शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

न रुकावट, न निराशा हा इस्रोचा मंत्र आहे; हाच मंत्र पुढचे यश मिळवून देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 06:15 IST

विक्रमचे अवतरण हुकले असले तरी चांद्रयान सुरक्षित आहे आणि ते पुढील सात वर्षे माहिती पुरविणार आहे. नासाने आपली काही यंत्रे या यानावर ठेवली आहेत. यातून इस्रोची विश्वासार्हता किती वाढली आहे हे यावरून कळून येते.

चंद्रावर ठसा उमटविण्याचा इस्रोचा प्रयत्न अगदी थोडक्यात हुकला असला तरी देशात निराशा नाही, उलट देशाच्या आत्मविश्वासात भर पडली आहे. चांद्रयान मोहिमेचे हे लौकिक यश आहे. ही मोहीम सोपी नव्हती. ताशी २२ हजार किलोमीटर वेगाने जाणारे यान केवळ पंधरा मिनिटांत ताशी पाच किंवा सात किलोमीटर या वेगावर आणणे हे काम अतिअवघड असते. यानाला अचूक सूचना देण्याबरोबरच यानाची गती कमी करणारे रॉकेट योग्य क्षणी आणि परस्परपूरक रीतीने प्रज्वलित होतील, याची खात्री करावी लागते. दूर अंतराळात हे काम करून घेणे हे प्रगत देशांना आजही कठीण जाते. अमेरिका व रशिया यांनी यावर हुकूमत मिळविली असली तरी त्यांच्या अपयशाची यादीही मोठी आहे. इस्रायलसारख्या शास्त्रसंपन्न देशालाही मागील महिन्यात अपयश आले होते.

अमेरिका, रशिया, फ्रान्स या देशांच्या तुलनेत भारतातील वैज्ञानिक परंपरा फारच तोकडी. झालीच तर चीनशी भारताची तुलना होईल. चीनने अवकाशात यशस्वी झेप घेतली आहे व आता अमेरिका, रशियाशी स्पर्धाही सुरू केली आहे. परंतु, चीनमधील व्यवस्था व भारताची आर्थिक-सामाजिक-राजकीय व्यवस्था यांची तुलना होऊ शकत नाही. अत्यंत अवघड परिस्थितीत भारताने अवकाश तंत्रज्ञानात प्रवेश केला. या क्षेत्रात फारशी मदत मिळत नाही. स्वप्रयत्नानेच मार्ग काढावा लागतो. इस्रोने नेहमी स्वप्रयत्नाने मार्ग काढला. चांद्रयानाची निर्मिती आणि विक्रमची घडण ही स्वदेशी होती. रशियाने हात आखडते घेतल्यावर २०११ पासून इस्रोने स्वत:च प्रकल्प हाती घेतला आणि त्यात ९५ टक्क्यांहून अधिक यश मिळविले. आकडेवारीनुसार यश मोजण्याची सवय भारताला नाही. गणिती काट्यापेक्षा भावनांच्या लाटांवर जगणारा हा देश आहे. इथे भावनांना अधिक महत्त्व आहे. इस्रोच्या नियंत्रण कक्षातही हे दिसून आले. इस्रोचे संचालक सिवन यांना भावना अनावर झाल्या व पंतप्रधानांना त्यांचे सांत्वन करावे लागले.

शास्त्रीय मुलखात वावरणाऱ्या सिवन यांनी असे करावे काय, यावर काही वाचावीर ताशेरे झाडू लागले. सिवन हे शास्त्रज्ञ असले तरी शेवटी माणूस आहेत. या प्रकल्पात ते तनमनाने किती गुंतले होते, ते यातून दिसून आले. अशी भावनिक गुंतवणूक असल्याशिवाय प्रकल्प यशस्वी होत नाहीत. विक्रमचे अवतरण हुकले असले तरी चांद्रयान सुरक्षित आहे व ते पुढील सात वर्षे माहिती पुरविणार आहे. नासाने आपली काही यंत्रे या यानावर ठेवली आहेत. यातून इस्रोची विश्वासार्हता किती वाढली आहे, हे कळून येते. विक्रम व्यवस्थित उतरले असते आणि प्रज्ञान या रोव्हरने आपले काम सुरू केले असते तर इस्रोला १०० टक्के यश मिळाले असते. शेवटचा क्षण हुकला, पण अन्य बरेच काम सुरू राहणार असल्याने यशाचा टक्का ९५ वर आला.

विक्रमचे अवतरण पाहण्यास पंतप्रधान मोदी नियंत्रण कक्षात हजर होते आणि शनिवारी सकाळी पुन्हा नियंत्रण कक्षात जाऊन त्यांनी इस्रोच्या निराश शास्त्रज्ञांसमोर प्रेरणादायी भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी अपयश हा शब्दही येऊ दिला नाही. पंतप्रधानांची ही कृती इस्रोला मोठे बळ देणारी व देशाला इस्रोच्या पाठी उभी करणारी ठरली. इस्रोचे यश थोडक्यात हुकल्यानंतरही भारतीय ताठ मानेने फिरू लागले. निर्भेळ यश मिळाले नसूनही विषण्ण वातावरण झाले नाही. भारतीय मानसिकतेमधील हा फरक समजून घेतला पाहिजे. अपयशाकडे सकारात्मक नजरेने पाहणे आवश्यक असते. भारताकडे तो गुण नाही, असे नेहमी म्हटले जाते. या गुणाची थोडी प्रचिती या वेळी आली. चांद्रयान मोहिमेबद्दल इस्रोने वेळोवेळी भरपूर माहिती देऊन, शेकडो विद्यार्थ्यांना तेथे बोलावून वातावरणनिर्मिती केली होती. त्याचाही फायदा झाला. चांद्रयानाच्या यशासाठी कोणी यज्ञ घातले नाहीत वा पूजाअर्चा केल्या नाहीत. बºयापैकी शास्त्रीय नजरेने कोट्यवधी भारतीयांनी इस्रोच्या बरोबरीने या मोहिमेत भाग घेतला. विक्रमला चंद्रस्पर्श झाला नसला तरी चंद्रापासून अवघ्या दोन किलोमीटरपर्यंत मजल मारण्याचे कौशल्य भारताच्या हाती आले असल्याचे इस्रोने दाखवून दिले आणि जगानेही इस्रोची पाठ थोपटली. पंतप्रधानांनी म्हटल्याप्रमाणे, न रुकावट, न निराशा हा इस्रोचा मंत्र आहे. हाच मंत्र पुढचे यश मिळवून देणार आहे.

टॅग्स :isroइस्रोChandrayaan 2चांद्रयान-2