शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

काठावरचा शहाणा

By admin | Updated: September 6, 2015 21:29 IST

जो प्रत्यक्ष पाण्यात उतरून हातपाय मारण्याचा प्रयत्न करीत असतो, त्याच्यापेक्षा काठावर उभे राहून पाण्यात पडलेल्यास अक्कल शिकवीत राहतो, तो म्हणे शहाणा समजला जातो

जो प्रत्यक्ष पाण्यात उतरून हातपाय मारण्याचा प्रयत्न करीत असतो, त्याच्यापेक्षा काठावर उभे राहून पाण्यात पडलेल्यास अक्कल शिकवीत राहतो, तो म्हणे शहाणा समजला जातो. असे शहाणपण तूर्तास राज ठाकरे यांनी पत्करलेले दिसते. त्यामुळेच राज्यकर्त्यांनी दुष्काळाचे ‘पर्यटन’ थांबवून पीडितांना तत्काळ मदत पुरवावी, दौरे करायची काय गरज, असा सवाल त्यांनी केला आहे. नाशकातील सिंहस्थाच्या निमित्ताने ठाकरे साधुग्रामात गेले होते आणि त्यांना बघून एका दाढीधारी संधिसाधूला अगदी भरून आले होते! मुळात राज यांना तरी या सिंहस्थ पर्यटनाची गरज काय असा सवाल कुणीही विचारू शकतो. पण ठाकऱ्यांना सवाल पुसायचे नसतात. तो मक्ता पूर्णपणे त्यांचा. दुष्काळ वा तत्सम संकटे येतात तेव्हा राज्यकर्त्यांनी तिथे जाणे आणि समवेदना प्रकट करणे हा भले एक रिवाजाचा भाग बनला असला तरी तो उभयपक्षी आवश्यक मानला जातो. आपत्तीची साधी चौकशी करण्याचीदेखील गरज सरकारला भासू नये असा प्रश्न उपस्थित करून सरकारला बदडून काढले जाते. ते टळावे म्हणून आणि प्रत्यक्ष डोळ्यांनी परिस्थिती पाहून तिचा नेमका अंदाज यावा म्हणूनही राज्यकर्ते दौरे काढीत असतात. त्याचबरोबर जे आपद्ग्रस्त असतात, त्यांनाही मनोमन कुणीतरी (म्हणजे सरकारने) येऊन आस्थेवाईकपणे आपली चौकशी करावी असे वाटत असते. आपत्ती दुष्काळाची असो की अतिवृष्टीची, लोकांच्या सरकारकडूनच्या अपेक्षा अफाट असतात व त्यांना विराट स्वरूप देण्याचे काम विरोधकच करीत असतात. आपल्या साऱ्या मागण्या मान्य केल्या जाणार नाहीत, हे संबंधितांनाही चांगलेच ठाऊक असते. त्यामुळे कुणीतरी आपल्या पाठीशी आहे ही सद्भावनादेखील बऱ्याचदा पुरेशी ठरत असते. त्यासाठीच आवश्यक ठरणाऱ्या दौऱ्यांना कोणत्या शब्दाने संबोधायचे हे ज्याच्या त्याच्या संस्कृतीवर अवलंबून असते.