शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

ग्रंथव्यवहारातही सीमोल्लंघन अपेक्षित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 05:57 IST

- संजय जोशी (लेखक, कार्पोरेट व्यवस्थापक) थोडा खोलवरचा विचार केला तर समजेल, मनाने घातलेल्या मर्यादा ओलांडणे शरीराला कठीण जाते, ...

- संजय जोशी (लेखक, कार्पोरेट व्यवस्थापक)थोडा खोलवरचा विचार केला तर समजेल, मनाने घातलेल्या मर्यादा ओलांडणे शरीराला कठीण जाते, पण शरीराच्या मर्यादा मन सहजीच ओलांडते. सकारात्मक अर्थाने पाहायचे, तर सीमोल्लंघन ही मानसिक घटना आहे. एकदा मनाने उभारी घेऊन प्रत्यक्ष आणि काल्पनिक बंधनांच्या सीमा ओलांडल्या की, शरीर आपसूक साथ देतेच. मराठी ग्रंथव्यवहाराला मोठीच्या मोठी उड्डाणे घेऊन कोपऱ्याकोपºयावर उन्नत वाचनसंस्कृतीचे झेंडे उभारायचे असतील, तर लेखक, प्रकाशक, विक्रे ते, आणि वाचक या सर्वांनीच मानसिक सीमोल्लंघनाची तयारी केली पाहिजे. यंदाच्या दसºयाच्या निमित्ताने हाच संकल्प करू या.ग्रंथव्यवहारातील या विविध घटकांनी सीमोल्लंघन करायचे म्हणजे नेमके काय करायचे? लेखकांनी स्वत:ला आणि वाचकांना परिचित (आणि प्रिय) विषय आणि अभिव्यक्तीच्या पलीकडे जाऊन समकालाला कवेत घेणाºया आशयाकडे झेपावले पाहिजे. वाचकानुनयाचे सोपे मार्ग टाळून आत्मनिष्ठेने आणि आत्मविश्वासाने नव्या दिशांचा शोध घेऊन अभ्यासासह व्यक्त झाले पाहिजे. त्यात अर्थातच जोखीम असेल, पण ती तर सीमोल्लंघनाची पूर्वअटच असते ना. प्रकाशकांनी अर्थातच यात नव्या लेखकांचे आणि नव्या विषयांचे धाडसाने स्वागत करायला हवे. संख्यात्मक वाढीपेक्षा गुणात्मक वाढीकडे लक्ष देणे अधिक अगत्याचे आहे.सांगायचा मुद्दा खरे सीमोल्लंघन मानसिक असते. मराठी माणसाने आपल्यावर लादलेली काल्पनिक आणि भ्रामक बंधने झुगारून क्षितिजाचीदेखील तमा न बाळगता विशाल अवकाशात भरारी घ्यायला हवी. बाबा आमटे म्हणतातच, पंखांना क्षितिज नसते, त्यांना फक्त झेपेच्या कवेत मावणारे आकाश असते. सर्वात शेवटी वाचकांबद्दल बोलायला हवे. मर्ढेकर, केशवसूत, बालकवी आणि त्याचबरोबर फडके, खांडेकर, अत्रे, पुलं, गंगाधर गाडगीळ वगैरे सारे लेखक अत्यंत महान होते, हे मान्य करून त्यांना सादर वंदन करून आता नव्या लेखकांकडे वळायला हवे. समीक्षकांनी यात मोलाची भूमिका बजावायला हवी. कारण भूतकाळाच्या वेशीवर रेंगाळणारा समाज नवसर्जनाच्या वाटा रोखतो आणि भोवºयात सापडतो, असा इतिहास आहे. वाचकांनी हे शतकाचे सीमोल्लंघन करून एकवीसाव्या शतकातील साहित्याकडे कुतूहलाने पाहायला हवे. सोसायटीसमोरच्या वेल मेंटेन्ड लॉनच्या पलीकडे निबिडातदेखील अनुपम रानगंध असलेली फुले आणि तुमच्या साहसाला आव्हान देणाºया रानवाटा आहेत, याची जाण ठेवून वाचकांनी परिचित साहित्याच्या पलीकडे जाऊन हे धाडसी सीमोल्लंघन करायला हवे.मित्रहो, मुख्य मुद्दा असा आहे की, हे सारे शक्य आहे. बंधने पैशाची किंवा भौतिक नाहीतच. सीमा आणि मर्यादा आहेत, त्या आपल्या मानिसकतेलाच. नव्या काळात येणारी ईबुक्स, आॅडिओबुक्स वगैरे गोष्टी ग्रंथव्यवसायावर बंधने घालणार नाहीयेत, तर एकूण ग्रंथव्यवहाराचा पसारा वाढविणार आहेत. या नव्या तंत्रज्ञानाने ग्रंथसाक्षरता वाढणार आहे. तुंबाड सिनेमा पाहून आमच्या दुकानात लोक ‘तुंबाडचे खोत’ मागत आहेत, ही केवळ गंमत नाहीये, तर त्या दोन कलाकृतींचा संबंध नसूनही लोक अखेर पुस्तकाकडेच वळतात, याचा तो पुरावा आहे. एक पुस्तकप्रेमी म्हणून सीमोल्लंघनाचा मला उमजलेला अर्थ हा असा आहे!