शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगे चक्क CM फडणवीसांच्या बाजूने बोलले; म्हणाले, “काही लोक अडचणीत आणतात, पण आमचा विश्वास”
2
भारतीय हवाई दलाची ताकद वाढली, शत्रूचे धाबे दणाणार; स्वदेशी तेजस MK1 A लढाऊ विमानाचं उड्डाण
3
करणी सेनेत अध्यक्ष, ३ वर्षात मंत्रिपद... वाचा रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबाची स्पेशल कहाणी
4
“सढळहस्ते मदत करायची सरकारची तयारी नाही, शेतकऱ्यांची दिवाळी काळी...”; शरद पवारांची टीका
5
Diwali 2025 Special Train: कोकणवासीयांची दिवाळी गोड! प्रवास वेगवान, ट्रेनही वाढणार; नवीन वेळापत्रक आले, तुम्ही पाहिले?
6
रोज फक्त ३० रुपये वाचवून कोट्यधीश व्हा; काय आहे गुंतवणुकीचं सिक्रेट?
7
Shivaji Kardile: दूधाच्या व्यवसायापासून सुरुवात ते जिल्ह्यातील राजकारणात दबदबा; कोण होते शिवाजी कर्डिले?
8
Gujarat Cabinet Reshuffle: भूपेंद्र पटेलांच्या मंत्रिमंडळात १९ नवीन चेहरे, रिवाबा जडेजांसह तीन महिलांचा समावेश; वाचा संपूर्ण यादी 
9
पेट्रोलला पर्याय! देशातील सर्वात स्वस्त ५ इलेक्ट्रिक कार, किंमत फक्त ३.२५ लाखांपासून सुरू; दमदार फीचर्स
10
Rohit Sharma Viral Video : साधा सरळ आमचा दादा! चाहत्यांना भावली हिटमॅन रोहितची मराठी बोली
11
'या' शेअरची धमाकेदार एन्ट्री; ₹१४५ रुपयांवर लिस्ट झाला आयपीओ, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
12
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीचा खास नैवेद्य: धणे आणि गूळच का? या पदार्थांमागचं गुपित काय?
13
धक्कादायक! विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार; आरोपीने फोन करुन विचारले-गर्भनिरोधक गोळी देऊ का?
14
महायुती सरकारने केली शेतकऱ्यांची फसवणूक, शेतकऱ्यांची दिवाळी काळी; काँग्रेसची बोचरी टीका
15
नितीश कुमार 25 तर भाजप..; बिहार निवडणुकीत कोण किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर म्हणाले...
16
पलंगावर मृतदेह अन् हातातल्या मोबाईलवर फ्री फायर गेम सुरू; अवघ्या १३ वर्षांच्या मुलासोबत नेमकं काय घडलं?
17
'न्यायालयांनी संयम बाळगावा; प्रत्येक प्रकरणात CBI चौकशीचे आदेश देणे अयोग्य'- सुप्रीम कोर्ट
18
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
19
आसाममधील तिनसुकिया येथील लष्करी छावणीवर दहशतवादी हल्ला, तीन जवान गंभीर जखमी
20
गेल्या ३ महिन्यात ८ टॉप कमांडरनं दिले राजीनामे; अमेरिकन सैन्यातून बडे अधिकारी नोकरी का सोडतायेत?

कधी पालटेल चित्र?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2016 02:16 IST

तमाम भारतीयांचे कोणत्या एका बाबीवर एकमत असेल, तर ते म्हणजे शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे आणि त्यांना हलाखीच्या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी खूप काही

तमाम भारतीयांचे कोणत्या एका बाबीवर एकमत असेल, तर ते म्हणजे शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे आणि त्यांना हलाखीच्या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी खूप काही व तेदेखील तातडीने करणे आवश्यक आहे! ज्या शेतकऱ्यांनी १९७० च्या दशकात हरितक्रांती घडवून, अन्नधान्यासाठी भिकेचा कटोरा घेऊन जगापुढे तोंड वेंगाडणाऱ्या या देशाला स्वयंपूर्णच नव्हे तर निर्यातदार बनविले, त्या शेतकऱ्यावर आज आत्महत्त्येची पाळी येण्यामागील नेमक्या कारणांचा शोध अद्यापही कुणालाच घेता आलेला नाही. देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला खरा; पण ज्यांनी हा चमत्कार घडवून आणला, त्यांच्या पदरात काहीही पडले नाही, ही दुर्दैवी असली तरी वस्तुस्थिती आहे. आता २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या बाता केल्या जात आहेत. उत्पन्न दुप्पट करण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक उत्पादन दुप्पट करणे किंवा दर दुप्पट करणे! दुसरी शक्यता दुरापास्त असल्याने उत्पादन दुप्पट करावे लागेल. त्यासाठी देशातील कृषी संशोधन संस्थांना संशोधनाच्या क्षेत्रात चमत्कार घडवून आणावा लागेल. हरितक्रांतीच्या वेळी तसे घडले पण कृषी संशोधन संस्थांना यामध्ये सातत्य राखता आले नाही. कृषी संशोधन संस्थांची कामगिरी खालावण्यामागील कारणांचा शोध घेतला असता, असे निदर्शनास येते की हरितक्रांतीनंतर नव्या संशोधनाला, नव्या तंत्रज्ञानाच्या निर्मितीला जणू काही ग्रहणच लागले. त्यामागचे कारण म्हणजे, या संस्थांना ज्या प्रमाणात वित्त पुरवठा व्हायला हवा होता, त्या प्रमाणात तो झाला नाही. उपलब्ध आकडेवारीनुसार, २०१० मध्ये भारताने कृषी जीडीपीचा ३१ टक्के हिस्सा संशोधनावर खर्च केला होता. त्याच वर्षी चीनने जवळपास ६० टक्के हिस्सा, तर बांगलादेशसारख्या अविकसित देशानेही ३८ टक्के हिस्सा संशोधनावर खर्च केला. हुशार विद्यार्थ्यांचा कृषी क्षेत्राकडे कल नसणे, हे कृषी संशोधनाला खीळ बसण्याचे दुसरे प्रमुख कारण आहे. तेव्हा सरकारला खरोखरच कृषी क्षेत्रातील उत्पादन दुप्पट करावयाचे असेल, तर या दोन बाबींकडे तातडीने लक्ष पुरविणे आवश्यक आहे. अर्थात तेवढेच पुरेसे नाही. पाणी व विजेची उपलब्धता हे आणखी दोन महत्त्वपूर्ण पैलू आहेत. या सगळ्यांची सांगड नीट जुळली तरी, मागणीच्या तुलनेत उत्पादन वाढले की दर कोसळतात, हा अर्थशास्त्रामधील महत्त्वाचा सिद्धांत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याच्या वाटेत आडवा येईलच! थोडक्यात काय, तर शेतकऱ्याचे दिवस पालटण्याची चिन्हे काही दृष्टिपथात नाहीत, असेच म्हणावे लागेल!