शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

सारे काही प्रसिद्धीसाठी

By admin | Updated: March 13, 2016 22:02 IST

ताकदेखील फुंकून प्यायला हवे’ अशी एक उक्ती समाजात रूढ झालेली आहे. तिचे प्रत्यंतर अनेक ठिकाणी वारंवार येऊ लागले आहे. पूर्वी आणि अपवाद वगळता अलिकडचे सामाजिक कार्यकर्ते

ताकदेखील फुंकून प्यायला हवे’ अशी एक उक्ती समाजात रूढ झालेली आहे. तिचे प्रत्यंतर अनेक ठिकाणी वारंवार येऊ लागले आहे. पूर्वी आणि अपवाद वगळता अलिकडचे सामाजिक कार्यकर्ते समाजाच्या भल्यासाठी आंदोलने, मोर्चे काढायचे. दुसऱ्या दिवशी कोणती प्रसिद्धीमाध्यमे दखल घेतील याविषयी त्यांना काही देणे-घेणे नसायचे. कारण ते करण्यामागे त्यांचा हेतू प्रसिद्धीलोलूप नसायचा. जनहित डोळ्यासमोर ठेवून केल्या जाणाऱ्या त्या आंदोलनांना समाजात वेगळे असे महत्त्व आणि जनाधारही मिळायचा मात्र सध्या आंदोलने आणि मोर्चे यांचा वापर एक राजकीय स्टंटबाजी आणि मिडियाचे आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी केली जाऊ लागली आहेत. सर्वात आधी मिडियाला खबर देऊन केल्या जाणाऱ्या हल्लीच्या आंदोलनात भूमाता ब्रिगेडच्या आंदोलनाचा उल्लेख केला जात आहे. आधी शनि शिंगणापूर येथील चबुतऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा यासाठी आंदोलन करून तृप्ती देसाई यांनी प्रसिद्धीमाध्यमांचे लक्ष वेधून घेतले. अशा प्रकारच्या आंदोलनांना माध्यमे अधिक प्रसिद्धी देतात, संपूर्ण दिवस आपण अनेक वाहिन्यांवर झळकत असतो ही नस ओळखून त्यांनी दुसऱ्यांदा त्र्यंबकेश्वरकडे कूच केली. त्र्यंबकेश्वर येथील मंदिरातील गर्भभृहातही महिलांना प्रवेश मिळावा या मागणीसाठी दिवस निवडला तोही महाशिवरात्रीचा. यादिवशी त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी हजारो शिवभक्त याठिकाणी येतात, हे ठाऊक असतानाही देसाई यांनी त्र्यंबकेश्वरकडे येण्याचे जाहीर करून तेथील जनतेला, पोलीस प्रशासनाला वेठीस धरणे योग्य नाही. अनेक मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश नाही हा आताच घेण्यात आलेला निर्णय नाही. पिढ्यानुपिढ्यांपासून चालत आलेली ही परंपरा एका दिवसात खंडित होणे बोलण्याइतके सोपे निश्चितच नाही. देवदर्शनात स्त्री-पुरूष असा भेद नसावा हे मान्य परंतू धार्मिक रूढी-परंपरांशी निगडीत हा प्रश्न चर्चेतून आणि सामोपचाराने सोडविण्याचा विषय आहे. परंतू तसे न होता निवडक महिला कार्यकर्त्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरणे आणि प्रशासनाला वेठीस धरणे उचित नाही. शनिवारी त्र्यंबकमध्ये झालेल्या भूमाता ब्रिगेड आणि देवस्थानच्या विश्वस्तांच्या बैठकीत गर्भगृहात प्रवेशासाठी धर्मसंसद भरावी असा विचार भूमाता महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष दुर्गाताई शुक्रे यांनी मांडला. राज्यासमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न असून शेतकरी संकटात असल्याने त्यांच्यासाठी काहीतरी करण्यासाठी आमची संघटना प्रयत्न करीत असताना अ‍ॅड. देसाई यांच्याकडून सुरू असलेले आंदोलन म्हणजे प्रसिद्धी मिळण्यासाठीची स्टंटबाजी असल्याची टिकाही त्यांनी केली. शुक्रे म्हणतात देसाई यांची आम्ही जानेवारीतच संघटनेतून हकालपट्टी केली तर देसाई म्हणतात मी संघटनेची संस्थापक अध्यक्ष असताना हिंदुत्ववाद्यांशी आर्थिक व्यवहार करून माझी बदनामी करणारे माझी हकालपट्टी कशी करू शकतात? अशा एकमेकांवर कुरघोडी करून समाजमनाशी खेळण्यापेक्षा विधायक कार्याद्वारे प्रसिद्धी मिळविणे हेच बरे.