शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
4
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
5
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
6
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
7
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
8
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
9
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
11
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
12
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
13
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
14
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
15
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
16
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
17
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
18
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
19
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
20
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

खटले निकाली काढायलाच हवेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 12:36 IST

देशभरात सुमारे 10 लाख खटले प्रलंबित असल्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्याची गंभीर दखल घेत सर्वोच्च व उच्च न्यायालयाने प्रलंबित खटले निकाली काढण्याचे आदेश दिले.

विनायक पात्रुडकर

साड्या चोरल्याचा खटला महानगर दंडाधिकारी न्यायालयाने 30 वर्षांनी निकाली काढला. यातील चोर पोलिसांना सापडलेच नाहीत. परिणामी न्यायालयाने हा खटला निकाली काढला. कोणी पाकिटे चोरली, तर कोणी अन्य काही तरी चोरले. याचे खटले दाखल झाले. वर्षानुवर्षे याची तारीख पडत राहिली. या खटल्यांचा निकाल काही लागत नाही. कारण खटल्यातील आरोपी सापडत नाही किंवा त्याचा मृत्यू झालेला असतो. काही प्रकरणात अर्जदाराचा मृत्यू झालेला असतो. काही प्रकरणात साक्षीदाराचा मृत्यू झालेला असतो. काही प्रकरणात तर पोलिसांकडे ठोस पुरावे नसतात. अखेर संशयाचा फायदा देत न्यायालय आरोपीची सुटका करते अथवा खटला बंद करण्याचे आदेश देते. ही परिस्थिती देशातील प्रत्येक न्यायालयात आहे. देशभरात सुमारे 10 लाख खटले प्रलंबित असल्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्याची गंभीर दखल घेत सर्वोच्च व उच्च न्यायालयाने प्रलंबित खटले निकाली काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार कनिष्ठ न्यायालयांनी प्रलंबित खटले निकाली काढण्याचा सपाटा लावला. त्यामध्ये हास्यास्पद प्रकरणे समोर आली.

साड्या चोरणारे जर पोलिसांना सापडत नसतील तर ती अजबच गोष्ट म्हणावी लागेल.मात्र अशा प्रकरणांवर आता ठोस तोडगा काढायला हवा. त्यासाठी स्वतंत्र न्यायालयाने स्थापन करायला हवीत. या न्यायालयांना योग्य त्या सुविधा देऊन वेळेच निर्बंध द्यावेत. तरच प्रलंबित खटले निकाली निघतील. पोलिसांनीही तपास करताना त्यात कोठेही संदेह राहणार नाही याची काळजी घ्यायला हवी. बहुतांश प्रकरणात तर साक्षीदार घुमजाव करतात. मध्यंतरी  अशा प्रकरणांचे प्रमाण वाढले होते. त्याची दखल घेत न्यायालयाने पोलिसांना फटकारले होते. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर महिला अत्याचार खटल्यांसाठी स्वतंत्र न्यायालये स्थापन करण्यात आली. या न्यायालयांध्ये न्यायाधीशांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच महिला असाव्यात, असे फर्मान जारी करण्यात आले़ तरीही महिला अत्याचारांच्या खटल्यांची संख्या कमी झालेली नाही़ अशी स्थिती इतर खटल्यांची होऊ नये. मुळात सुनावणी सुरू होण्याआधी पुराव्यांची कागदपत्रे, साक्षीदारांची यादी व इतर तपशील न्यायालयाला दिला जातो. तरीही बहुतांश वेळा आरोपीचे वकील काही ना काही कारण देऊन पुढची तारीख घेतात. काहीवेळा कागदपत्रांमध्ये दोष आढळतो. या सर्व गोष्टी टाळता येणे शक्य आहे. प्रत्यक्षात तसे होत नाही. त्यामुळेच खटल्यांची संख्या तुंबत जाते़ मात्र आतापर्यंतची ही परिस्थिती बदलायला हवी. पोलिसांपासून ते न्यायालयीन कर्मचाऱ्यांपर्यंत . अन्यथा कितीही उपाय योजना केल्या तरी हा पसारा तसाच राहील.  

टॅग्स :Courtन्यायालय