शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षलागवडीचे इव्हेंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 04:04 IST

देशात जंगलक्षेत्र वाढल्याचा द्विवार्षिक वनअहवाल तिकडे केंद्रीय पर्यावरण मंत्रालय प्रसिद्ध करीत असतानाच इकडे महाराष्टÑात मराठवाडा, खान्देश आणि विदर्भ मात्र अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सामना करीत होता

देशात जंगलक्षेत्र वाढल्याचा द्विवार्षिक वनअहवाल तिकडे केंद्रीय पर्यावरण मंत्रालय प्रसिद्ध करीत असतानाच इकडे महाराष्टÑात मराठवाडा, खान्देश आणि विदर्भ मात्र अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सामना करीत होता. हा निव्वळ योगायोग अजिबात नव्हता. आमचे आणि आमच्या मागच्या पिढीच्या कर्माचे हे फळ आहे, असेच समजावे लागेल. भारताचे वनक्षेत्र सात लाख आठ हजार २७३ चौरस किलोमीटर आहे. एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ते २१.५४ टक्के इतके आहे. या वनअहवालानुसार भारताच्या वृक्ष आणि वनक्षेत्रात आठ हजार २१ चौरस कि.मी. म्हणजेच एक टक्का वाढ झाली आहे. त्यामुळेच भारत जगभरात या बाबतीत दहाव्या क्रमांकावर आला आहे. या कामिगिरीचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. या अहवालानुसार देशातील आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, ओडिशा आणि तेलंगणा या राज्यांनी आपल्या वनक्षेत्रात वाढ केली असली तरी महाराष्टÑ मात्र आहे तिथेच आहे. दुसºया एका अहवालानुसार उलट त्यात घट झाली आहे. जंगलात पाणवठे निर्माण करण्यात मात्र महाराष्टÑाने संपूर्ण देशात आघाडी घेतली आहे एवढेच काय ते समाधान. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट जाहीर केले. गेल्या दोन वर्षांत साडेसात कोटी वृक्ष लावलेही; पण त्यातली जगली किती, हे माहीत नाही. सलग पाचव्या वर्षी किमान ४० टक्के झाडे वाचली तीच वृक्षलागवड यशस्वी समजली जाते. सरकारकडे अशी कुठलीच आकडेवारी नाही. १९८८ पासून केंद्र सरकारने एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र जंगलाने व्यापले जावे, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या आपण २१.५४ टक्क्यांपर्यंत पोहोचलो आहोत. पल्ला आणखी मोठा असला तरी त्या दिशेने देशाची वाटचाल सुरू असल्याचे हा अहवाल सांगतो; पण महाराष्टÑाचे काय? आम्ही आणि आमचे राज्य सरकार केवळ वृक्षलागवडीचे मोठमोठे इव्हेंट साजरे करतो. आकड्यांचा नुसताच गाजावाजा सुरू आहे. त्यामुळे अल्पसमाधान मिळू शकते. ते चिरकाळ टिकत नाही. आता राज्यभरात रस्त्याची कामे जोरात सुरू आहेत. या कामांसाठी मोठमोठ्या झाडांचा बळी दिला जात आहे. या बदल्यात इतर ठिकाणी त्यापेक्षा जास्त झाडे लावली जात असल्याचे सरकारी अधिकारी सांगत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते हेच ऐकवत आहेत. त्यांचे म्हणणे सत्यच असेल तर मग महाराष्टÑातील जंगलक्षेत्रात अजिबात वाढ का झाली नाही याचे उत्तर मिळत नाही. एकतर ते असे करीतच नसावेत किंवा झाडे लावली तरी त्याकडे पुन्हा पाहिले जात नसावे. याचा अर्थ आम्ही आहे ती झाडे वाचवू शकत नाही आणि नवीन झाडे लावली तरी ती जगवू शकत नाही. मग काय होणार, वातावरणातील तापमान झपाट्याने वाढणार. पावसाळा-हिवाळ्यात बर्फवृष्टी होणार. किडींचा मारा वाढल्याने शेतात कमी पिकणार. पिकले त्याचेही नुकसान होणार. कधीही न ऐकलेले साथींचे आजार येणार. विकासाच्या नावाखाली निसर्ग संपवायला निघाले की हे असे होणारच. वृक्षलागवडीचे मोठे इव्हेंट आणि निसर्गाच्या अशा अवकृपेनंतर केल्या जाणाºया मदतीच्या योजनांवर कोट्यवधी रुपये उधळण्यापेक्षा आहे ती झाडे कशी जगविता येईल, याचा विचार केला पाहिजे. दरवर्षी नव्याने कोट्यवधी झाडे लावण्याचा संकल्प सोडण्यापेक्षा शेकड्यांनीच झाडे लावून सर्वच्या सर्व कशी जगतील-वाढतील, याची काळजी घेतली पाहिजे. ही काळजी केवळ सरकारी पातळीवर घेऊन चालणार नाही, तर सर्वसामान्य माणसांचा सहभागही त्यात तेवढाच महत्त्वाचा आहे. दक्षिणेतील राज्यांत जंगलक्षेत्रात वाढ करून सरकार आणि सर्वसामान्यांनी हे दाखवून दिले आहे. आता वेळ महाराष्टÑाने हे करून दाखविण्याची आहे.