शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कनिष्ठ अभियंत्याचे राजीनामापत्र! ‘साहेबा’च्या घरात किराणा भरा, विमानाची तिकिटे काढा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 07:29 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता रोहन कांबळे यांच्या राजीनाम्याने खळबळ उडाली आहे. त्यांना जाचणाऱ्या ‘सरबराई’ची कारणे काय?

संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक,लोकमत, ठाणे

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा धरणाच्या निर्मितीत मोलाचे योगदान देणाऱ्या तत्कालीन मुख्य अभियंत्यांचे नाव कोनशिलेवर कोरलेले आहे. याची आठवण होण्याचे कारण ठरले आहे ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे धाराशिव येथील कनिष्ठ अभियंता रोहन कांबळे यांचे राजीनामापत्र! खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडे पदाचा राजीनामा देताना ‘आपण अभियंता असतानाही आपल्याला मूळ जबाबदारी पार पाडली जाऊ देत नाही’ ही खंत कांबळे यांनी व्यक्त केली. 

शासकीय विश्रामगृहावर व्हीआयपींची बडदास्त ठेवण्यात आपल्याला स्वारस्य नाही. मात्र, त्यासाठी सतत राबावे लागते याची चीड कांबळे यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे. सरकारी नोकरीवर लाथ मारून जाण्याकरिता खासगी क्षेत्रात बड्या पगाराची नोकरी मिळाल्याने कांबळे यांनी हे धाडस केले असेल तर वेगळी गोष्ट; पण  समजा नोकरी न मिळताच त्यांनी हे धाडस केले असेल तर अशीच खंत मनात असलेल्या पण परिस्थितीमुळे नोकरीवर पिंक टाकण्याचे धाडस नसलेल्या काही मोजक्याच अभियंत्यांच्या दृष्टीने ते हिरो ठरतील, मात्र ज्यांनी ही ‘सरबराई’ची व्यवस्था मनापासून स्वीकारली आहे, या सरबराईतीत व खुशमस्करेगिरी करण्यात ज्यांना उत्कर्षाची शिडी सापडली आहे त्यांच्या दृष्टीने कांबळे हे वेडेपीर ठरतील. अर्थात हा विषय एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून व्यवस्थेचा आहे.

शासनात वेगवेगळ्या पदांवर व्यक्तींची निवड करण्याकरिता वेगवेगळी शैक्षणिक पात्रता निश्चित केली आहे. जॉब चार्टमधील कामे करणे प्रत्येकावर बंधनकारक असते. जॉब चार्टच्या पलीकडे जाऊन कामे करणाऱ्यांची म्हणजे वरिष्ठ अधिकारी, सनदी अधिकारी, मंत्री, आमदार, त्यांचे पंटर आदींची बडदास्त ठेवणारे, त्यांची हौसमौज पुरवणारे, त्यांना विमानाची तिकिटे काढून देणारे काही ‘अभियंते’ झटपट वरच्या पदावर जातात. ठाण्यात बऱ्याच वर्षांपूर्वी एक अधिकारी होते ते वेगवेगळ्या कंत्राटदारांमार्फत वरचेवर विमानाची तिकिटे काढून घ्यायचे. 

सार्वजनिक बांधकाम विभागात जसे तत्पर ‘अभियंते’ असतात तसे महसूल विभागात तलाठी असतात. खालपासून वरपर्यंत होणाऱ्या वसुलीतील तलाठी हा मोठा दुवा असतो. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सरबराईत या वर्गातले काही असतात. अशा सरबराईमुळे राज्य शासनाचा आदर्श तलाठी पुरस्कार पटकावणारा एखादा  तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात लाच घेताना सापडतो किंवा एखादा पालकमंत्र्यांपर्यंत जाऊन भिडणाऱ्या घोटाळ्यात या तलाठ्याचा बळी देऊन मामला रफादफा केला जातो. 

सरकारी सेवेत जर एखाद्याला गैरवाजवी (जॉब चार्टच्या बाहेरील) काम सांगितले तर तशी नोंद करण्याची तरतूद सेवा नियमावलीत आहे, परंतु वास्तवात जॉब चार्टच्या पलीकडील अशा गैरवाजवी सेवा पुरवण्यास उत्सुक असलेले बहुसंख्य असल्याने या तरतुदींचा उपयोग क्वचित होतो. अगदी माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनीही तो न करता १०० कोटींच्या वसुलीचा आरोप करून सनसनाटी निर्माण केली. राज्यातील अनेक मंत्र्यांचे खासगी सचिव हे पशुवैद्यक आहेत. बैल-घोडा आदी प्राण्यांवर उपचार करण्याचे कष्टप्रद काम करण्यापेक्षा मंत्री आणि अन्य यांच्यातील ‘दुवा’ होणे ते पसंत करतात. उच्च व तंत्रशिक्षण, आयटी वगैरे विभागात काम करणाऱ्यांना तांत्रिक शिक्षण असल्याखेरीज काम करणे अशक्य असते. एका समाज कल्याण आयुक्तांचा मंत्र्यांसोबत वाद झाल्यामुळे त्यांची आयटी विभागात बदली केली गेली. आपण कला शाखेचे पदवीधर असल्याने चुकीच्या ठिकाणी बदली झाली हे त्यांच्या लक्षात आले. मुख्य सचिवांच्या पाठीमागे तगादा लावून त्यांनी शेवटी स्वत:ची सुटका करून घेतली.

अभियंत्यांची अनेक पदे रिक्त असून, वरिष्ठ पदावरील मंडळी ही ‘टेक्निकल क्लार्क’ झाली आहेत. त्यामुळे हे वरिष्ठ कनिष्ठांवर कामाचा भार ढकलतात. ‘पाताल लोक’ या वेब सिरीजमध्ये एक मार्मिक वाक्य आहे. आपली व्यवस्था ही छेद गेलेल्या नावेसारखी आहे. या नावेत बसलेले जे स्वत:चा जीव वाचवण्याचा विचार करतात ते टिकतात. जो नाव वाचवण्याचा विचार करतो तो व्यवस्थेबाहेर फेकला जातो.    sandeep.pradhan@lokmat.com