शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

कधी पालटेल चित्र?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2016 02:16 IST

तमाम भारतीयांचे कोणत्या एका बाबीवर एकमत असेल, तर ते म्हणजे शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे आणि त्यांना हलाखीच्या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी खूप काही

तमाम भारतीयांचे कोणत्या एका बाबीवर एकमत असेल, तर ते म्हणजे शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे आणि त्यांना हलाखीच्या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी खूप काही व तेदेखील तातडीने करणे आवश्यक आहे! ज्या शेतकऱ्यांनी १९७० च्या दशकात हरितक्रांती घडवून, अन्नधान्यासाठी भिकेचा कटोरा घेऊन जगापुढे तोंड वेंगाडणाऱ्या या देशाला स्वयंपूर्णच नव्हे तर निर्यातदार बनविले, त्या शेतकऱ्यावर आज आत्महत्त्येची पाळी येण्यामागील नेमक्या कारणांचा शोध अद्यापही कुणालाच घेता आलेला नाही. देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला खरा; पण ज्यांनी हा चमत्कार घडवून आणला, त्यांच्या पदरात काहीही पडले नाही, ही दुर्दैवी असली तरी वस्तुस्थिती आहे. आता २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या बाता केल्या जात आहेत. उत्पन्न दुप्पट करण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक उत्पादन दुप्पट करणे किंवा दर दुप्पट करणे! दुसरी शक्यता दुरापास्त असल्याने उत्पादन दुप्पट करावे लागेल. त्यासाठी देशातील कृषी संशोधन संस्थांना संशोधनाच्या क्षेत्रात चमत्कार घडवून आणावा लागेल. हरितक्रांतीच्या वेळी तसे घडले पण कृषी संशोधन संस्थांना यामध्ये सातत्य राखता आले नाही. कृषी संशोधन संस्थांची कामगिरी खालावण्यामागील कारणांचा शोध घेतला असता, असे निदर्शनास येते की हरितक्रांतीनंतर नव्या संशोधनाला, नव्या तंत्रज्ञानाच्या निर्मितीला जणू काही ग्रहणच लागले. त्यामागचे कारण म्हणजे, या संस्थांना ज्या प्रमाणात वित्त पुरवठा व्हायला हवा होता, त्या प्रमाणात तो झाला नाही. उपलब्ध आकडेवारीनुसार, २०१० मध्ये भारताने कृषी जीडीपीचा ३१ टक्के हिस्सा संशोधनावर खर्च केला होता. त्याच वर्षी चीनने जवळपास ६० टक्के हिस्सा, तर बांगलादेशसारख्या अविकसित देशानेही ३८ टक्के हिस्सा संशोधनावर खर्च केला. हुशार विद्यार्थ्यांचा कृषी क्षेत्राकडे कल नसणे, हे कृषी संशोधनाला खीळ बसण्याचे दुसरे प्रमुख कारण आहे. तेव्हा सरकारला खरोखरच कृषी क्षेत्रातील उत्पादन दुप्पट करावयाचे असेल, तर या दोन बाबींकडे तातडीने लक्ष पुरविणे आवश्यक आहे. अर्थात तेवढेच पुरेसे नाही. पाणी व विजेची उपलब्धता हे आणखी दोन महत्त्वपूर्ण पैलू आहेत. या सगळ्यांची सांगड नीट जुळली तरी, मागणीच्या तुलनेत उत्पादन वाढले की दर कोसळतात, हा अर्थशास्त्रामधील महत्त्वाचा सिद्धांत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याच्या वाटेत आडवा येईलच! थोडक्यात काय, तर शेतकऱ्याचे दिवस पालटण्याची चिन्हे काही दृष्टिपथात नाहीत, असेच म्हणावे लागेल!