शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

सारे काही प्रसिद्धीसाठी

By admin | Updated: March 13, 2016 22:02 IST

ताकदेखील फुंकून प्यायला हवे’ अशी एक उक्ती समाजात रूढ झालेली आहे. तिचे प्रत्यंतर अनेक ठिकाणी वारंवार येऊ लागले आहे. पूर्वी आणि अपवाद वगळता अलिकडचे सामाजिक कार्यकर्ते

ताकदेखील फुंकून प्यायला हवे’ अशी एक उक्ती समाजात रूढ झालेली आहे. तिचे प्रत्यंतर अनेक ठिकाणी वारंवार येऊ लागले आहे. पूर्वी आणि अपवाद वगळता अलिकडचे सामाजिक कार्यकर्ते समाजाच्या भल्यासाठी आंदोलने, मोर्चे काढायचे. दुसऱ्या दिवशी कोणती प्रसिद्धीमाध्यमे दखल घेतील याविषयी त्यांना काही देणे-घेणे नसायचे. कारण ते करण्यामागे त्यांचा हेतू प्रसिद्धीलोलूप नसायचा. जनहित डोळ्यासमोर ठेवून केल्या जाणाऱ्या त्या आंदोलनांना समाजात वेगळे असे महत्त्व आणि जनाधारही मिळायचा मात्र सध्या आंदोलने आणि मोर्चे यांचा वापर एक राजकीय स्टंटबाजी आणि मिडियाचे आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी केली जाऊ लागली आहेत. सर्वात आधी मिडियाला खबर देऊन केल्या जाणाऱ्या हल्लीच्या आंदोलनात भूमाता ब्रिगेडच्या आंदोलनाचा उल्लेख केला जात आहे. आधी शनि शिंगणापूर येथील चबुतऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा यासाठी आंदोलन करून तृप्ती देसाई यांनी प्रसिद्धीमाध्यमांचे लक्ष वेधून घेतले. अशा प्रकारच्या आंदोलनांना माध्यमे अधिक प्रसिद्धी देतात, संपूर्ण दिवस आपण अनेक वाहिन्यांवर झळकत असतो ही नस ओळखून त्यांनी दुसऱ्यांदा त्र्यंबकेश्वरकडे कूच केली. त्र्यंबकेश्वर येथील मंदिरातील गर्भभृहातही महिलांना प्रवेश मिळावा या मागणीसाठी दिवस निवडला तोही महाशिवरात्रीचा. यादिवशी त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी हजारो शिवभक्त याठिकाणी येतात, हे ठाऊक असतानाही देसाई यांनी त्र्यंबकेश्वरकडे येण्याचे जाहीर करून तेथील जनतेला, पोलीस प्रशासनाला वेठीस धरणे योग्य नाही. अनेक मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश नाही हा आताच घेण्यात आलेला निर्णय नाही. पिढ्यानुपिढ्यांपासून चालत आलेली ही परंपरा एका दिवसात खंडित होणे बोलण्याइतके सोपे निश्चितच नाही. देवदर्शनात स्त्री-पुरूष असा भेद नसावा हे मान्य परंतू धार्मिक रूढी-परंपरांशी निगडीत हा प्रश्न चर्चेतून आणि सामोपचाराने सोडविण्याचा विषय आहे. परंतू तसे न होता निवडक महिला कार्यकर्त्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरणे आणि प्रशासनाला वेठीस धरणे उचित नाही. शनिवारी त्र्यंबकमध्ये झालेल्या भूमाता ब्रिगेड आणि देवस्थानच्या विश्वस्तांच्या बैठकीत गर्भगृहात प्रवेशासाठी धर्मसंसद भरावी असा विचार भूमाता महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष दुर्गाताई शुक्रे यांनी मांडला. राज्यासमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न असून शेतकरी संकटात असल्याने त्यांच्यासाठी काहीतरी करण्यासाठी आमची संघटना प्रयत्न करीत असताना अ‍ॅड. देसाई यांच्याकडून सुरू असलेले आंदोलन म्हणजे प्रसिद्धी मिळण्यासाठीची स्टंटबाजी असल्याची टिकाही त्यांनी केली. शुक्रे म्हणतात देसाई यांची आम्ही जानेवारीतच संघटनेतून हकालपट्टी केली तर देसाई म्हणतात मी संघटनेची संस्थापक अध्यक्ष असताना हिंदुत्ववाद्यांशी आर्थिक व्यवहार करून माझी बदनामी करणारे माझी हकालपट्टी कशी करू शकतात? अशा एकमेकांवर कुरघोडी करून समाजमनाशी खेळण्यापेक्षा विधायक कार्याद्वारे प्रसिद्धी मिळविणे हेच बरे.