शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

देर भी, अंधेर भी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2016 02:09 IST

सहसा असे होत नाही. एखाद्या गंभीर खटल्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर कोणाला तरी तो अमान्य असतो तर दुसऱ्याला हमखास मान्य असतो. पण खटल्याशी संबंधित सर्वच घटक न्यायालयाच्या निर्णयापायी

सहसा असे होत नाही. एखाद्या गंभीर खटल्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर कोणाला तरी तो अमान्य असतो तर दुसऱ्याला हमखास मान्य असतो. पण खटल्याशी संबंधित सर्वच घटक न्यायालयाच्या निर्णयापायी नाराज होण्याचा आगळा प्रकार घडला आहे. सुमारे चौदा वर्षांपूर्वी गुजरातेत झालेल्या भीषण जातीय दंगलीच्या संबंधातील एका महत्वाच्या खटल्याचा जो निवाडा अहमदाबाद येथील विशेष न्यायालयाचे न्या.पी.बी.देसाई यांनी जाहीर केला आहे त्या निवाड्यावर फिर्यादी, फिर्यादीचा वकील आणि जिने तपास करुन खटला दाखल केला त्या विशेष तपासी यंत्रणेचे प्रमुख अशा तिघांनी असमाधान व्यक्त केले आहे. ज्या आरोपींना न्यायालयाने दोषी मानले आहे तेदेखील त्यांच्यावर ‘अन्याय’ झाल्याचे सांगत नाराजी व्यक्त करणारच आहेत. २००२ साली झालेल्या दंगलीतील सर्वाधिक अमानुष प्रकार म्हणजे अहमदाबाद शहरातील गुलबर्ग सोसायटी येथे दंगेखोरांनी केलेल्या हल्ल्यात झालेली तब्बल ६९ लोकांची निर्घृण हत्त्या. मृतांमध्ये काँग्रेसचे तत्कालीन खासदार एहसान जाफरी यांचादेखील समावेश होता. आपल्या पतीच्या हत्त्येप्रकरणी योग्य तो तपास करुन दोषींना कठोर शिक्षा केली जावी यासाठी जाफरी यांच्या पत्नी झाकीया यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्याचा परिणाम म्हणून मग सात वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने एक आदेश जारी करुन स्वत:च्या देखरेखीखाली विशेष तपासी यंत्रणेच्या मार्फत तपासाला सुरुवात केली. तो पूर्ण होऊन एकूण ६६ जणांविरुद्ध विशेष न्यायालयात जो खटला दाखल झाला त्याचाच निकाल आता जाहीर झाला आहे. न्यायालयाने २४ आरोपींना दोषी मानले, तर ३६ जणांची निर्दोष मुक्तता केली. ज्या २४ जणांना दोषी मानले आहे त्यातील १३जणांवर मनुष्यहत्त्येचे कलम सिद्ध झाल्याने त्यांना कदाचित मृत्यूदंड वा आजन्म कारावास होऊ शकतो. शिक्षेची सुनावणी येत्या सोमवारी होणार आहे. तथापि खुद्द झाकीया जाफरी यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असून न्याय अर्धवट झाला असल्याचे म्हटले आहे. विशेष तपासी पथकाने आपले काम चोखपणे बजावले नाही असा आरोपही त्यांनी केला आहे. त्यांचे वकील एस.एम.व्होरा यांनी त्यांच्या अशिलाइतकी कठोर प्रतिक्रिया व्यक्त केली नसली आणि निकालाने आपण समाधानी असल्याचे म्हटले असले तरी ज्यांना न्यायालयाने दोषी मानले आहे त्यांना कठोरतम शिक्षा करण्याची विनंती आपण करणार असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी विशेष तपासी पथकाचे प्रमुख आणि केन्द्रीय गुप्तचर विभागाचे माजी संचालक आर.के.राघवन यांनी मोठ्या प्रमाणात आरोपींना निर्दोष जाहीर करण्यावर नापसंती व्यक्त केली आहे. आपण अगदी व्यवस्थित तपास केला आणि गुलबर्गवरील हल्ला हा सुनियोजित कटाचा भाग असल्याचे सिद्ध करणारे पुरावे सादर केले पण तरीही न्यायालयाने कटाची शक्यता फेटाळून लावून दंगेखोर जमावाची ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया असल्याचे म्हटले असल्याने या निर्णयाविरुद्ध दाद मागण्याबाबत विचार करीत असल्याचेही म्हटले आहे. थोडक्यात आणखी दीर्घकाळ हे प्रकरण रेंगाळणार असून त्याचे वर्णन ‘देर भी और अंधेर भी’ असेच करावे लागेल..