शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
5
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
6
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
7
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
8
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
9
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
10
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
11
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
12
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
14
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
15
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
16
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
17
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
18
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
19
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
20
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...

काठावरचा शहाणा

By admin | Updated: September 6, 2015 21:29 IST

जो प्रत्यक्ष पाण्यात उतरून हातपाय मारण्याचा प्रयत्न करीत असतो, त्याच्यापेक्षा काठावर उभे राहून पाण्यात पडलेल्यास अक्कल शिकवीत राहतो, तो म्हणे शहाणा समजला जातो

जो प्रत्यक्ष पाण्यात उतरून हातपाय मारण्याचा प्रयत्न करीत असतो, त्याच्यापेक्षा काठावर उभे राहून पाण्यात पडलेल्यास अक्कल शिकवीत राहतो, तो म्हणे शहाणा समजला जातो. असे शहाणपण तूर्तास राज ठाकरे यांनी पत्करलेले दिसते. त्यामुळेच राज्यकर्त्यांनी दुष्काळाचे ‘पर्यटन’ थांबवून पीडितांना तत्काळ मदत पुरवावी, दौरे करायची काय गरज, असा सवाल त्यांनी केला आहे. नाशकातील सिंहस्थाच्या निमित्ताने ठाकरे साधुग्रामात गेले होते आणि त्यांना बघून एका दाढीधारी संधिसाधूला अगदी भरून आले होते! मुळात राज यांना तरी या सिंहस्थ पर्यटनाची गरज काय असा सवाल कुणीही विचारू शकतो. पण ठाकऱ्यांना सवाल पुसायचे नसतात. तो मक्ता पूर्णपणे त्यांचा. दुष्काळ वा तत्सम संकटे येतात तेव्हा राज्यकर्त्यांनी तिथे जाणे आणि समवेदना प्रकट करणे हा भले एक रिवाजाचा भाग बनला असला तरी तो उभयपक्षी आवश्यक मानला जातो. आपत्तीची साधी चौकशी करण्याचीदेखील गरज सरकारला भासू नये असा प्रश्न उपस्थित करून सरकारला बदडून काढले जाते. ते टळावे म्हणून आणि प्रत्यक्ष डोळ्यांनी परिस्थिती पाहून तिचा नेमका अंदाज यावा म्हणूनही राज्यकर्ते दौरे काढीत असतात. त्याचबरोबर जे आपद्ग्रस्त असतात, त्यांनाही मनोमन कुणीतरी (म्हणजे सरकारने) येऊन आस्थेवाईकपणे आपली चौकशी करावी असे वाटत असते. आपत्ती दुष्काळाची असो की अतिवृष्टीची, लोकांच्या सरकारकडूनच्या अपेक्षा अफाट असतात व त्यांना विराट स्वरूप देण्याचे काम विरोधकच करीत असतात. आपल्या साऱ्या मागण्या मान्य केल्या जाणार नाहीत, हे संबंधितांनाही चांगलेच ठाऊक असते. त्यामुळे कुणीतरी आपल्या पाठीशी आहे ही सद्भावनादेखील बऱ्याचदा पुरेशी ठरत असते. त्यासाठीच आवश्यक ठरणाऱ्या दौऱ्यांना कोणत्या शब्दाने संबोधायचे हे ज्याच्या त्याच्या संस्कृतीवर अवलंबून असते.