शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
2
"त्या बाजूला फार बघू नका..., धोका आहे...!", भरसंसदेत उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांना नेमकं काय म्हणाले खर्गे?
3
सामन्यानंतर विराटला एक प्रश्न विचराला गेला, त्यानं बोलता बोलता BCCI अन् गौतम गंभीरवरच निशाणा साधला, स्पष्टच बोलला
4
१००% पर्यंत माफीची संधी! सीटबेल्ट, सिग्नल तोडणे यांसारख्या ट्रॅफिक चलनांवर मिळणार सूट! कसा करायचा अर्ज?
5
छोटा शेअर, मोठा धमाका, ज्यानं ₹१ लाख गुंतवले, त्याचं मूल्य आज झालं ₹८१ लाख; तुमच्याकडे आहे का?
6
SMAT 2025 : दोन टी-२० सामन्यात नाबाद २१४ धावा! १८ वर्षीय मुंबईकराचा शतकी धडाका
7
परदेशी झगमगाट हवा होता, अन् झाली जैश-ए-मोहम्मदची कमांडर! डॉक्टर शाहीनची ३ निकाहानंतरही एक इच्छा अपूर्ण
8
500 km रेंज, टॉप क्लास फीचर्स; लॉन्चला एक दिवस बाकी; कशी आहे मारुतीची पहिली EV कार?
9
पत्नीने PUBG खेळू दिले नाही, पतीने बायकोची हत्या केली; सहा महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न
10
मार्गशीर्ष भौम प्रदोष २०२५: मंगलदोष मुक्त, हनुमंत प्रसन्न; ‘असे करा’ शिवव्रत, शुभ-लाभ होतील!
11
५० वर्षांनी चतुर्ग्रही योग: ९ राशींना कल्पनेपलीकडे चौफेर लाभ; चौपट नफा-फायदा, मनासारखा काळ!
12
पराभवाच्या चर्चेने विरोधक संतप्त, नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेची आठवण करून दिली
13
उघडताच पूर्ण भरला 'हा' IPO; ग्रे मार्केट प्रीमिअमवरुन बंपर लिस्टिंगची शक्यता, पाहा डिटेल्स
14
Renuka Chaudhary: चक्क श्वानाला घेऊन काँग्रेस खासदार संसदेत पोहचल्या; सत्ताधारी भाजपानं घातला गोंधळ, काय घडलं?
15
मोठा निष्काळजीपणा! मध्य प्रदेशात ५० वर्षे जुना पूल कोसळला; १० जण जखमी
16
अर्थव्यवस्थेसाठी 'चिंताजनक' बातमी! रुपया डॉलरपुढे गडगडला, सर्वसामान्यांच्या खिशावर थेट होणार परिणाम!
17
अमेरिकेत भारतीय IT कर्मचाऱ्यांसाठी 'टेन्शन'! H-1B व्हिसा मिळणं ७०% नी घटलं; TCS चाही रिजेक्शन रेट वाढला!
18
अफगाणिस्तानने उघडला नवा मार्ग, पाकिस्तानमध्ये हाहाकार; सीमेवरील व्यापार बंदीचा उलटाच झाला परिणाम
19
Holiday: डिसेंबरमध्ये शेअर बाजारात ९ दिवस कामकाज बंद! तुमचं ट्रेडिंग प्लॅनिंग आजच करा! ही घ्या सुट्टीची संपूर्ण यादी
20
यशस्वीची 'तेरे नाम' हेअर स्टाइल पाहून विराटमध्ये अवतरला सलमान; "लगन लगी.." स्टेप्सचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कधी पालटेल चित्र?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2016 02:16 IST

तमाम भारतीयांचे कोणत्या एका बाबीवर एकमत असेल, तर ते म्हणजे शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे आणि त्यांना हलाखीच्या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी खूप काही

तमाम भारतीयांचे कोणत्या एका बाबीवर एकमत असेल, तर ते म्हणजे शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे आणि त्यांना हलाखीच्या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी खूप काही व तेदेखील तातडीने करणे आवश्यक आहे! ज्या शेतकऱ्यांनी १९७० च्या दशकात हरितक्रांती घडवून, अन्नधान्यासाठी भिकेचा कटोरा घेऊन जगापुढे तोंड वेंगाडणाऱ्या या देशाला स्वयंपूर्णच नव्हे तर निर्यातदार बनविले, त्या शेतकऱ्यावर आज आत्महत्त्येची पाळी येण्यामागील नेमक्या कारणांचा शोध अद्यापही कुणालाच घेता आलेला नाही. देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला खरा; पण ज्यांनी हा चमत्कार घडवून आणला, त्यांच्या पदरात काहीही पडले नाही, ही दुर्दैवी असली तरी वस्तुस्थिती आहे. आता २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या बाता केल्या जात आहेत. उत्पन्न दुप्पट करण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक उत्पादन दुप्पट करणे किंवा दर दुप्पट करणे! दुसरी शक्यता दुरापास्त असल्याने उत्पादन दुप्पट करावे लागेल. त्यासाठी देशातील कृषी संशोधन संस्थांना संशोधनाच्या क्षेत्रात चमत्कार घडवून आणावा लागेल. हरितक्रांतीच्या वेळी तसे घडले पण कृषी संशोधन संस्थांना यामध्ये सातत्य राखता आले नाही. कृषी संशोधन संस्थांची कामगिरी खालावण्यामागील कारणांचा शोध घेतला असता, असे निदर्शनास येते की हरितक्रांतीनंतर नव्या संशोधनाला, नव्या तंत्रज्ञानाच्या निर्मितीला जणू काही ग्रहणच लागले. त्यामागचे कारण म्हणजे, या संस्थांना ज्या प्रमाणात वित्त पुरवठा व्हायला हवा होता, त्या प्रमाणात तो झाला नाही. उपलब्ध आकडेवारीनुसार, २०१० मध्ये भारताने कृषी जीडीपीचा ३१ टक्के हिस्सा संशोधनावर खर्च केला होता. त्याच वर्षी चीनने जवळपास ६० टक्के हिस्सा, तर बांगलादेशसारख्या अविकसित देशानेही ३८ टक्के हिस्सा संशोधनावर खर्च केला. हुशार विद्यार्थ्यांचा कृषी क्षेत्राकडे कल नसणे, हे कृषी संशोधनाला खीळ बसण्याचे दुसरे प्रमुख कारण आहे. तेव्हा सरकारला खरोखरच कृषी क्षेत्रातील उत्पादन दुप्पट करावयाचे असेल, तर या दोन बाबींकडे तातडीने लक्ष पुरविणे आवश्यक आहे. अर्थात तेवढेच पुरेसे नाही. पाणी व विजेची उपलब्धता हे आणखी दोन महत्त्वपूर्ण पैलू आहेत. या सगळ्यांची सांगड नीट जुळली तरी, मागणीच्या तुलनेत उत्पादन वाढले की दर कोसळतात, हा अर्थशास्त्रामधील महत्त्वाचा सिद्धांत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याच्या वाटेत आडवा येईलच! थोडक्यात काय, तर शेतकऱ्याचे दिवस पालटण्याची चिन्हे काही दृष्टिपथात नाहीत, असेच म्हणावे लागेल!