शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

संपादकीय: मणिपूर वाचवा हो! संपूर्ण देशाला चिंतेत टाकणारी परिस्थिती आटोक्यात आणा हो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2023 09:02 IST

मणिपूर भारतातच आहे आणि रक्तपाताचे तपशील अंगावर शहारे यावेत असे आहेत.

Editorial Article on Manipur Violence: मणिपूर भारतातच आहे आणि तिथली परिस्थिती संपूर्ण देशाला चिंतेत टाकणारी आहे. रक्तपाताचे तपशील अंगावर शहारे यावेत असे आहेत. हे यासाठी सुरुवातीलाच आवर्जून सांगावे लागत आहे की, आपण सारे शिळोप्याच्या वाटाव्यात अशा बाकीच्या राजकीय गप्पांमध्ये मश्गुल आहोत. दीड महिन्यापूर्वी कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला होता तेव्हा सुरू झालेली मैतेई, तसेच कुकी व नागा या आदिवासी समुदायांमधील रक्तरंजित यादवी आता चिंताजनक स्थितीत पोचली आहे. बळींची संख्या दीडशेच्या घरात पोचली आहे.

घरादारांची राखरांगोळी करण्यात आल्याने हजारो लोक तात्पुरत्या आश्रयाला थांबले आहेत. रोज कुठे ना कुठे हत्या होत आहेत. हिंसाचार थांबविण्यासाठी तैनात सुरक्षा यंत्रणांविरुद्ध शस्त्रे चालविली जात आहेत. गेल्या आठवड्यात जमावाने रुग्णवाहिकेला आग लावल्याने मायलेकांचा होरपळून मृत्यू झाला. खामेनलोक भागात मंगळवारी मध्यरात्रीनंतर नऊ जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आदल्या दिवशी पूर्व इंफाळ जिल्ह्यात जवळपास तीन हजारांचा मैतेई जमाव कुकीबहुल वस्त्यांमध्ये घुसला. घरादारांची जाळपोळ झाली. बेछूट गोळीबार करण्यात आला. त्यात पंचवीसपेक्षा अधिक लोक जखमी झाले. त्याचा बदला म्हणून दुसऱ्या दिवशी मैतेई समाजातील नऊ जणांची हत्या झाली. पाठोपाठ मणिपूर मंत्रिमंडळातील एकमेव महिला मंत्री नेमचा किपगेन यांच्या घराला आग लावण्यात आली.

राजधानी इंफाळ व भोवतीचे खोरे मिळून राज्याच्या जेमतेम दहा टक्के भूभागावर मैतेई समाज, तर उरलेल्या डोंगरदऱ्यांमध्ये कुकी व नागा या आदिवासी समाजांमधील तीस-पस्तीस उपजातीचा रहिवास अशा भौगोलिक स्थितीत हिंसाचार आटोक्यात आणणे निमलष्करी दलांसाठीही जिकिरीचे होऊन बसले आहे. सुरक्षा दलांना हिंसाचारग्रस्त भागात पोचणेच दुरापास्त बनले आहे. महिला व मुले रस्त्यांवर अडथळे तयार करीत आहेत. त्यांच्यावर बळाचा वापर करता येत नाही. जागोजागी रस्ते खोदले जात आहेत. निमलष्करी दलांच्या गाड्या वाटेत अडवून त्यांचीच तपासणी केली जात आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी मणिपूर दौऱ्यात निमलष्करी दलाच्या युनिफाईड कमांडची घोषणा केली; परंतु ते अद्याप कार्यरत झालेले नाही. पर्वतीय प्रदेशातील अफूची शेती नष्ट करण्यासाठी सरसावलेले मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह शांत आहेत. पोलिसांमध्ये दोन गट पडले आहेत. त्यामुळे चकमकी, रक्तपाताची माहिती निमलष्करी दलांपर्यंत पोचण्यात अडथळे निर्माण होताहेत.

चुराचांदपूर भागात तीन दिवसांपूर्वी पोलिस व आसाम रायफल्सच्या जवानांमध्ये इतका वाद उद्भवला की, एकमेकांविरुद्ध बंदुकी उगारण्यात आल्या. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांकडील शस्त्रे, दारुगोळा लुटण्यात आला •आहे. तीच शस्त्रे प्रतिस्पर्धी समुदायाच्या हत्येसाठी वापरली जात आहेत. बॉंब व अत्याधुनिक बंदुका मिळून चार हजारांवर शस्त्रांची लूट झाली व राजकीय नेते, सामाजिक संघटनांची मदत घेतल्यानंतरही त्यापैकी जेमतेम एक हजार शस्त्रेच परत मिळविता आली आहेत. आधीच दुर्गम भागात सशस्त्र फुटीरवादी गटांचा प्रभाव आणि त्यात नव्याने उफाळून आलेली यादवी हे सर्व पाहता थोडी अतिशयोक्ती वाटेल; पण चित्र असे आहे की, मणिपूरची स्थिती कोणाच्याही नियंत्रणात नाही. देशाच्या स्वातंत्र्यावेळी केलेले करार मोडून राज्यात बहुसंख्याक असलेल्या मैतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या हालचाली, उच्च न्यायालयाने सरकारला त्यासंदर्भात दिलेले निर्देश आणि सामाजिक, आर्थिक व राजकीयदृष्ट्या प्रभावी असलेल्या मैतेईना अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याविरुद्ध रस्त्यावर उतरलेले कुकी, नागा, त्यातील उपजमाती असा हा संघर्ष थांबण्याची पुसटशीही चिन्हे दिसत नाहीत. कोणीही मागे हटायला तयार नाही. परिणामी, म्यानमार व बांगलादेशची मिळून सोळाशे किलोमीटरपेक्षा अधिक लांबीची सीमा असुरक्षित बनली आहे. दोन्ही शेजारच्या देशांमधील घुसखोर, मादक द्रव्याची तस्करी, त्यापाठोपाठ येणारे सशस्त्र दहशतवादी अशी अनेक संकटे भारतापुढे 'आ' वासून उभी आहेत. यासाठी युद्धपातळीवर हालचाल करण्याची गरज आहे. तसे पाहता यासाठी खूप उशीर झाला आहे. केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाचेच सरकार असताना वादाचे कारण ठरलेल्या मैतेईच्या आदिवासी दर्जाच्या प्रक्रियेबद्दल काहीही निर्णय झालेला नाही. तसे काहीतरी पाऊल उचलल्याशिवाय कुकी नागा शांत होतील, असे दिसत नाही.

 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार