शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
2
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
3
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
4
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
5
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
6
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
7
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
8
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
9
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
10
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
11
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
12
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
13
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान
15
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
16
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
17
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
18
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
19
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
20
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...

पितळ उघडे पडले! भारताने कसोटी विश्वविजेतेपद सलग दुसऱ्यांदा गमावले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2023 11:30 IST

संघात नामवंत खेळाडू आहेत. त्यांनी मोठ्या सामन्यात जबाबदारी उचलली पाहिजे.

भारताने सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनल गमावली. संघाचे कुठे चुकले, याचा खल सुरू झालाय. भारत सातत्याने आयसीसी ट्रॉफीमध्ये बाद फेरीत का ढेपाळतो, याची कारणे शोधली जात आहेत. २०१३ नंतर दहा वर्षांत आठवेळा बाद फेरीत स्थान मिळविले, त्यापैकी चारवेळा फायनल खेळले तरी एकही जेतेपद वाट्याला का येऊ नये? दशकभराचा दुष्काळ संपविण्याची संधी होती. मात्र, ऑस्ट्रेलियाने २०९ धावांनी पराभव केला अन् स्वप्न धुळीस मिळाले, विराट कोहलीकडूनही क्रिकेटप्रेमींना खूप साऱ्या अपेक्षा होत्या. मात्र, त्यानेही निराशा केली. भलेही टीम इंडिया जिंकणार नाही, याची खात्री झाल्यानंतर सामना अनिर्णित कसा राहील, याचा प्रयत्न करणे गरजेचे होते. मात्र, तसेही झाले नाही. भारतीय संघाकडून कोणत्याही प्रकारे लढा दिल्याचे दिसून आले नाही.

अतिशय स्वस्तात फलंदाज बाद झाले आणि शेवटच्या फळीतील फलंदाजांकडून कोणत्याही प्रकारे अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही. कर्णधार रोहित शर्मा ते चेतेश्वर पुजारा 'येरे माझ्या मागल्या सारखे बाद झाले. गेल्या कित्येक दिवसांपासून रोहितचा फॉर्म हे टीम इंडियासाठी चिंतेचे कारण ठरत आहे. हा पराभव चाहत्यांच्या, क्रिकेटप्रेमींच्या जिव्हारी लागला आहे. कधी भारतीय संघ उपांत्य फेरीत हरतो, तर कधी फायनलमध्ये पोहोचल्यानंतर निराशा करतो. नेहमीप्रमाणे एक-दोन खेळाडू खेळतात आणि बाकीचे हजेरी लावून जातात, असे चित्र कायम होते. 'तुम्ही फक्त आयपीएलमध्येच चमकता, बाकीच्या स्पर्धामध्ये तुम्हाला काही खेळता येत नाही. हे तुम्हीच दाखवून दिले,' असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. पाचव्या दिवशी किमान १० षटके खेळायची होती. हातात सात विकेट्स होत्या आणि 'फक्त' २८० धावा हव्या होत्या! या आकडेवारीसमोर भारतीय क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. अनुभवी खेळाडूंनी जबाबदारी उचलली असती तर ही वेळ आली नसती. संघात नामवंत खेळाडू आहेत. त्यांनी मोठ्या सामन्यात जबाबदारी उचलली पाहिजे.

इतरवेळी तुम्ही किती धावा करता, विक्रम करता हे एका बाजूला, पण आयसीसी, आशिया चषकासारख्या मोठ्या सामन्यात जर तुम्ही उच्च कोटीची कामगिरी करत नसाल तर तुमच्या या विक्रमांचा काहीच फायदा नाही. याला आयपीएल जबाबदार आहे काय? कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलचे नियोजन आयपीएलनंतर जून महिन्यात होते. तयारीसाठी किमान २० दिवस मिळायला हवे होते काय? या प्रश्नांची उत्तरे तेव्हाच मिळतील, जेव्हा खेळाडू आयपीएलमधून बाहेर पडतील. भारतीय क्रिकेट बोर्डाला ठरवावे लागले की, पुढील मार्ग कसा तयार करायचा आहे. यासाठी आयपीएलमधील संघांसोबत चर्चा करावी लागले. आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचणाऱ्या संघांसाठी वेगळे नियम करावे लागतील. भारतात संघाच्या तुलनेत खेळाडूंवर वैयक्तिक फोकस करण्याचा प्रकार अपयशाचे प्रमुख कारण ठरते. बरेच लोक हे बोलणार नाहीत, पण हे खरे आहे. हेही जगासमोर यायला हवे.

आपल्या देशाला कोणत्याही संघाचे वेड नाही, तर वैयक्तिक खेळाडूंचे वेड आहे. इथे खेळाडूला संघापेक्षा मोठे मानले जाते. इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया हे देश सांघिक कामगिरीवर फोकस करतात. म्हणूनच आपण बऱ्याच काळापासून आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. उदाहरणार्थ तीन खेळाडूंनी चांगली कामगिरी केली असेल तर त्यांचेच कौतुक सुरू असते. तो सामना त्यांच्यामुळेच जिंकला, असे लोकांना वाटते, पण हा सांघिक खेळ आहे. भारतीय फलंदाजांनी ४४४ धावांचा पाठलाग करताना लागणारी इच्छाशक्ती तर दाखवली, मात्र सामना केवळ इच्छाशक्तीवर जिंकता येत नाही. भारताने या सामन्यात अनेक चुका केल्या. त्यामुळे मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. दर्जेदार फलंदाजी पाहता विजयाचा चमत्कार भारतीय संघ करू शकला असता. त्या दृष्टीने भारतीय फलंदाजांनी सुरुवातदेखील केली होती. मात्र, एकाही फलंदाजाला मोठी शतकी खेळी करण्यात यश आले नाही. दोन फलंदाजांनी शतकी खेळी केली असती तर कदाचित सामना जिंकून इतिहास रचता आला असता. खेळपट्टीवर चेंडू असमान उसळतोय किंवा खूप फिरतोय असे काहीही दिसले नाही. आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या अश्विनला अंतिम एकादशमधून वगळण्याचा निर्णय काही समजलाच नाही. 'टीम इंडिया'ने इतिहास रचण्याच्या आशेवर असलेल्या तमाम भारतीयांची पुन्हा एकदा निराशा केली.

टॅग्स :India vs Australiaभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाVirat Kohliविराट कोहलीRohit Sharmaरोहित शर्माCheteshwar Pujaraचेतेश्वर पुजारा