शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

खटले निकाली काढायलाच हवेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 12:36 IST

देशभरात सुमारे 10 लाख खटले प्रलंबित असल्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्याची गंभीर दखल घेत सर्वोच्च व उच्च न्यायालयाने प्रलंबित खटले निकाली काढण्याचे आदेश दिले.

विनायक पात्रुडकर

साड्या चोरल्याचा खटला महानगर दंडाधिकारी न्यायालयाने 30 वर्षांनी निकाली काढला. यातील चोर पोलिसांना सापडलेच नाहीत. परिणामी न्यायालयाने हा खटला निकाली काढला. कोणी पाकिटे चोरली, तर कोणी अन्य काही तरी चोरले. याचे खटले दाखल झाले. वर्षानुवर्षे याची तारीख पडत राहिली. या खटल्यांचा निकाल काही लागत नाही. कारण खटल्यातील आरोपी सापडत नाही किंवा त्याचा मृत्यू झालेला असतो. काही प्रकरणात अर्जदाराचा मृत्यू झालेला असतो. काही प्रकरणात साक्षीदाराचा मृत्यू झालेला असतो. काही प्रकरणात तर पोलिसांकडे ठोस पुरावे नसतात. अखेर संशयाचा फायदा देत न्यायालय आरोपीची सुटका करते अथवा खटला बंद करण्याचे आदेश देते. ही परिस्थिती देशातील प्रत्येक न्यायालयात आहे. देशभरात सुमारे 10 लाख खटले प्रलंबित असल्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्याची गंभीर दखल घेत सर्वोच्च व उच्च न्यायालयाने प्रलंबित खटले निकाली काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार कनिष्ठ न्यायालयांनी प्रलंबित खटले निकाली काढण्याचा सपाटा लावला. त्यामध्ये हास्यास्पद प्रकरणे समोर आली.

साड्या चोरणारे जर पोलिसांना सापडत नसतील तर ती अजबच गोष्ट म्हणावी लागेल.मात्र अशा प्रकरणांवर आता ठोस तोडगा काढायला हवा. त्यासाठी स्वतंत्र न्यायालयाने स्थापन करायला हवीत. या न्यायालयांना योग्य त्या सुविधा देऊन वेळेच निर्बंध द्यावेत. तरच प्रलंबित खटले निकाली निघतील. पोलिसांनीही तपास करताना त्यात कोठेही संदेह राहणार नाही याची काळजी घ्यायला हवी. बहुतांश प्रकरणात तर साक्षीदार घुमजाव करतात. मध्यंतरी  अशा प्रकरणांचे प्रमाण वाढले होते. त्याची दखल घेत न्यायालयाने पोलिसांना फटकारले होते. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर महिला अत्याचार खटल्यांसाठी स्वतंत्र न्यायालये स्थापन करण्यात आली. या न्यायालयांध्ये न्यायाधीशांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच महिला असाव्यात, असे फर्मान जारी करण्यात आले़ तरीही महिला अत्याचारांच्या खटल्यांची संख्या कमी झालेली नाही़ अशी स्थिती इतर खटल्यांची होऊ नये. मुळात सुनावणी सुरू होण्याआधी पुराव्यांची कागदपत्रे, साक्षीदारांची यादी व इतर तपशील न्यायालयाला दिला जातो. तरीही बहुतांश वेळा आरोपीचे वकील काही ना काही कारण देऊन पुढची तारीख घेतात. काहीवेळा कागदपत्रांमध्ये दोष आढळतो. या सर्व गोष्टी टाळता येणे शक्य आहे. प्रत्यक्षात तसे होत नाही. त्यामुळेच खटल्यांची संख्या तुंबत जाते़ मात्र आतापर्यंतची ही परिस्थिती बदलायला हवी. पोलिसांपासून ते न्यायालयीन कर्मचाऱ्यांपर्यंत . अन्यथा कितीही उपाय योजना केल्या तरी हा पसारा तसाच राहील.  

टॅग्स :Courtन्यायालय