शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

अपेक्षा फडणवीस यांच्याकडून आहेत

By admin | Updated: July 6, 2015 06:36 IST

पावसाळी अधिवेशन आठ दिवसांवर आले आहे. फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर हिवाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले

पावसाळी अधिवेशन आठ दिवसांवर आले आहे. फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर हिवाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले. दोन्ही अधिवेशनात अनेक विषय निघाले; मात्र तुमच्याच काळात हे घडले होते, तुमच्याच काळात हे निर्णय झाले होते. आम्ही तर आत्ताच सत्तेवर आलोय... आम्हाला काही वेळ द्या, अशी उत्तरे मंत्र्यांनी दिली. लोकानाही ती पटली. दरम्यान फडणवीस सरकारने एसीबीच्या माध्यमातून छगन भुजबळ यांच्याभोवती गुन्ह्यांची मालिका नोंदवणे सुरू केले. लवकरच सुनील तटकरे, अजित पवार यांच्यावरही बडगा उगारला जाणार असे भाजपा नेते बोलू लागले आणि या सगळ्यांवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘आगे आगे देखो होता है क्या...’त्यानंतर काही दिवसात उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे पदवी प्रकरण समोर आले. त्याचे पडसाद विरतात न विरतात तोच महिला व बाल कल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्या विभागाने खरेदी केलेल्या चिक्की प्रकरणात उत्तरे देता देता सरकारच्या नाकेनऊ आले. ते संपत नाही तोच पुन्हा तावडेंची १९१ कोटींची अग्निशमन यंत्रांची कथित खरेदी चर्चेत आली. आगे आगे देखो होता है क्या... या वाक्याचा अर्थ हा तर नसावा ना अशी चर्चा आता मंत्रालयात रंगू लागली आहे...मरगळ आलेल्या विरोधकांना लॉटरी लागावी तसे अनेक विषय हाती आले आहेत. तावडेंची पदवी, मुंडेंची खरेदी, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाळूमाफियांना दिलेले कथित अभय हे विषय आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्याची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याच्या आत होईल असे सांगितले गेले. प्रत्यक्षात पावसाळी अधिवेशन आले तरीही ऊस आणि साखरेच्या प्रश्नावर तोडगा निघालेला नाही. एमएसआरडीसी हे खाते ठप्प आहे. कोणतेही नवे काम त्यांच्याकडे नाही, अधिकारी रिकामे बसून आहेत. शासनाचे पाच विभाग औषधांची खरेदी करतात. त्यांच्यात सुसूत्रता यावी, सगळी खरेदी एकाच ठिकाणाहून व्हावी म्हणून वेगळे महामंडळ करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली पण त्याचे पुढे काहीही झाले नाही.एक ना दोन अनेक विषय आहेत. हाऊसिंग रेग्युलेटर हा राज्यातल्या फ्लॅटधारकांना प्रचंड मोठा दिलासा देणारा कायदा महाराष्ट्राने केला. असा कायदा करणारे आपले एकमेव राज्य आहे, ही अभिमानाने सांगण्याची गोष्ट आहे. पण राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतरही दीड वर्षापासून तो अंमलात आलेला नाही. केंद्र सरकार नवा कायदा आणत असताना तो स्वीकारावा की आपलाच मान्य करावा या दुविधेत मुख्यमंत्री अडकले आहेत; मात्र राज्याचा कायदा रद्द करण्याचा अधिकार केंद्रालादेखील नाही असे सांगत महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांनी जी ठाम भूमिका घेतली आहे तिचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. केंद्रातून आलेल्या १५ खासदारांच्या शिष्टमंडळापुढे ज्या बाणेदारपणे मुद्देसूद मांडणी केली त्याला तोड नाही. त्यासाठी गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव श्रीकांतसिंह आणि त्यांची टीम कौतुकास पात्र आहे. असे अधिकारी आहेत म्हणूनच महाराष्ट्राचे नाव देशात आघाडीवर आहे. अशा अधिकाऱ्यांच्या मागे उभे राहायचे की नाही याचा निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा आहे. त्यांच्या एका निर्णयावर खूप काही अवलंबून आहे. मुख्यमंत्री जर या रेग्युलेटरच्या बाजूने उभे राहिले तर राज्याची शान आणि प्रतिष्ठा वाढेल.आघाडी सरकारने जे काही केले त्यासाठी त्यांना सत्ता सोडावी लागली. त्याची फळे त्यांना मिळाली. फडणवीस यांच्याकडून लोकांच्या खूप अपेक्षा आहेत. पण त्यांच्याही काळात चुकीच्या गोष्टी घडू लागल्या, तर मात्र लोकांचा चांगुलपणावर विश्वास राहणार नाही. आजच्या राजकारणात फडणवीस हे केवळ नाव नाही तर लोकांच्या दृष्टीने दिलासा देणारा, चांगुलपणाचा विचार आहे. त्यांच्या प्रतिमेवर लोक अजूनही विश्वास ठेवून आहेत; मात्र त्यालाच तडा गेला तर सत्शील राजकारणाचा तो दारुण पराभव असेल. जाता जाता : मुख्यमंत्र्यांच्या परदेश दौऱ्यात प्रवीणसिंह परदेशी व्हिसा विसरले आणि त्याचा फटका मुख्यमंत्र्यांना बसला. त्यावर वाद झाले आणि मुख्यमंत्र्यांनी ‘इनफ इज इनफ’ म्हणत बदनामीचा फौजदारी दावा करण्याची भाषा केली. फडणवीस यांच्याकडून हे अपेक्षित नाही...- अतुल कुलकर्णी