शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

ईडी : सरकारी खंजीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 06:33 IST

सक्तवसुली संचालनालय या विभागाने रविवारी भल्या पहाटे कमलनाथ या मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या घरावर छापे घातले. मात्र असे छापे त्याने भाजपच्या काही मंत्र्यांच्या, मुख्यमंत्र्यांच्या वा पुढाऱ्यांच्या घरावर कधी घातल्याचे दिसले नाही.

एकेकाळी डाकूंच्या व दरोडेखोरांच्या हातात हत्यारे असायची. ती बेकायदेशीर असायची. मात्र त्यांचा वापर भयंकर व जीवघेणा असायचा. आता सरकारच्या हातात हत्यारे आहेत. सरकारची म्हणून ती कायदेशीर म्हणावी अशी आहेत. मात्र त्यांचाही वापर जीवघेणा व लोकशाहीच्या प्राणावर उठलेला आहे.

देशात सार्वत्रिक निवडणुकांना तोंड लागले आहे व या काळात सरकारने नि:पक्षपाती असावे, ही अपेक्षा आहे. त्याला तसे ठेवण्याची जबाबदारी निवडणूक आयोगापासून न्यायालयांपर्यंतच्या साऱ्यांची आहे. पण एखादे उद्दाम सरकार या नियंत्रक संस्थांना वाकुल्या दाखवून वा गुंडाळून ठेवून आपल्या हातची हत्यारे दरोडेखोरांसारखीच वापरत असेल तर? ऐन निवडणुकीच्या व मतदानाच्या काळात विरोधी पक्षांचे नेते, त्यांचे नातेवाईक, अधिकारी, सहकारी व कर्मचाऱ्यांच्या घरांवर ऐन मध्यरात्री छापे घालून त्यांची झाडाझडती घेत असेल तर? केवळ सरकारची कारवाई म्हणून ती कायदेशीर ठरायची काय? धर्माचे नाव घेऊन वा काहींनी मंदिरांचा आडोसा घेऊन ती केल्याने ती धार्मिक म्हणायची काय? भारत सरकारचे ईडी (एन्फोर्समेंट डायरोक्टरेट) या नावाचे एक खाते आहे. त्याला अशा झाडाझडतीचा अधिकार आहे. मात्र पाच वर्षे सुस्त व झोपून राहिलेले हे खाते ऐन मतदानाच्या आधी विरोधी पक्षाच्या पुढाºयांच्या घरावर असे छापे घालीत असेल तर त्यांचा हेतू कायदेशीर म्हणायचा की राजकीय? रविवारी भल्या पहाटे खात्याने कमलनाथ या मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या घरावर छापे घातले. असे छापे त्याने भाजपच्या काही मंत्र्यांच्या, मुख्यमंत्र्यांच्या वा पुढाºयांच्या घरावर कधी घातले नाहीत. त्याने स्टॅलीनवर छापे घातले. पवारांच्या घरांवर टाकले, करुणानिधी, जयललितांवर कारवाई केली. अशोक चव्हाणांना छळले. पण त्यांनी गेल्या ४-५ वर्षांत करोडोची माया कमावली वा अब्जावधींच्या इस्टेटी केल्या, त्या भाजपच्या काही माणसांवर या खात्याने अशी कारवाई केली नाही. जनतेला हे दिसत नाही काय? की बहुमताने काहीही केले तरी चालते असे लोकांनाही वाटू लागले आहे.

लोकशाही हे बहुमताचे नसून कायद्याचे राज्य आहे आणि कायदा सर्वांवर सारखा व नि:पक्षपातीपणे चालविणे ही सरकारची जबाबदारी आहे. पण मोदींना आणि त्यांच्या त्या शहाला अशा जबाबदारीचे भान कुठे आहे? शहांवर खंडणीखोरीपासूनचे आरोप आहेत आणि त्यांच्यावर तडीपारीचा आदेश आहे. सरकार तो अमलात आणत नाही. मग विरोधी नेत्यांबाबतच त्याचे वागणे असे का? प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वड्रा यांच्या घरावर किती छापे या सरकारने घातले. आप पार्टीच्या कार्यालयाची कितीदा नासधूस केली. मायावतींची कार्यालये त्यांनी कितीदा तपासली? या खात्याला भाजपचा एकही इसम वा पुढारी कारवाईसाठी योग्य वा ‘बेकायदा’ वाटू नये या त्याच्या दृष्टीचे कारण कोणते? विरोधकांना बदनाम करण्याचे आणि सरकारची माणसेच तेवढी स्वच्छ व धुतल्या तांदळासारखी आहेत हेच दाखवण्याचा प्रयत्न होतो. साधे कोणत्याही गावात फिरले तरी तेथील सत्ताधाºयांनी या काळात किती कोटींच्या माया कोणतेही काम न करता मिळविल्या हे रस्त्यातली माणसे सांगतील? कुणाच्या घरात, कोणत्या रात्री, मंत्री व ठेकेदारांचे सौदे होतात हे सगळ्या पत्रकारांसह लोकांना ठाऊक आहे. फक्त ते पाहण्याची तसदी सरकारचे हे ईडी खाते घेत नाही. त्याला ‘वरून’ जे आदेश येतात त्यांचीच ते अंमलबजावणी करते. त्यामुळे या साºयावर ते सरकारचे कुत्रे बनले असल्याचा आरोप होतो. त्यांनी छू: म्हणायचे आणि याने अंगावर धावून जायचे. याची जाणीव सरकार लक्षात घेत नसले तरी जनतेला आहे. एकाच पक्षावर छापे का, सरकार पक्ष त्यातून मुक्त का हे जनतेलाही कळते. पण मुजोर व बेमुर्वतखोरपण सत्तेच्या डोक्यात शिरले की चांगल्या, वाईटाचे, लोकशाही व हुकूमशाहीचे तारतम्य उरत नाही. मोदींच्या सरकारने हे जाणले आहे.