शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

अग्रलेख: नापास नेते, हतबल जनता अन् धुळीस मिळाल्या अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2023 07:26 IST

जुन्या संसद भवनाला मिळालेला निरोप गौरवाने न सांगण्यासारखा नाही.

कोट्यवधी भारतीयांच्या भावनांचे प्रतिबिंब मानल्या जाणाऱ्या नव्या संसद भवनाचे काम पूर्ण होत आले आहे. येणारे पावसाळी किंवा फारतर हिवाळी अधिवेशन सेंट्रल विस्टा प्रकल्पातील नव्या संसद भवनात होऊ शकेल. त्यासाठीच गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या बांधकामाची अचानक पाहणी केली. योग्य त्या सूचना दिल्या; पण याचवेळी शंभर वर्षांपूर्वी एडविन ल्युटेन व हर्बर्ट बेकर या रचनाकारांच्या संकल्पनेतून साकारलेल्या जुन्या संसद भवनाला मिळालेला निरोप फार गौरवाने सांगण्यासारखा नाही.

या ऐतिहासिक वास्तूमधील शेवटचे ठरू शकेल अशा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप गोंधळातच वाजले. उद्योजक गौतम अदानी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी हे या गोंधळाच्या केंद्रस्थानी होते. जवळपास दोनशे तास वाया गेले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा सुरू होण्याच्या तोंडावर अमेरिकेतील हिंडेनबर्ग समूहाने अदानींच्या कारभारावर गंभीर आक्षेप उपस्थित केले. त्यात अदानींच्या कंपन्यांमध्ये आयुर्विमा महामंडळाने गुंतविलेला पैसा तसेच काही राष्ट्रीयीकृत बँकांनी केलेले अर्थसाहाय्य हा काळजीचा मुद्दा आहे. तेव्हा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अदानी प्रकरणावर बोलावे; तसेच अदानीप्रकरणी संयुक्त संसदीय समिती नेमावी, यासाठी विरोधक आक्रमक बनले. अर्थसंकल्प कसाबसा सादर झाला. त्यावर चर्चा मात्र झाली नाही.

‘भारत जोडो’ यात्रेमुळे उत्साह वाढलेले राहुल गांधी मधल्या काळात इंग्लंड दौऱ्यावर गेले. तिथे त्यांनी केलेले भाषण देशाचा अवमान करणारे होते, असा आक्षेप घेत सत्ताधारी भाजपने माफीची मागणी केली. राहुल गांधी मुळात आक्षेपार्ह बोललेच नाहीत, त्यांनी परक्या देशांना भारताच्या अंतर्गत कारभारात लक्ष घालण्याची सूचना केलेली नाही, हा काँग्रेसचा युक्तिवाद सुरूच असताना सुरतच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी गांधी यांना २०१९ मधील अब्रूनुकसानीच्या खटल्यात दोन वर्षे शिक्षा सुनावली. लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केली. सरकारी बंगला सोडण्याची नोटीस बजावण्यात आली. एरव्ही काँग्रेससोबत जाणे किंवा विरोधकांचे ऐक्य यापासून चार हात दूर राहणारा आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस आदींना जर्मन पाद्री मार्टीन निमोलरची ‘ते प्रथम समाजवाद्यांवर चालून गेले...’ ही कविता आठवली असावी. पुढचा नंबर आपलाच असे समजून ते राहुल गांधींच्या सोबत उभे राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या या एकीचा, ‘सगळे भ्रष्टाचारी एका मंचावर,’ अशा शब्दांत समाचार घेतला.

परिणामी, संसदेत गदारोळ आणखी वाढला आणि अधिवेशनाचा दुसरा टप्पा त्यात वाहून गेला. ‘पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्च’च्या अभ्यासानुसार राज्यसभेत १३० तासांपैकी जेमतेम ३१ तर लोकसभेत १३३ तासांपैकी अवघे ४५ तास अर्थात अनुक्रमे २४ व ३४ टक्के इतकेच कामकाज होऊ शकले. वरिष्ठ सभागृह राज्यसभा व कनिष्ठ लोकसभेतील एकेका मिनिटाच्या कामकाजासाठी कोट्यवधी रुपये खर्च होतात. त्याचा विचार केला तर सत्ताधारी व विरोधकांच्या कुरघोडीच्या राजकारणामुळे देशाचे अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले. खरेतर, सरकारी किंवा खासगी कर्मचाऱ्यांना जसा ‘काम नसेल तर पगार नाही’ हा नियम लावला जातो, तसाच खासदारांनाही ‘नो वर्क, नाे पे’ नियम लावायला हवा. कारण, आर्थिक नुकसानीपेक्षा मतदारांनी लोकप्रतिनिधी म्हणून खासदारांवर टाकलेल्या विश्वासाचा घात अधिक गंभीर आहे. संसद आपल्यामुळे ठप्प झाली, हे सत्ताधारी व विराेधक दोघेही मानायला तयार नाहीत. संसद चालविण्याची प्राथमिक जबाबदारी सत्ताधाऱ्यांची आहे, हे कधीकाळी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी उच्चारलेले वाक्य आता विरोधी पक्ष भाजपसाठीच वापरू लागले आहेत.

अदानी प्रकरणात संयुक्त संसदीय समिती गठीत होऊ न देण्यासाठीच सत्ताधारी गाेंधळ घालत राहिले हा विरोधकांचा मुद्दा आहे, तर न्यायालयाच्या शिक्षेमुळे खासदारकी गमावलेल्या एका व्यक्तीसाठी म्हणजे राहुल गांधींसाठी संसदेचे कामकाज होऊ दिले नाही, हा सत्ताधारी भाजपचा प्रतिवाद आहे. लोकसभा निवडणूक वर्षभरावर आलेली असल्याने कोणीही माघार घेणार नाही. संसदेत बोलू देणार नसाल तर सडकेवर जाऊन बोलू, ही विरोधकांची आणि आम्हाला देशहिताचे, लोककल्याणाचे काम करू दिले जात नाही, ही सत्ताधाऱ्यांची भूमिका राहील. जुन्या संसद भवनाला निरोप व नव्या भवनाचे स्वागत किमान विधायक पद्धतीने व्हावे, या जनतेच्या अपेक्षा मात्र यात धुळीस मिळाल्या आहेत.

टॅग्स :ParliamentसंसदRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीGautam Adaniगौतम अदानी