शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

...तरच भारत विश्वगुरू होईल अन् या भूमीतून सोन्याचा धूर पुन्हा निघेल

By विजय दर्डा | Updated: April 25, 2022 10:13 IST

आंतरराष्ट्रीय कूटनीतीत भारताने आपली स्वतंत्र प्रतिमा निर्माण केली आहे. भारताच्या नजरेला नजर देण्याची, उपेक्षा करण्याची कोणाची हिंमत नाही.

विजय दर्डा

पाहा दुनिया किती बदलते, किती वेगाने बदलते. अवघ्या ७५ वर्षांपूर्वी आपण ज्या देशाचे गुलाम होतो, त्या देशाचा पंतप्रधान मोठ्या अपेक्षा घेऊन भारतात येतो, आपल्या पंतप्रधानाना स्वत:चे खास दोस्त म्हणतो. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठ्या टेचात बरोबरीने त्यांच्याशी बोलणी करतात. एक मजबूत आणि स्वतंत्र शक्ती म्हणून भारत आज जगात उभा आहे आणि कोणी आपली उपेक्षा करू शकत नाही, ही अभिमानाची गोष्ट आहे.

ब्रिटनबद्दलच बोलायचे तर एकेकाळी या देशाच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नसे; पण तो आजही महत्त्वाचा देश आहे. त्याचे म्हणणे सगळे जग ऐकते. बोरिस जॉन्सन दोन दिवस भारतात आले तर सर्वांच्या मनात हा प्रश्न की का आले? दौऱ्यामागचा हेतू काय?  मोदींशी काय बोलले? - आता हे जगजाहीर आहे की, जागतिक राजकारणात काही गोष्टी उघड केल्या जातात,  काही नाही. बोरिस यांनी सांगितले की, त्यांनी भारताशी भूमी, समुद्र, वायू, अंतरीक्ष आणि सायबर क्षेत्रात संरक्षण सहकार्याबाबत सविस्तर चर्चा केली. दोन्ही देश नव्या जटील धोक्यांशी लढत आहेत. आपल्या दौऱ्याविषयी ते फारच भावुक झाले होते. ‘या देशात मला मिळालेली प्रसिद्धी पाहून मला सचिन तेंडुलकर झाल्यासारखे वाटले. अमिताभ बच्चनसारखा माझा चेहरा सगळीकडे झळकत होता...’ असेही ते म्हणाले आणि हो, भारत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना जॉन्सन भारतभेटीवर आले, हे मोदींचे म्हणणेही महत्त्वाचे आहे. या दौऱ्याच्या पडद्यामागची कहाणी भारताला आकृष्ट करण्याची, आपल्या जवळ आणण्याची आहे, हे तर उघडच दिसते.

ब्रिटनच नव्हे तर अमेरिका, रशिया, जर्मनी, फ्रान्स, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि इतर अनेक देश भारताला जवळ करू इच्छितात. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर नजीकच्या काळात पंडित नेहरू यांनी अलिप्तता धोरण स्वीकारून भारताच्या विदेश नीतीचा शानदार पाया रचला. इंदिराजींनी त्यांची स्वभावगत दृढता आणि भारदस्त कूटनीती यामुळे भारताच्या धोरणाला मजबुती आणली. इंदिराजी आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात झालेल्या अणुचाचण्यांनी आपला सन्मान वाढवला. अनेक दबाव असताना अणुऊर्जा तंत्रज्ञान लागू करण्यात मनमोहन सिंग यशस्वी झाले. मधल्या काळात पंतप्रधानांनी स्वतंत्र नीतीचा तोच रस्ता अवलंबला आणि आता मोदी यांनी त्यावर चार चांद लावले आहेत. आंतरराष्ट्रीय कूटनीतीत अंतर्गत राजकीय मुद्दे आणता कामा नये, असे मी नेहमी म्हणत आलो आहे. मंदिर, मशिदीसारख्या अडचणीतून  उफाळलेले वाद अकारण वाटेत  असतानाही नरेंद्र मोदी यांनी विदेश नीतीत चांगली दृढता दाखवली, असे म्हणण्यात मला जराही संकोच वाटणार नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी खूप चांगले वातावरण तयार केले आहे. भगवान महावीर, बुद्ध, महात्मा गांधी यांचे सद्विचार घेऊन ते जगाच्या व्यासपीठावर गेले. आम्ही शांतता आणि अहिंसेवर विश्वास ठेवतो, असे त्यांनी विविध निमित्ताने स्पष्ट शब्दांत सांगितले. मात्र, कोणी आपली खोडी काढावी आणि आपण गप्प राहावे, असा मात्र याचा अर्थ मुळीच नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांपासून जगातल्या सर्व व्यासपीठांवर भारताची स्थिती मजबूत केली. एका बाजूला चीनच्या मुसक्या आवळण्यासाठी भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्याबरोबर ‘क्वाड’मध्ये सामील झाला. तर दुसरीकडे अमेरिकेला लगाम घालण्यासाठी शांघाय सहयोग संघटनात सामील झाला. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले तेव्हा भारताने आपले धोरण स्वतंत्र ठेवले. असे करणे जवळपास अशक्य होते; पण भारत ते करू शकला ते केवळ आपल्या देशाच्या ठामपणामुळे. रशियाकडून खनिज तेल आणि हत्यारांची खरेदी सुरू आहे. भारत-रशियाकडून महिनाभरात जितके खनिज तेल घेतो, तेवढे तेल  युरोपियन देश  अर्ध्या दिवसात खरेदी करतात, असे भारताच्या विदेश मंत्र्यांनी स्पष्ट केले, तेव्हा त्यांना प्रत्युत्तर  देण्याची कोणाची हिंमत झाली नाही. याआधी रशियाकडून एस ४०० खरेदी करण्याबाबत तुर्कस्तानवर अमेरिकेने निर्बंध लावले; पण भारतावर तसे निर्बंध लावण्याची आगळीक अमेरिका करू शकली नाही. आपल्यालाही भारताची गरज आहे, हे त्या देशाला हे ठाऊक आहे. याच कारणाने पाकिस्तानचा पंतप्रधान असूनही इम्रान खान यांनी भारताची स्वतंत्र नीती आणि जागतिक स्तरावर भारताने कमावलेल्या ऐपतीची प्रशंसा केली.

नरेंद्र मोदी यांनी भारताची प्रतिमा मजबूत केली. २०१७ मध्ये डोकलाम वाद उभा झाला, तेव्हा चिनी सैन्यासमोर अडीच महिने आपली सेना पाय रोवून उभी होती. अखेरीस चीनला झुकावे लागले. गलवानमध्ये काय झाले, हे अख्ख्या जगाने पाहिलेले आहेच! तेथील संघर्षात आपलेही सैनिक मारले गेले, हे चीनला अखेरीस मान्य करावे लागले. विवाद अजूनही संपलेला नाही, पण  ‘आजचा भारत हा १९६२चा भारत नाही,’ हे आपण चीनला ठणकावून सांगितलेले आहे.  मागच्या महिन्यात चीनने विदेशमंत्री वांग यी यांना भारतात पाठवले. ते पंतप्रधानांना  भेटू इच्छित होते; पण मोदी यांनी नकार दिला. आज भारताचे विदेशमंत्री, संरक्षणमंत्री किंवा अन्य वरिष्ठ मंत्र्यांना भेटायला जगभरात कोणी नकार देत नाही. एकेकाळी केवळ अमेरिकेचा वट होता, आज आपला आहे.

याबरोबरच मोदी यांनी जगाला हे दाखवून दिले की गुंतवणुकीसाठी आज भारत हीच सर्वोत्तम बाजारपेठ आहे. देशामध्ये मोठ्या प्रमाणावर परदेशी भांडवल येत आहे.   अनेक अडचणी असतानाही देशाची आर्थिक ताकद वाढत आहे. आपल्याला एकत्र येऊन ही ताकद अधिक वाढवावी लागेल. आपल्यासमोर  असलेली संधी न गमावता आपण हे  करू शकलो, तरच भारत विश्वगुरू होईल. या भूमीतून सोन्याचा धूर पुन्हा निघेल.

(लेखक लोकमत समुहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आहेत)

टॅग्स :Boris Johnsonबोरिस जॉन्सनNarendra Modiनरेंद्र मोदी