शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

काश्मीरविषयक देशाचं धोरण कोणतं? खरे कोण? ट्रम्प की मोदी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 02:42 IST

अमेरिकेच्या अध्यक्षपदावर असलेला एक जबाबदार नेता काश्मीरबाबत असे वक्तव्य करतो आणि ते पंतप्रधान मोदींच्या नावावर टाकतो तेव्हा ती बाब वादग्रस्त ठरते व देशाचे काश्मीरविषयक नेमके धोरण कोणते हा प्रश्न देशासमोर व जगासमोरही उभा करते.

संसदेत सध्या सुरू असलेल्या गोंधळाचे कारण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे अध्यक्ष इम्रान खान यांना जे ऐकविले (असे म्हटले जाते) ते आहे. काश्मीर प्रश्नाबाबत अमेरिकेने भारत व पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करावी, अशी विनंती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला केली, असे वक्तव्य इम्रान खान यांच्याशी बोलताना ट्रम्प यांनी केले आहे. ट्रम्प यांचे म्हणणे खरे असेल तर ते भारताच्या काश्मीरविषयक भूमिकेच्या थेट विरोधात जाणारे व प्रत्यक्ष नरेंद्र मोदी यांच्याविषयीच अविश्वास उत्पन्न करणारे आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान आम्ही कोणत्याही तिसऱ्या देशाची वा आंतरराष्ट्रीय संघटनेची मध्यस्थी स्वीकारणार नाही.

आमच्यातला वाद आम्ही प्रत्यक्ष परस्परांशी बोलूनच ठरवू ही नीती गेली कित्येक दशके भारताने अवलंबिली आहे व तिची त्याने जाहीर वाच्यताही केली आहे. या स्थितीत डोनाल्ड ट्रम्प यांचे असे वक्तव्य प्रकाशित होणे ही बाब देशाच्या परराष्ट्रीय धोरणाबाबत संशय उत्पन्न करणारी आहे. नवे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर प्रसाद यांनी आम्ही अशी कोणत्याही मध्यस्थीची विनंती अमेरिकेकडे केली नाही, प्रत्यक्ष पंतप्रधानांनीही ती केली नाही हे संसदेत स्पष्टपणे सांगितले. मात्र विरोधी पक्षाला अशी स्पष्ट कबुली प्रत्यक्ष पंतप्रधानांकडून हवी आहे व त्यासाठी ते आग्रह धरीत आहेत. काश्मीर हा भारताच्या दृष्टीने निकालात निघालेला प्रश्न आहे. भारताच्या मते काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग असून त्या प्रदेशाला भारतापासून कुणीही वेगळे करू शकणार नाही वा त्यावर आपला हक्क सांगू शकणार नाही हे दरवेळी स्पष्ट करण्यात आले आहे. तरीही अमेरिकेच्या अध्यक्षपदावर असलेला एक जबाबदार नेता काश्मीरबाबत असे वक्तव्य करतो

आणि ते पंतप्रधान मोदींच्या नावावर टाकतो तेव्हा ती बाब वादग्रस्त ठरते व देशाचे काश्मीरविषयक नेमके धोरण कोणते हा प्रश्न देशासमोर व जगासमोरही उभा करते. गेले दोन दिवस या एका प्रश्नाने संसदेने सरकारला वेठीला धरले आहे. या प्रकारातला कळीचा प्रश्न या विषयात नेमके खरे कोण बोलतो हा आहे. अध्यक्ष ट्रम्प खरे की पंतप्रधान मोदी खरे? भारतीयांची मानसिकता आपल्या पंतप्रधानांवर विश्वास ठेवणारी आहे. त्याचवेळी ट्रम्प यांचे आतापर्यंतचे धरसोडपण व नको त्या वेळी नको तसे बोलणे जगाच्याही चांगल्याच परिचयाचे झाले आहे. त्यामुळे येत्या काही काळात लोक ट्रम्प यांचे बोलणे विसरतील व पंतप्रधानांची बाजू खरी मानतील हे उघड आहे. तरीही ट्रम्पसारख्या भारताचा मित्र म्हणविणाऱ्या शक्तिशाली नेत्याच्या वक्तव्याची अशी उथळ संभावना वा चिकित्सा करून चालणार नाही. ट्रम्प यांचे विधान साºया जगात लोकांच्या चर्चेचा विषय होते. त्यातून जगात अमेरिकेच्या मित्रदेशांची संख्या फार मोठी आहे. अलीकडच्या काळात चीन आणि रशियासारखे देशही ट्रम्प यांच्याशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. शिवाय अमेरिकेने आपले आर्थिक तणाव वाढविले असले तरी सारे युरोपीय देश अजूनही अमेरिकेची मर्जी राखण्याच्या प्रयत्नात आहेत.

अशा वेळी ट्रम्प यांचे म्हणणे वाऱ्यावर सोडणे हे गांभीर्याचे लक्षण नाही. परराष्ट्रीय धोरण ही देशाची जगातली ओळख आहे. आम्ही कोणत्याही शक्तिगटात सामील नाही ही त्याची आरंभापासूनची भूमिका आहे आणि काश्मीरचा प्रश्न जेव्हा कधी कोणत्याही व्यासपीठावर आणला जातो तेव्हा हा प्रदेश आमचा असल्याची भूमिका भारताने सदैव घेतली आहे. या साºया गोष्टी सूर्यप्रकाशाएवढ्या स्पष्ट असताना डोनाल्ड ट्रम्पसारख्या जागतिक वजन असणाºया देशाच्या नेत्याने काश्मीरबाबत केलेले विधान वरवर पाहता काल्पनिक वाटत असले तरी ते तसे घेणे उचित नाही. ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर अमेरिकेतील भारताच्या वकिलातीने त्याविषयीची साधी नापसंतीही अमेरिकेच्या सरकारला कळविली नाही. भारत सरकारनेही याबाबत आपली ठाम भूमिका अमेरिकेला कळविली नाही. खरे तर अमेरिकेसह साºया युरोपाला पुन्हा एकवार आपली काश्मीरबाबतची भूमिका स्पष्ट करून सांगण्याची संधी ट्रम्प यांच्या या वक्तव्याने भारताला दिली आहे. ती त्याने घेतली पाहिजे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरNarendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पPakistanपाकिस्तान