शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

काश्मीरविषयक देशाचं धोरण कोणतं? खरे कोण? ट्रम्प की मोदी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 02:42 IST

अमेरिकेच्या अध्यक्षपदावर असलेला एक जबाबदार नेता काश्मीरबाबत असे वक्तव्य करतो आणि ते पंतप्रधान मोदींच्या नावावर टाकतो तेव्हा ती बाब वादग्रस्त ठरते व देशाचे काश्मीरविषयक नेमके धोरण कोणते हा प्रश्न देशासमोर व जगासमोरही उभा करते.

संसदेत सध्या सुरू असलेल्या गोंधळाचे कारण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे अध्यक्ष इम्रान खान यांना जे ऐकविले (असे म्हटले जाते) ते आहे. काश्मीर प्रश्नाबाबत अमेरिकेने भारत व पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करावी, अशी विनंती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला केली, असे वक्तव्य इम्रान खान यांच्याशी बोलताना ट्रम्प यांनी केले आहे. ट्रम्प यांचे म्हणणे खरे असेल तर ते भारताच्या काश्मीरविषयक भूमिकेच्या थेट विरोधात जाणारे व प्रत्यक्ष नरेंद्र मोदी यांच्याविषयीच अविश्वास उत्पन्न करणारे आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान आम्ही कोणत्याही तिसऱ्या देशाची वा आंतरराष्ट्रीय संघटनेची मध्यस्थी स्वीकारणार नाही.

आमच्यातला वाद आम्ही प्रत्यक्ष परस्परांशी बोलूनच ठरवू ही नीती गेली कित्येक दशके भारताने अवलंबिली आहे व तिची त्याने जाहीर वाच्यताही केली आहे. या स्थितीत डोनाल्ड ट्रम्प यांचे असे वक्तव्य प्रकाशित होणे ही बाब देशाच्या परराष्ट्रीय धोरणाबाबत संशय उत्पन्न करणारी आहे. नवे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर प्रसाद यांनी आम्ही अशी कोणत्याही मध्यस्थीची विनंती अमेरिकेकडे केली नाही, प्रत्यक्ष पंतप्रधानांनीही ती केली नाही हे संसदेत स्पष्टपणे सांगितले. मात्र विरोधी पक्षाला अशी स्पष्ट कबुली प्रत्यक्ष पंतप्रधानांकडून हवी आहे व त्यासाठी ते आग्रह धरीत आहेत. काश्मीर हा भारताच्या दृष्टीने निकालात निघालेला प्रश्न आहे. भारताच्या मते काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग असून त्या प्रदेशाला भारतापासून कुणीही वेगळे करू शकणार नाही वा त्यावर आपला हक्क सांगू शकणार नाही हे दरवेळी स्पष्ट करण्यात आले आहे. तरीही अमेरिकेच्या अध्यक्षपदावर असलेला एक जबाबदार नेता काश्मीरबाबत असे वक्तव्य करतो

आणि ते पंतप्रधान मोदींच्या नावावर टाकतो तेव्हा ती बाब वादग्रस्त ठरते व देशाचे काश्मीरविषयक नेमके धोरण कोणते हा प्रश्न देशासमोर व जगासमोरही उभा करते. गेले दोन दिवस या एका प्रश्नाने संसदेने सरकारला वेठीला धरले आहे. या प्रकारातला कळीचा प्रश्न या विषयात नेमके खरे कोण बोलतो हा आहे. अध्यक्ष ट्रम्प खरे की पंतप्रधान मोदी खरे? भारतीयांची मानसिकता आपल्या पंतप्रधानांवर विश्वास ठेवणारी आहे. त्याचवेळी ट्रम्प यांचे आतापर्यंतचे धरसोडपण व नको त्या वेळी नको तसे बोलणे जगाच्याही चांगल्याच परिचयाचे झाले आहे. त्यामुळे येत्या काही काळात लोक ट्रम्प यांचे बोलणे विसरतील व पंतप्रधानांची बाजू खरी मानतील हे उघड आहे. तरीही ट्रम्पसारख्या भारताचा मित्र म्हणविणाऱ्या शक्तिशाली नेत्याच्या वक्तव्याची अशी उथळ संभावना वा चिकित्सा करून चालणार नाही. ट्रम्प यांचे विधान साºया जगात लोकांच्या चर्चेचा विषय होते. त्यातून जगात अमेरिकेच्या मित्रदेशांची संख्या फार मोठी आहे. अलीकडच्या काळात चीन आणि रशियासारखे देशही ट्रम्प यांच्याशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. शिवाय अमेरिकेने आपले आर्थिक तणाव वाढविले असले तरी सारे युरोपीय देश अजूनही अमेरिकेची मर्जी राखण्याच्या प्रयत्नात आहेत.

अशा वेळी ट्रम्प यांचे म्हणणे वाऱ्यावर सोडणे हे गांभीर्याचे लक्षण नाही. परराष्ट्रीय धोरण ही देशाची जगातली ओळख आहे. आम्ही कोणत्याही शक्तिगटात सामील नाही ही त्याची आरंभापासूनची भूमिका आहे आणि काश्मीरचा प्रश्न जेव्हा कधी कोणत्याही व्यासपीठावर आणला जातो तेव्हा हा प्रदेश आमचा असल्याची भूमिका भारताने सदैव घेतली आहे. या साºया गोष्टी सूर्यप्रकाशाएवढ्या स्पष्ट असताना डोनाल्ड ट्रम्पसारख्या जागतिक वजन असणाºया देशाच्या नेत्याने काश्मीरबाबत केलेले विधान वरवर पाहता काल्पनिक वाटत असले तरी ते तसे घेणे उचित नाही. ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर अमेरिकेतील भारताच्या वकिलातीने त्याविषयीची साधी नापसंतीही अमेरिकेच्या सरकारला कळविली नाही. भारत सरकारनेही याबाबत आपली ठाम भूमिका अमेरिकेला कळविली नाही. खरे तर अमेरिकेसह साºया युरोपाला पुन्हा एकवार आपली काश्मीरबाबतची भूमिका स्पष्ट करून सांगण्याची संधी ट्रम्प यांच्या या वक्तव्याने भारताला दिली आहे. ती त्याने घेतली पाहिजे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरNarendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पPakistanपाकिस्तान