शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

शहराचे सौंदर्य राखणे प्रत्येकाचेच कर्तव्य

By संजय वाघ | Updated: January 18, 2018 03:27 IST

शहरांच्या मानगुटीवर बसलेले फलकांचे भूत आता कायमस्वरूपी उतरविण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे.

सागरी किनारपट्टीवरून निघालेले मोसमी वारे एकवेळेस उशिरा पोहचतील, एखाद्या रोगाचा संसर्ग होण्यास थोडा-फार विलंब होऊ शकेल मात्र फलकांचे वारे इतक्या अफाट वेगाने शहर व गावातील चौकांना व्यापतील याची कुणी कल्पनादेखील केलेली नसावी. हल्ली फलकांचा जो सुळसुळाट झालेला आहे, तो शहर किंवा गावाचे विद्रुपीकरण तर करीत आहेच; पण याचबरोबर माणसाला असलेली प्रसिद्धीची हाव कोणत्या थरापर्यंत घेऊन जाऊ शकते, याचे उत्तम प्रत्यंतर सर्वसामान्य जनतेला येत आहे. शहरांचे सौंदर्य अबाधित राखण्यास स्थानिक कारभारी कमी पडले म्हणून आता खुद्द उच्च न्यायालयानेच फेब्रुवारीपर्यंत शहरे फलकमुक्त करण्याचा बडगा उगारल्याने राज्यातील महानगरपालिका प्रशासनाचे धाबे दणाणले.पूर्वी खेडेगावात एखादी गोष्ट लोकांना माहिती व्हावी यासाठी गावातील मुख्य चौकातून दवंडी दिली जायची. कालौघात दवंडीची प्रथा बंद पडली. त्याची जागा माहिती पुरविणाºया फलकांनी घेतली. या फलकांच्या माध्यमातून एखादा कार्यक्रम अथवा घटनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचविली जायची. कालांतराने या फलकांचा अतिरेक झाला. महनीय व्यक्तींच्या जयंती-पुण्यतिथीनिमित्त काही कार्यक्रम झाल्यास त्याची माहिती अन्य भागातील लोकांना प्रसिद्धी माध्यमाच्या मार्गाने दुसºया दिवशी व्हायची. जग झपाट्याने बदलत चालले आहे त्यासोबत प्रसिद्धीलोलुप राजकीय नेत्यांच्या मानसिकतेतही आमूलाग्र परिवर्तन होऊ लागले आहे. पूर्वीच्या माहिती फलकांची जागा आता जाहिरात फलकांनी घेतली आहे. आता तर फलकांची ही कल्पना एवढी स्वस्त झालेली आहे, की सामाजिक कामाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेली व आपल्या गल्लीव्यतिरिक्त शेजारच्या गल्लीत ज्यांची तोंडओळख नाही अशी मिसरूड न फुटलेली मुलेदेखील प्रसिद्धीच्या हव्यासापायी दोन-चार मित्रांकडून वर्गणी गोळा करून आपल्या नावाचा छायाचित्रासह फलक चौका-चौकांत लावू लागले आहेत. कौटुंबिक वातावरणापुरतेच मर्यादित असलेल्या अभीष्टचिंंतन सोहळ्याला जाहीर स्वरूप देणे हे कोणत्या चौकटीत बसते? असे फलक लावण्यामागे सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा हेतू संबंधितांचा असला तरी त्यातून सकारात्मक असे फारसे काहीही निष्पन्न होणारे नाही. उलट यातून स्वच्छ, सुंदर व हरित शहराला विद्रूप होण्याचाच धोका अधिक आहे. अशा फलकांच्या सुळसुळाटामुळे बाजारपेठ, रस्ते व चौक अधिक कुरूप होत चालले असून, जागा दिसेल त्याठिकाणी फलक लावण्याच्या अट्टाहासामुळे महत्त्वाची कार्यालये, दुकानांची नावे व चौकाचौकांतील देशभक्तांचे पुतळे झाकोळले जात आहेत. फलक लावण्यावरून व तो फाटल्यावरून दोन गटांत हाणामारीचे प्रकारही वाढीस लागत आहेत. बºयाचदा रस्त्याच्या मधोमध किंवा एखाद्या वळणावर लावलेल्या फलकांमुळे कोठे ना कोठे छोटे-मोठे अपघाताचे प्रकार घडत आहेत.शहराच्या सौंदर्यास बाधा आणणारे, दोन गटातील कार्यकर्त्यांची मने कलुषित करणारे, अपघातास निमंत्रण देणारे हे फलक समाजोपयोगी ठरण्याऐवजी डोकेदुखी ठरू पाहत आहेत. नेत्यांनी व लोकप्रतिनिधींनी सामाजिक स्वास्थ्याचा व शहराच्या सौंदर्याचा विचार करून आपापल्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या भावनांना आवर घालणे गरजेचे आहे. तसेच अनावश्यक फलकांवर अनाठायी खर्च करण्यापेक्षा त्या रकमेतून आधाराश्रमातील निराधार व उपाशी जीवांना एकवेळचे भोजन दिले तर त्यांचा दुवा तरी मिळू शकेल.- संजय वाघ