शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

मोहन प्रकाशांच्या उचलबांगडीने राज्यात आनंद

By अतुल कुलकर्णी | Updated: June 25, 2018 04:05 IST

तब्बल दहा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र काँग्रेसला नवीन आणि सक्षम प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या रूपाने मिळाले आहेत

तब्बल दहा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र काँग्रेसला नवीन आणि सक्षम प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या रूपाने मिळाले आहेत. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात काँग्रेसचे प्रभारी म्हणजे माणिकराव ठाकरे आणि शरद रणपिसे या दोघांचीच नावे घेतली जात होती. विद्यमान प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या दोघांचे आपापसात पटत नसले तरी मोहन प्रकाश राज्याचे प्रभारी नको, यावर दोघांचेही एकमत होते. दिल्लीतून कोणताही बडा नेता आला की त्यांच्या पत्रकार परिषदेत मोहन प्रकाश यांना कधी बदलणार हा प्रश्न कायम असायचा. जणू काही मोहन प्रकाशना बदलणे म्हणजे बेळगाव सीमाप्रश्नच बनला होता. अगदी काही दिवसांपूर्वी पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष राहुल गांधी मुंबईत आले, त्यांनी कथित तीन मिनिटांची पत्रकार परिषद घेतली पण तेथेही मोहन प्रकाश यांना कधी बदलणार हाच विषय चर्चेत होता.राज्यात ठरावीक नेत्यांना जवळ करायचे, आपले निर्णय लादताना परिस्थितीचा विचारच करायचा नाही याचे फटके कारण नसताना राज्यात काँग्रेसला बसले. पालघरची जागा काँग्रेसने लढवू नये असे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण सांगत होते पण त्यावर याच मोहन प्रकाश यांनी आग्रह करून ती जागा आपणच लढायची असा आग्रह धरला. काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र गावित यांनी पालघरमधून उमेदवारी मागूनही त्यांच्या बाबतीत मोहन प्रकाश यांनी शेवटपर्यंत निर्णय घेतला नाही. शेवटी ते भाजपात गेले आणि विजयी झाले. गोंदियातसुद्धा नाना पटोलेंना तिकीट देण्याचा विचार मोहन प्रकाश आणि माणिकराव ठाकरे यांनी हाणून पाडला.सगळ्यात गंभीर प्रकरण घडले ते विधानपरिषद निवडणुकीच्यावेळी. अमरावती मतदारसंघात काँग्रेसकडे १२८ तर राष्टÑवादीकडे ३२ अशी एकूण १६० मते होती. येथून काँग्रेसने अनिल मधोगडिया यांना उभे केले होते. त्यांना १६० पैकी फक्त १७ मते मिळाली. स्वत:च्या पक्षाची मतेही त्यांना मिळू शकली नाहीत. या निवडणुकीची जबाबदारी माणिकराव ठाकरे व यशोमती ठाकूर यांच्याकडे होती. मात्र या दारुण पराभवानंतरही मोहन प्रकाश यांनी ठाकरे यांना एका शब्दाने जाब विचारला नाही.ठरावीक लोकांना सोबत घ्यायचे आणि त्यांच्याच कलाने काम करायचे या वागण्याने राज्यातल्या अनेक निवडणुकांमध्ये काँग्रेसला फटके बसले. खा. अशोक चव्हाण आणि त्यांच्यात संवादच संपुष्टात आला होता.अनेक जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष निवडताना देखील ठरावीक लोकांनाच जवळ करायचे, जिल्ह्यातील अन्य महत्त्वाच्या नेत्यांना विचारायचे नाही, अशा एककल्ली वृत्तीमुळे राज्यात त्यांच्या बाजूने बोलायला दोन नेते सोडले तर कुणीही उरले नव्हते. मुंबईत संजय निरुपम यांना ते सतत पाठीशी घालतात असा आरोप होत असे. परिणामी सतत त्यांच्याविरोधात दिल्लीत तक्रारी जाऊ लागल्या. ए.के. अ‍ॅन्टोनी यांच्यानंतर राज्यात प्रभारी म्हणून आलेल्या मोहन प्रकाश यांची कारकिर्द अखेर संपुष्टात आली आहे.आता मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे प्रभारीपदाची सूत्रे आली आहेत. खर्गे अभ्यासू आहेत. शिवाय दिल्लीत ते पक्षाचे लोकसभेत नेते आहेत. परिणामी अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या दोन्ही बड्या नेत्यांना आपल्या शब्दात ठेवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. शिवाय त्यांना मराठी समजते. त्यामुळे येत्या काळात राज्य काँग्रेसमध्ये मोठे बदल घडले तर आश्चर्याचे कारण नाही.- अतुल कुलकर्णी