शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

न रुकावट, न निराशा हा इस्रोचा मंत्र आहे; हाच मंत्र पुढचे यश मिळवून देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 06:15 IST

विक्रमचे अवतरण हुकले असले तरी चांद्रयान सुरक्षित आहे आणि ते पुढील सात वर्षे माहिती पुरविणार आहे. नासाने आपली काही यंत्रे या यानावर ठेवली आहेत. यातून इस्रोची विश्वासार्हता किती वाढली आहे हे यावरून कळून येते.

चंद्रावर ठसा उमटविण्याचा इस्रोचा प्रयत्न अगदी थोडक्यात हुकला असला तरी देशात निराशा नाही, उलट देशाच्या आत्मविश्वासात भर पडली आहे. चांद्रयान मोहिमेचे हे लौकिक यश आहे. ही मोहीम सोपी नव्हती. ताशी २२ हजार किलोमीटर वेगाने जाणारे यान केवळ पंधरा मिनिटांत ताशी पाच किंवा सात किलोमीटर या वेगावर आणणे हे काम अतिअवघड असते. यानाला अचूक सूचना देण्याबरोबरच यानाची गती कमी करणारे रॉकेट योग्य क्षणी आणि परस्परपूरक रीतीने प्रज्वलित होतील, याची खात्री करावी लागते. दूर अंतराळात हे काम करून घेणे हे प्रगत देशांना आजही कठीण जाते. अमेरिका व रशिया यांनी यावर हुकूमत मिळविली असली तरी त्यांच्या अपयशाची यादीही मोठी आहे. इस्रायलसारख्या शास्त्रसंपन्न देशालाही मागील महिन्यात अपयश आले होते.

अमेरिका, रशिया, फ्रान्स या देशांच्या तुलनेत भारतातील वैज्ञानिक परंपरा फारच तोकडी. झालीच तर चीनशी भारताची तुलना होईल. चीनने अवकाशात यशस्वी झेप घेतली आहे व आता अमेरिका, रशियाशी स्पर्धाही सुरू केली आहे. परंतु, चीनमधील व्यवस्था व भारताची आर्थिक-सामाजिक-राजकीय व्यवस्था यांची तुलना होऊ शकत नाही. अत्यंत अवघड परिस्थितीत भारताने अवकाश तंत्रज्ञानात प्रवेश केला. या क्षेत्रात फारशी मदत मिळत नाही. स्वप्रयत्नानेच मार्ग काढावा लागतो. इस्रोने नेहमी स्वप्रयत्नाने मार्ग काढला. चांद्रयानाची निर्मिती आणि विक्रमची घडण ही स्वदेशी होती. रशियाने हात आखडते घेतल्यावर २०११ पासून इस्रोने स्वत:च प्रकल्प हाती घेतला आणि त्यात ९५ टक्क्यांहून अधिक यश मिळविले. आकडेवारीनुसार यश मोजण्याची सवय भारताला नाही. गणिती काट्यापेक्षा भावनांच्या लाटांवर जगणारा हा देश आहे. इथे भावनांना अधिक महत्त्व आहे. इस्रोच्या नियंत्रण कक्षातही हे दिसून आले. इस्रोचे संचालक सिवन यांना भावना अनावर झाल्या व पंतप्रधानांना त्यांचे सांत्वन करावे लागले.

शास्त्रीय मुलखात वावरणाऱ्या सिवन यांनी असे करावे काय, यावर काही वाचावीर ताशेरे झाडू लागले. सिवन हे शास्त्रज्ञ असले तरी शेवटी माणूस आहेत. या प्रकल्पात ते तनमनाने किती गुंतले होते, ते यातून दिसून आले. अशी भावनिक गुंतवणूक असल्याशिवाय प्रकल्प यशस्वी होत नाहीत. विक्रमचे अवतरण हुकले असले तरी चांद्रयान सुरक्षित आहे व ते पुढील सात वर्षे माहिती पुरविणार आहे. नासाने आपली काही यंत्रे या यानावर ठेवली आहेत. यातून इस्रोची विश्वासार्हता किती वाढली आहे, हे कळून येते. विक्रम व्यवस्थित उतरले असते आणि प्रज्ञान या रोव्हरने आपले काम सुरू केले असते तर इस्रोला १०० टक्के यश मिळाले असते. शेवटचा क्षण हुकला, पण अन्य बरेच काम सुरू राहणार असल्याने यशाचा टक्का ९५ वर आला.

विक्रमचे अवतरण पाहण्यास पंतप्रधान मोदी नियंत्रण कक्षात हजर होते आणि शनिवारी सकाळी पुन्हा नियंत्रण कक्षात जाऊन त्यांनी इस्रोच्या निराश शास्त्रज्ञांसमोर प्रेरणादायी भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी अपयश हा शब्दही येऊ दिला नाही. पंतप्रधानांची ही कृती इस्रोला मोठे बळ देणारी व देशाला इस्रोच्या पाठी उभी करणारी ठरली. इस्रोचे यश थोडक्यात हुकल्यानंतरही भारतीय ताठ मानेने फिरू लागले. निर्भेळ यश मिळाले नसूनही विषण्ण वातावरण झाले नाही. भारतीय मानसिकतेमधील हा फरक समजून घेतला पाहिजे. अपयशाकडे सकारात्मक नजरेने पाहणे आवश्यक असते. भारताकडे तो गुण नाही, असे नेहमी म्हटले जाते. या गुणाची थोडी प्रचिती या वेळी आली. चांद्रयान मोहिमेबद्दल इस्रोने वेळोवेळी भरपूर माहिती देऊन, शेकडो विद्यार्थ्यांना तेथे बोलावून वातावरणनिर्मिती केली होती. त्याचाही फायदा झाला. चांद्रयानाच्या यशासाठी कोणी यज्ञ घातले नाहीत वा पूजाअर्चा केल्या नाहीत. बºयापैकी शास्त्रीय नजरेने कोट्यवधी भारतीयांनी इस्रोच्या बरोबरीने या मोहिमेत भाग घेतला. विक्रमला चंद्रस्पर्श झाला नसला तरी चंद्रापासून अवघ्या दोन किलोमीटरपर्यंत मजल मारण्याचे कौशल्य भारताच्या हाती आले असल्याचे इस्रोने दाखवून दिले आणि जगानेही इस्रोची पाठ थोपटली. पंतप्रधानांनी म्हटल्याप्रमाणे, न रुकावट, न निराशा हा इस्रोचा मंत्र आहे. हाच मंत्र पुढचे यश मिळवून देणार आहे.

टॅग्स :isroइस्रोChandrayaan 2चांद्रयान-2