शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

शत्रूचा शत्रू तो मित्र...

By admin | Updated: May 23, 2016 03:49 IST

अरुण जेटली आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्यात फार मोठे सख्य असल्याचा इतिहास नाही.

केन्द्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्यात फार मोठे सख्य असल्याचा इतिहास नाही. उलटपक्षी कर्जावरील व्याजदरात कपात करण्याच्या मुद्द्यावर दोहोंमध्ये असलेले मतभेद यापूर्वी उघडही झाले आहेत. देशातील उद्योगांना चालना मिळावी आणि जेणेकरून सरकारी खजिन्यातील आवकेत भर पडावी यासाठी अर्थमंत्री या नात्याने जेटली व्याजदरातील कपातीचे प्रथमपासून आग्रही होते व आजही आहेत. त्याउलट कर्जे स्वस्त झाली तर चलनवाढीचा वेग वाढेल ही राजन यांच्या मनातील भीती असल्याने त्यांनी कधीही जेटली यांना उपकृत केले नाही. चलनवाढ आटोक्यात ठेवण्याची जबाबदारी प्राय: े्नसरकारची असते, तर वित्तपुरवठ्याचे नियंत्रण हा भाग पूर्णपणे रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीतला असतो. त्याबाबत राजन यांनी उघड उघड सरकारच्या कामकाजावर प्रसंगी टीकादेखील केली आहे. अशा परिस्थितीत जेटली यांनीच राजन यांच्याविषयी प्रशंसोद्गार काढावेत आणि त्यांना ‘तीक्ष्ण आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचे’ असे विशेषण बहाल करावे याचे काहींना जरूर आश्चर्य वाटू शकेल. पण तसे वाटण्याचे काही कारण नाही. राजन यांची नियुक्ती संपुआच्या द्वितीय सत्ताकाळात झाली होती आणि जोवर संपुआ सत्तेत होती तोवर राजन यांनी त्या सरकारच्या विरोधात कधीही ब्र उच्चारला नाही पण भाजपा सरकारवर मात्र ते प्रत्यही टीका करीत असतात. याबद्दलचा राग व्यक्त करण्यासाठी भाजपाच्या काही खासदारांनी जेटली यांची भेट घेतली असता जेटली यांनी या खासदारांची समजूत काढताना राजन यांच्याविषयी आदरभाव व्यक्त केला. त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण वा कारक म्हणजे भाजपाने अलीकडेच ज्यांना राज्यसभेचे सदस्यत्व बहाल करून उपकृत केले ते सुब्रह्मण्यम स्वामी. स्वामी स्वत:ला थोर अर्थतज्ज्ञ मानतात आणि जेटलींपेक्षा आपणच कितीतरी पटींनी अधिक चांगले अर्थमंत्री होऊ शकतो असा त्यांचा दावा आहे. पण स्वामींच्या लक्ष्यावर एकटे जेटली नाहीत, रघुराम राजन हेदेखील आहेत. राजन यांना गव्हर्नरपदाची मुदतवाढ देण्याच्या ते विरोधात आहेत व तसे पत्रदेखील त्यांनी पंतप्रधानांना दिले आहे. या स्थितीत शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने जेटलींना राजन यांच्याविषयी ममत्व वाटणे स्वाभाविकच ठरते.