शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

कधी पालटेल चित्र?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2016 02:16 IST

तमाम भारतीयांचे कोणत्या एका बाबीवर एकमत असेल, तर ते म्हणजे शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे आणि त्यांना हलाखीच्या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी खूप काही

तमाम भारतीयांचे कोणत्या एका बाबीवर एकमत असेल, तर ते म्हणजे शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे आणि त्यांना हलाखीच्या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी खूप काही व तेदेखील तातडीने करणे आवश्यक आहे! ज्या शेतकऱ्यांनी १९७० च्या दशकात हरितक्रांती घडवून, अन्नधान्यासाठी भिकेचा कटोरा घेऊन जगापुढे तोंड वेंगाडणाऱ्या या देशाला स्वयंपूर्णच नव्हे तर निर्यातदार बनविले, त्या शेतकऱ्यावर आज आत्महत्त्येची पाळी येण्यामागील नेमक्या कारणांचा शोध अद्यापही कुणालाच घेता आलेला नाही. देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला खरा; पण ज्यांनी हा चमत्कार घडवून आणला, त्यांच्या पदरात काहीही पडले नाही, ही दुर्दैवी असली तरी वस्तुस्थिती आहे. आता २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या बाता केल्या जात आहेत. उत्पन्न दुप्पट करण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक उत्पादन दुप्पट करणे किंवा दर दुप्पट करणे! दुसरी शक्यता दुरापास्त असल्याने उत्पादन दुप्पट करावे लागेल. त्यासाठी देशातील कृषी संशोधन संस्थांना संशोधनाच्या क्षेत्रात चमत्कार घडवून आणावा लागेल. हरितक्रांतीच्या वेळी तसे घडले पण कृषी संशोधन संस्थांना यामध्ये सातत्य राखता आले नाही. कृषी संशोधन संस्थांची कामगिरी खालावण्यामागील कारणांचा शोध घेतला असता, असे निदर्शनास येते की हरितक्रांतीनंतर नव्या संशोधनाला, नव्या तंत्रज्ञानाच्या निर्मितीला जणू काही ग्रहणच लागले. त्यामागचे कारण म्हणजे, या संस्थांना ज्या प्रमाणात वित्त पुरवठा व्हायला हवा होता, त्या प्रमाणात तो झाला नाही. उपलब्ध आकडेवारीनुसार, २०१० मध्ये भारताने कृषी जीडीपीचा ३१ टक्के हिस्सा संशोधनावर खर्च केला होता. त्याच वर्षी चीनने जवळपास ६० टक्के हिस्सा, तर बांगलादेशसारख्या अविकसित देशानेही ३८ टक्के हिस्सा संशोधनावर खर्च केला. हुशार विद्यार्थ्यांचा कृषी क्षेत्राकडे कल नसणे, हे कृषी संशोधनाला खीळ बसण्याचे दुसरे प्रमुख कारण आहे. तेव्हा सरकारला खरोखरच कृषी क्षेत्रातील उत्पादन दुप्पट करावयाचे असेल, तर या दोन बाबींकडे तातडीने लक्ष पुरविणे आवश्यक आहे. अर्थात तेवढेच पुरेसे नाही. पाणी व विजेची उपलब्धता हे आणखी दोन महत्त्वपूर्ण पैलू आहेत. या सगळ्यांची सांगड नीट जुळली तरी, मागणीच्या तुलनेत उत्पादन वाढले की दर कोसळतात, हा अर्थशास्त्रामधील महत्त्वाचा सिद्धांत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याच्या वाटेत आडवा येईलच! थोडक्यात काय, तर शेतकऱ्याचे दिवस पालटण्याची चिन्हे काही दृष्टिपथात नाहीत, असेच म्हणावे लागेल!