार नदीच्या पलीकडे असलेली गावेही शहरात समाविष्ट करण्याचा वेडपट आग्रह चालू आहे. परिणामी शहर आणि गावांमधून वाहणाऱ्या नदीचे प्रचंड नुकसान होणार आहे. शिवाय सुपीक जमिनीवर नागरी वस्तीचे आक्रमण होणार आहे.हद्दवाढीच्या प्रस्तावात बदल करून शहराला बिलगलेल्या पाच-सहा गावांचा समावेश करावा. कळंबा, पाचगाव, मोरेवाडी, उजळाईवाडी, सरनोबतवाडी आणि उचगाव ही गावे हद्दवाढीत घेण्यास हरकत नाही. कारण या गावांचा विस्तारही शहरापर्यंत झाला आहे. वाढणारी सर्व लोकसंख्या याच प्रमुख गावांतून होते आहे. शिवाय या गावांमध्ये गुंठेवारी जमिनीमुळे अतिशय वाईट पद्धतीने घरांची बांधकामे झाली आहेत. रस्ते नाहीत, इतर कोणत्याही नगर रचनेच्या मर्यादा पाळलेल्या नाहीत. ही गावे शहरातच असल्याप्रमाणे वाढत गेली आहेत. या पाच गावांशिवाय पहिल्या टप्प्यात इतर गावांचा विचार करू नये. एकाच वेळी मोठा घास घेणेही योग्य नाही. शिवाय शहर आणि परिसराचा पर्यावरणीय तसेच नागरीकरणासाठीच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठीच्या निकषांवर विस्तार करायला हवा. शहराच्या पोटात बारमाही वाहणारी नदी घेणे वेडेपणा ठरणार आहे. जमीन ओलिताखाली आणण्यासाठी आपण लाखो रुपये खर्च करतो आणि सुपीक जमिनीवर शहराचा कब्जा करून देऊन काय साधणार आहोत? कोल्हापूरच्या विकासाचा आराखडाही पूर्णत: योग्य पद्धतीने राबविला जात नाही. त्या पार्श्वभूमीवर अवाढव्य हद्दवाढीची मागणी योग्य नाही. शहराला बिलगलेल्या गावांचाच विचार प्रथम करावा. टप्प्याटप्प्याने शहर वाढत राहू द्या! भाजपा सरकारने तरी वास्तववादी भूमिका घ्यावी!