शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

सोनाराने कान टोचले!

By रवी टाले | Updated: December 14, 2019 19:55 IST

अरविंद सुब्रमण्यम हे त्या अर्थाने स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच निवडलेले सोनार आहेत. त्या सोनारानेच कान टोचले आहेत; पण आता तरी सरकारला धोक्याची घंटा ऐकू येणार आहे का?

ठळक मुद्देअरविंद सुब्रमण्यम यांनीही अर्थव्यवस्थेबाबत चिंता प्रकट केली आहे. सध्याच्या मंदीची तुलना १९९१-९२ मधील आर्थिक संकटासोबत केली आहे.सुब्रमण्यम यांच्या विधानाचा अर्थ हा होतो, की समस्या खूप गंभीर आणि खोलवर आहे.

अर्थव्यवस्थेच्या नाजूक स्थितीबाबत आता सत्ताधारी भारतीय जनता पक्षाप्रती सहानुभूती बाळगणाऱ्या मंडळीकडूनही चिंतेचे स्वर उमटू लागले आहेत. उद्योगपती राहुल बजाज यांच्या पाठोपाठ माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनीही अर्थव्यवस्थेबाबत चिंता प्रकट केली आहे. राहुल बजाज आणि अरविंद सुब्रमण्यम हे दोघेही पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थक होते. राहुल बजाज यांनी भूतकाळात अनेकदा मोदींच्या कार्यपद्धतीची, त्यांच्या धोरणांची भलामण केली होती. सुब्रमण्यम यांना तर मोदींनीच देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार नेमले होते. त्याच सुब्रमण्यम यांनी आता अर्थव्यवस्थेतील सध्याच्या मंदीची तुलना १९९१-९२ मधील आर्थिक संकटासोबत केली आहे.अरविंद सुब्रमण्यम यांनी उल्लेख केलेल्या कालखंडात भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच जीडीपीच्या वाढीचा दर अवघ्या १.१ टक्क्यावर पोहोचला होता. विदेशी चलनाचा साठा एवढा रोडावला होता, की रिझर्व्ह बँकेकडील सोन्याचा साठा गहाण ठेवून कर्ज घेण्याची पाळी भारत सरकारवर आली होती. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील ते सर्वात गंभीर आर्थिक संकट समजले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच नेमलेले देशाचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार जर सध्याच्या संकटाची तुलना १९९१-९२ मधील संकटासोबत करीत असतील, तर परिस्थितीने किती गंभीर वळण घेतले आहे, हे सहज लक्षात यावे!अरविंद सुब्रमण्यम यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे जोशुआ फेल्मन यांच्यासह भारताच्या आर्थिक घसरणीवर अभ्यास केला आहे. त्यावर आधारित एक सादरीकरण त्यांनी बुधवारी बेंगळुरुत केले. या सादरीकरणादरम्यान त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भातील काही गंभीर निरीक्षणे नोंदवली. सुब्रमण्यम यांच्या मते, सध्याच्या आर्थिक घसरणीवर कोणताही तातडीचा उपाय नाही. ज्या अर्थतज्ज्ञाने विद्यमान सरकारमध्ये महत्त्वपूर्ण पद भुषविले होते, तो अर्थतज्ज्ञच जर असे विधान करीत असेल तर ते गांभीर्यानेच घ्यायला हवे. सुब्रमण्यम यांच्या विधानाचा अर्थ हा होतो, की समस्या खूप गंभीर आणि खोलवर आहे.प्रारंभी आर्थिक घसरण सुरू असल्याचे साफ फेटाळून लावणाºया सरकारने गत काही काळापासून किमान समस्या असल्याचे मान्य करायला आणि त्यावर उपाययोजना करायला प्रारंभ केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गत काही दिवसांमध्ये अनेक उपाययोजनांच्या घोषणा केल्या. सरकारच्या आणि देशाच्या दुर्दैवाने अद्याप तरी त्या उपाययोजनांचा कोणताही सकारात्मक परिणाम दृष्टोत्पत्तीस पडलेला नाही. या पार्श्वभूमीवर आता वैयक्तिक आयकराच्या दरात कपात करण्याची आणि वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटीमध्ये वाढ करण्याची चर्चा सुरू आहे. सुब्रमण्यम यांच्या मते अर्थव्यवस्थेची प्रकृती ठीक नसताना या दोन्ही उपाययोजना रोग बरा करण्याऐवजी चिघळवू शकतात. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी एकीकडे कॉर्पोरेट करात कपात करायची आणि दुसरीकडे जीएसटीमध्ये वाढ करायची हे विरोधाभासी आहे, असे मत सुब्रमण्यम यांनी व्यक्त केले. त्यांचे हे मत अर्थकारणाचा जराही गंध नसलेल्या, पण सुज्ञ असलेल्या कोणत्याही व्यक्तीला सहज पटेल. दुर्दैवाने सरकारमधील कुणीही ते मान्य करायला तयार नाही.

सुब्रमण्यम यांच्या सादरीकरणाच्या दुसºयाच दिवशी जाहीर झालेली ताजी आकडेवारी अर्थव्यवस्था संकटात असल्याच्या वस्तुस्थितीकडेच अंगुलीनिर्देश करीत आहे. आॅक्टोबरमधील औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक धक्कादायक पातळीवर पोहोचला आहे. त्याचवेळी किरकोळ महागाईचा दर ५.५४ टक्क्यांवर पोहोचला आहे. आॅक्टोबरमध्ये तो ४.६२ टक्के एवढाच होता. मोदी सरकार आतापर्यंत महागाईच्या दरावर नियंत्रण ठेवल्याचे श्रेय घेत होते. आता त्या आघाडीवरही घसरण सुरू झाली आहे. अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सरकारने हाती घेतलेल्या सुधारणा व उपाययोजनांचा कोणताही परिणाम झाला नसल्याचेच हे द्योतक आहे.तसे बघितल्यास, अरविंद सुब्रमण्यम यांनी बेंगळुरुत केलेल्या सादरीकरणामध्ये कोणताही नवा मुद्दा नव्हता अथवा त्यांनी अर्थव्यवस्थेची प्रकृती सुधारावी, यासाठी उपाययोजनाही सुचविल्या नाहीत; मात्र सरकारने घायकुतीला येऊन निर्णय घेऊ नयेत आणि तातडीने चमत्काराची अपेक्षा करू नये, हा संदेश त्यांनी जरूर दिला. मोदी सरकार तो संदेश गांभीर्याने घेणार आहे का, हा खरा प्रश्न आहे. सोनारानेच कान टोचलेले बरे, अशी म्हण आहे. कोणतेही काम त्या क्षेत्रातील तज्ज्ञानेच केलेले बरे, हा त्या म्हणीचा अर्थ! अरविंद सुब्रमण्यम हे त्या अर्थाने स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच निवडलेले सोनार आहेत. त्या सोनारानेच कान टोचले आहेत; पण आता तरी सरकारला धोक्याची घंटा ऐकू येणार आहे का?- रवी टाले    ravi.tale@lokmat.com  

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाNarendra Modiनरेंद्र मोदी