शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

शहराचे सौंदर्य राखणे प्रत्येकाचेच कर्तव्य

By संजय वाघ | Updated: January 18, 2018 03:27 IST

शहरांच्या मानगुटीवर बसलेले फलकांचे भूत आता कायमस्वरूपी उतरविण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे.

सागरी किनारपट्टीवरून निघालेले मोसमी वारे एकवेळेस उशिरा पोहचतील, एखाद्या रोगाचा संसर्ग होण्यास थोडा-फार विलंब होऊ शकेल मात्र फलकांचे वारे इतक्या अफाट वेगाने शहर व गावातील चौकांना व्यापतील याची कुणी कल्पनादेखील केलेली नसावी. हल्ली फलकांचा जो सुळसुळाट झालेला आहे, तो शहर किंवा गावाचे विद्रुपीकरण तर करीत आहेच; पण याचबरोबर माणसाला असलेली प्रसिद्धीची हाव कोणत्या थरापर्यंत घेऊन जाऊ शकते, याचे उत्तम प्रत्यंतर सर्वसामान्य जनतेला येत आहे. शहरांचे सौंदर्य अबाधित राखण्यास स्थानिक कारभारी कमी पडले म्हणून आता खुद्द उच्च न्यायालयानेच फेब्रुवारीपर्यंत शहरे फलकमुक्त करण्याचा बडगा उगारल्याने राज्यातील महानगरपालिका प्रशासनाचे धाबे दणाणले.पूर्वी खेडेगावात एखादी गोष्ट लोकांना माहिती व्हावी यासाठी गावातील मुख्य चौकातून दवंडी दिली जायची. कालौघात दवंडीची प्रथा बंद पडली. त्याची जागा माहिती पुरविणाºया फलकांनी घेतली. या फलकांच्या माध्यमातून एखादा कार्यक्रम अथवा घटनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचविली जायची. कालांतराने या फलकांचा अतिरेक झाला. महनीय व्यक्तींच्या जयंती-पुण्यतिथीनिमित्त काही कार्यक्रम झाल्यास त्याची माहिती अन्य भागातील लोकांना प्रसिद्धी माध्यमाच्या मार्गाने दुसºया दिवशी व्हायची. जग झपाट्याने बदलत चालले आहे त्यासोबत प्रसिद्धीलोलुप राजकीय नेत्यांच्या मानसिकतेतही आमूलाग्र परिवर्तन होऊ लागले आहे. पूर्वीच्या माहिती फलकांची जागा आता जाहिरात फलकांनी घेतली आहे. आता तर फलकांची ही कल्पना एवढी स्वस्त झालेली आहे, की सामाजिक कामाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेली व आपल्या गल्लीव्यतिरिक्त शेजारच्या गल्लीत ज्यांची तोंडओळख नाही अशी मिसरूड न फुटलेली मुलेदेखील प्रसिद्धीच्या हव्यासापायी दोन-चार मित्रांकडून वर्गणी गोळा करून आपल्या नावाचा छायाचित्रासह फलक चौका-चौकांत लावू लागले आहेत. कौटुंबिक वातावरणापुरतेच मर्यादित असलेल्या अभीष्टचिंंतन सोहळ्याला जाहीर स्वरूप देणे हे कोणत्या चौकटीत बसते? असे फलक लावण्यामागे सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा हेतू संबंधितांचा असला तरी त्यातून सकारात्मक असे फारसे काहीही निष्पन्न होणारे नाही. उलट यातून स्वच्छ, सुंदर व हरित शहराला विद्रूप होण्याचाच धोका अधिक आहे. अशा फलकांच्या सुळसुळाटामुळे बाजारपेठ, रस्ते व चौक अधिक कुरूप होत चालले असून, जागा दिसेल त्याठिकाणी फलक लावण्याच्या अट्टाहासामुळे महत्त्वाची कार्यालये, दुकानांची नावे व चौकाचौकांतील देशभक्तांचे पुतळे झाकोळले जात आहेत. फलक लावण्यावरून व तो फाटल्यावरून दोन गटांत हाणामारीचे प्रकारही वाढीस लागत आहेत. बºयाचदा रस्त्याच्या मधोमध किंवा एखाद्या वळणावर लावलेल्या फलकांमुळे कोठे ना कोठे छोटे-मोठे अपघाताचे प्रकार घडत आहेत.शहराच्या सौंदर्यास बाधा आणणारे, दोन गटातील कार्यकर्त्यांची मने कलुषित करणारे, अपघातास निमंत्रण देणारे हे फलक समाजोपयोगी ठरण्याऐवजी डोकेदुखी ठरू पाहत आहेत. नेत्यांनी व लोकप्रतिनिधींनी सामाजिक स्वास्थ्याचा व शहराच्या सौंदर्याचा विचार करून आपापल्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या भावनांना आवर घालणे गरजेचे आहे. तसेच अनावश्यक फलकांवर अनाठायी खर्च करण्यापेक्षा त्या रकमेतून आधाराश्रमातील निराधार व उपाशी जीवांना एकवेळचे भोजन दिले तर त्यांचा दुवा तरी मिळू शकेल.- संजय वाघ