शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

एल्फिन्स्टन अपघातानंतरचे मंथन : रेल्वेच्या सुरक्षेत निधीइतकीच इच्छाशक्तीही महत्वाची!

By डॉ. अनिल काकोडकर | Updated: October 6, 2017 07:00 IST

भारतभरातील रेल्वेच्या सुरक्षिततेचा अनेक अंगांनी विचार करून उपाय सुचविण्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने अहवाल सादर करून पाच वर्षे उलटली आहेत. गेल्या पाच वर्षांत वेळोवेळी झालेल्या रेल्वे अपघात वा दुर्घटनांच्या बातम्या वा विश्लेषणात्मक भाष्यात याच काकोडकर समितीचा उल्लेख वा संदर्भ आल्याखेरीज राहात नाही. मुंबईत एलफिन्स्टन रोड (आता प्रभादेवी) येथील पुलावर झालेल्या ...

ठळक मुद्देअहवाल सादर करून पाच वर्षे झाली, याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने काढला जातोभारतभरातील 19 हजार किलोमीटर लांबीच्या रेल्वेच्या सुरक्षा-सुधारणांसाठी पाच वर्षांमध्ये एक लाख कोटी रुपये खर्चावे लागतीलढोबळ मानाने रेल्वेच्या पायाभूत सोईसुविधांचा ढाचा कसा असावा याचा पूर्णत: आढावा घेतलेला होता

भारतभरातील रेल्वेच्या सुरक्षिततेचा अनेक अंगांनी विचार करून उपाय सुचविण्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने अहवाल सादर करून पाच वर्षे उलटली आहेत. गेल्या पाच वर्षांत वेळोवेळी झालेल्या रेल्वे अपघात वा दुर्घटनांच्या बातम्या वा विश्लेषणात्मक भाष्यात याच काकोडकर समितीचा उल्लेख वा संदर्भ आल्याखेरीज राहात नाही. मुंबईत एलफिन्स्टन रोड (आता प्रभादेवी) येथील पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत २३ जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतरही तसा संदर्भ स्वाभाविकपणे आला. समितीच्या शिफारशी आणि देशभरातील रेल्वेची सुरक्षितता याचा अगदी संक्षेपात आढावा घ्यायचा म्हटले, तर निधी उभा करण्याइतकीच उपाय अमलात आणण्यासाठीची इच्छाशक्तीही महत्वाची आहे, हे तर अधोरेखित करावे लागेल.

अहवाल सादर करून पाच वर्षे झाली, याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने काढला जातो. पण मी स्वत: या विधानाकडे निराशावादी भूमिकेतून पाहात नाही. याचाच एक अर्थ असा, की काहीही सुधारणा घडलेल्या नाहीत, असा समज करून घेणे चुकीचे ठरेल. मुदलात या समितीच्या स्थापनेमागे ‘आऊट आॅफ बॉक्स’ विचार व्हावा, असा हेतू होता. म्हणूनच रेल्वेच्या प्रचलित व्यवस्थेतील मंडळींना त्यात समाविष्ट केले गेले नव्हते. कारण आपल्याच व्यवस्थेतील सुधारणांचा प्रश्न आला, की त्यातील वरिष्ठांचा कल आधीच्या कृतींचा बचाव करण्याकडे असतो. म्हणूनच अंतराळ संशोधक नागाराजन वेदाचलम, कोकण रेल्वेचे शिल्पकार ई. श्रीधरन, बीएआरसीतील जी.पी. श्रीवास्तव आणि आयआयटी कानपूरचे तत्कालिन संचालक संजय दांडे यांचा समितीत समावेश करण्यात आला होता. दिनेश त्रिवेदी रेल्वेमंत्री असताना ही समिती स्थापन झाली आणि आठ महिन्यांच्या अवधीत अहवालही सादर झाला. समितीच्या शिफारशींचा ढोबळ मानाने उल्लेख करायचा तर तो एक पंचवार्षिक आराखडा होता.

भारतभरातील 19 हजार किलोमीटर लांबीच्या रेल्वेच्या सुरक्षा-सुधारणांसाठी पाच वर्षांमध्ये एक लाख कोटी रुपये खर्चावे लागतील, अशा स्वरूपाच्या शिफारशी त्यात केल्या होत्या. अगदी सूक्ष्म पणाने एल्फिन्स्टनसारख्या घटनांचा त्यात विचार केलेल नव्हता. पण ढोबळ मानाने रेल्वेच्या पायाभूत सोईसुविधांचा ढाचा कसा असावा याचा पूर्णत: आढावा घेतलेला होता. मुंबईच्या उपनगरी रेल्वेच्या समस्या खूप वेगळ्या आहेत. विशेषत: लोकसंख्या आणि व्यवस्था यांच्या विषम प्रमाणातून पडणाºया ताणाच्या भोवती मुंबईच्या रेल्वेचे प्रश्न फिरत राहातात.

मुख्यत्वे, देशभरातील सर्वच्या सर्व लेव्हल क्रॉसिंग्ज बंद करण्याच्या आग्रही शिफारशीचा यात समावेश होता. वरकरणी हे खर्चिक वाटले तरी सध्या त्यातून होणारे अपघात व तेथे तैनात केले जाणारे मनुष्यबळ यांचा विचार करता सात ते आठ वर्षांत प्रत्यक्षात रेल्वेची बचतच होणे अपेक्षित होते. हे मनुष्यबळ अन्यत्र वापरणे आणि स्थानिक स्वराज्य संस्था वा राज्य सरकारे यांच्या सहकार्याने रेल्वे फाटकाच्या जागी उड्डाणपूल किंवा सब-वे बांधणे अभिपे्रत आहे. यातून रेल्वे वाहतुकीचा वेग वाढेल, शिवाय अपघातांची संख्या आटोक्यात राहील. देशभरातील सिग्नल यंत्रणा तांत्रिक दृष्ट्या अधिक सक्षम करणे, रेल्वेचा प्रशासकीय ढाचा विशेषत: रेल्वे बोर्डाची रचना बदलणे, रेल्वेच्या बोगींची रचना (डिझाइन) बदलणे यांसारख्या शिफारसींचा समावेश अहवालात आहे. सेफटी रेग्युलेशनसाठी रेल्वे बोर्डाव्यतिरिक्त स्वतंत्र यंत्रणा असावी, ही शिफारस रेल्वेच्या विद्यमान यंत्रणेच्या पचनी पडणे कठीण असल्याची कल्पना आहे. पण ते आज ना उद्या करावे लागेल.

परदेशात अनेक मोठ्या शहरांमध्ये इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टिमचा अंगिकार केलेला दिसतो. आपल्याकडेही रेल्वे, एलिव्हेटेड रेल्वे, मेट्रो, बस आणि मोनो रेल्वे अशा साºया वाहतूक व्यवस्थांचा एकत्रितपणे विचार करणे अपरिहार्य आहे. समाधानाची बाब अशी, की समितीच्या शिफारशी तेव्हा केंद्राने आणि रेल्वेने तत्वत: स्वीकारून मान्य केल्या आहेत. आता प्रश्न प्रत्यक्ष अंमलबजावणीचा आहे. त्यासाठी लागणारा निधी मोठा आहे. पण, निधी इतकाच इच्छाशक्तीचा मुद्दाही कळीचा आहे.

एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावर झालेल्या अपघातानंतर या साºया गोष्टींचा नव्याने सार्वजनिकरित्या विचार होतो. त्याने अंमलबजावणीसाठीचा रेटा वाढला तर आश्चर्य वाटू नये. आज ना उद्या अधिक वेगाने अंमलबजावणी होईल याबाबत मी स्वत: अजूनही आशावादी आहे.

(लेखक प्रख्यात अणुशास्त्रज्ञ आहेत आणि रेल्वे सेफ्टीसाठी नेमलेल्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्षही होते. )

 

टॅग्स :Elphinstone Stampedeएलफिन्स्टन चेंगराचेंगरीMumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वेMumbai Localमुंबई लोकलIndian Railwayभारतीय रेल्वे