शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
3
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
4
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
5
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
6
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
7
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
8
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
9
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
10
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
11
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
12
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
13
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
14
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
15
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
16
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
18
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
19
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
20
'आता मतदार काय ते ठरवतील', विरोध करूनही दिलीप मानेना प्रवेश, सुभाष देशमुखांचा भाजपला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शांतीदूताची अखेर

By admin | Updated: September 29, 2016 04:14 IST

‘तुम्हाला मुलं असतील तर तुम्ही त्यांना न्याहारीसाठी झेंडे आणि जेवणासाठी बंदुकीच्या गोळ्या देऊ शकत नाही, त्यांना चांगल्या शिक्षणाची गरज आहे. ते द्या. संघर्षात शक्ती

‘तुम्हाला मुलं असतील तर तुम्ही त्यांना न्याहारीसाठी झेंडे आणि जेवणासाठी बंदुकीच्या गोळ्या देऊ शकत नाही, त्यांना चांगल्या शिक्षणाची गरज आहे. ते द्या. संघर्षात शक्ती खर्च करण्यापेक्षा ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान आणि उद्योग यावर पैसा आणि शक्ती खर्च करा, अन्यथा तुम्हाला काहीही भविष्य नाही’, हा सल्ला पाकिस्तानच्या आजच्या शासकांना भलेही लागू पडणारा असला आणि त्यांनी तो अंमलात आणणे त्यांच्याच हिताचे असले तरी प्रत्यक्षात तो वीसेक वर्षांपूर्वी अरबांना दिला होता सिमॉन पेरेस यांनी. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले व इस्त्रायलच्या निर्मितीचा अखेरचा शिल्पकार काळाआड गेला. इस्त्रायलला लष्करीदृष्ट्या सक्षम बनवितानाच शस्त्रास्त्र निर्मितीच्या क्षेत्रात अग्रेसर बनविणारे पेरेस दोनदा पंतप्रधान म्हणून निवडले गेले व अखेर ते त्या देशाचे अध्यक्षदेखील बनले. मंत्रिमंडळातील सर्व महत्वाच्या खात्यांची जबाबदारी पेलणारे पेरेस ओळखले जातात ते प्रामुख्याने अरब आणि इस्त्रायल दरम्यानच्या संघर्षाची इतिश्री करणारे नेते म्हणून. हा संघर्ष संपवून त्यांनी ख्रिश्चन आणि इस्लाम या दोन्ही धर्मांचे प्रमुख ठिकाण असणारे जेरुसलेम तणावमुक्त केले आणि तितकेच नव्हे तर पॅलेस्टिनी लिबरेशन आॅर्गनायझेशनचा (पीएलओ) स्वयंशासनाचा अधिकारही त्यांनी मान्य केला. अत्यंत संघर्षशील व्यक्तिमत्व ते शांतीदूत हा त्यांचा प्रवास मोठा मनोज्ञ ठरला. पीएलओचे यासर अराफत यांच्याशी शांतता करार करण्याबाबत पुढाकार घेताना ते परराष्ट्र मंत्री होते पण त्यांनी तत्कालीन पंतप्रधान यित्झॅक रेबीन यांनाही राजी केले आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या साक्षीने शांती करार केला गेला (ओस्लो अ‍ॅकॉर्ड) व त्या प्रित्यर्थ पेरेस, रेबीन आणि यासर अराफत यांना शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान केला गेला. परंतु हा करार जेमतेम सातेक वर्ष टिकू शकला आणि संघर्ष पुन्हा सुरु झाला. तब्बल सहा दशके सिमॉन पेरेस इस्त्रायली राजकारणात सक्रीय होते. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात खुद्द अमेरिकेशीही संघर्ष निर्माण झाला होता. साहजिकच एक वादग्रस्त नेता अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती. परंतु आयुष्याच्या उत्तरार्धात ते त्या देशातील सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले. त्यामुळे दीर्घ काळची आपली वादग्रस्त प्रतिमा आणि नंतरची लोकप्रियता यापैकी नेमके कोणते सुखकर हे कळत नाही असे ते म्हणत व ते खरे होते.