शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

खर्चिक कॉरिडोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:53 IST

रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान, असे आजवर म्हटले जात असले तरी बदलत्या काळात आणखी एक दान श्रेष्ठ ठरू शकते, ते म्हणजे अवयवदान!

रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान, असे आजवर म्हटले जात असले तरी बदलत्या काळात आणखी एक दान श्रेष्ठ ठरू शकते, ते म्हणजे अवयवदान! काही वर्षांपासून महाराष्ट्रातील मोजक्याच जिल्ह्यांमध्ये यकृत, मूत्रपिंड, हृदय आदी अवयव प्रत्यारोपणासाठी ग्रीन कॉरिडोर केले जात असून, त्या माध्यमातून अनेकांना जीवनदान मिळाले आहे. अवयवदान हे अनेकांचे जीव वाचवण्यासाठी उपयुक्त ठरू शकत असले तरी मुळात त्याविषयी लोकांमध्ये जागृतीच नसल्याचे दिसते. राज्यात मूत्रपिंड विकाराने त्रस्त १२ हजार रुग्ण दात्याच्या प्रतीक्षेत असून, यकृताची गरज असलेले २६०० रुग्ण आजमितीस नोंदविले गेलेले आहेत. साहजिकच अवयवदानासाठी प्रबोधन करण्याबरोबरच प्रोत्साहनाची गरज आहे. त्यादृष्टीने काही सेवाभावी संस्था प्रयत्न करीत असतानाच आता राज्य सरकारदेखील त्यात सहभागी झाले आहे. विशेषत: वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

अवयवदानासाठी नाशिक ते नागपूर दरम्यान पदयात्रा काढणारे नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते सुनील देशपांडे यांनी अवयवदानाच्या संकल्पासाठी तयार केलेली प्रतिज्ञा राज्य सरकारने स्वीकृत केल्याने यापुढील काळात जनजागरणासाठी तिचा मोठा उपयोग होऊ शकेल. रुग्णशय्येवर असणाºया रुग्णापेक्षा त्याच्या कुटुंबीयांची अवयवदानासाठी मानसिकता तयार झाली पाहिजे, ही बाब लक्षात घेऊन अवयवदात्यांच्या कुटुंबीयांवर मोफत उपचार करण्याची तयारी शासनाने दर्शविली आहे. परंतु त्याचबरोबर आणखी काही बाबींकडे राज्य शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. अवयवदानासाठी दाते किंवा त्यांचे कुटुंबीय तयार होत असताना सदर अवयव सहजगत्या दुसºया जिल्ह्यात असलेल्या गरजवंतापर्यंत पोहोचवणे सोपे नसते. हृदय किंवा अन्य महत्त्वाचे अवयव विशिष्ट कालावधीत संबंधित गरजवंतापर्यंत पोहोचविले गेले तरच त्याचे रोपण करता येणे शक्य असते. परंतु त्यासाठी ग्रीन कॉरिडोर करणे आणि त्यानंतर अवयव रोपण करणे हे अत्यंत खर्चिक ठरत असते. त्यामुळे यासाठीचे दर कसे कमी होतील, याचा शासकीय स्तरावर विचार होणे गरजेचे आहे. सध्या मुंबई, पुणे, नाशिक यासारख्या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर असल्याने अवयव रोपणाच्या शस्त्रक्रिया होत असल्या तरी त्या खर्चिक असल्याने सरकारी रुग्णालयांमध्ये तशी व्यवस्था व त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध होणे गरजेचे आहे.