शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

अर्थशास्त्रींची देशसेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 01:00 IST

मोदी सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांनी मुदतीआधीच ते पद सोडण्याचे जाहीर केल्याने चर्चा आणि शंकाकुशंकांना उधाण आले.

मोदी सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांनी मुदतीआधीच ते पद सोडण्याचे जाहीर केल्याने चर्चा आणि शंकाकुशंकांना उधाण आले. सुब्रमणियन यांना मोदी यांनी सत्तेवर येताच या पदावर नेमले होते. रुळावरून घसरलेला देशाचा आर्थिक गाडा सावरण्यासाठी विश्वासू अरुण जेटलींच्या मदतीला त्यांनी सुब्रमणियन यांना दिले. दोघांचे सूत पक्के जमले. मोदी व भाजपाने राजकारण डोळ्यापुढे ठेवून सरकारचा आर्थिक अ‍ॅजेंडा जरूर राबविला. परंतु सुब्रमणियन यांनी त्या राजकारणात न पडता आपली मते व विचार परखडपणे मांडले. सल्लागाराचे काम नेमके तेच असते. यशापयशाची किंवा स्तुती आणि टीकेची चिंता त्यांनी करायची नसते. शेवटी त्यांनी दिलेला सल्ला मानायचा की नाही हे राजकीय नेतृत्व ठरवत असते व त्याचे खापरही त्यांच्याच डोक्यावर फुटणार असते. म्हणूनच सल्लागार व त्याला नेमणारे यांचे नाते प्रगाढ विश्वासाचे असावे लागते. सल्लागाराकडून राजकारणाप्रमाणे इमान अपेक्षित नसते. त्याच्याकडून अपेक्षा असते स्वत:शी प्रामाणिक राहण्याची. शिवाय अर्थशास्त्र हे प्रयोगसिद्ध विज्ञान नाही. त्यामुळे त्यातील प्रत्येक सिद्धांताला दुसरी बाजू असते. या सर्व निकषांवर सुब्रमणियन पुरेपूर खरे उतरले म्हणून त्यांचे कौतुक करायला हवे. मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर व त्यातील अपयशावर विरोधकांनी सडकून टीका केली, पण त्यांनी सुब्रमणियन यांना कधी दोष दिला नाही. तरीही सुब्रमणियन यांचा राजीनामा हा सार्वजनिक चर्चेचा विषय झाला. पण शस्त्रक्रियेनंतर घरात विश्रांती घेणारे वित्तमंत्री जेटली व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने आपल्या खात्याची खबरबात घेतात व एरवी माध्यमांना सामोरे जाऊन सांगायच्या गोष्टी फेसबुकसारख्या समाजमाध्यमातून व्यक्त करत आहेत. सुब्रमणियन यांच्या राजीनाम्याची माहितीही जेटलींनी अशीच दिली. नंतर सुब्रमणियन यांनी त्याची कारणमीमांसा दिली. पुन्हा अमेरिकेत जाऊन लिखाण व संशोधन करायचे आहे. शिवाय सप्टेंबरमध्ये आजोबा होणार असल्याने माझ्यावर वेगळ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या येणार आहेत. त्यामुळे मीच मुदत संपण्याआधीच पदातून मुक्त करण्याची विनंती केली, असे सुब्रमणियन यांनी स्पष्ट केले. त्यांची कारणे मला पटल्याने मी त्यांना नकार देऊ शकलो नाही, असे जेटलींनी म्हटले. ‘अरविंद’ असा प्रेमळ एकेरी उल्लेख करून त्यांनी सुब्रमणियन यांच्या कामाची स्तुती केली. पण अशी खंत मोदींनी व्यक्त केल्याचे माध्यमांना त्यांच्या नेहमीच्या विश्वसनीय सूत्रांकडूनही कळले नाही. मग या ‘स्टोरी’ला ज्याने-त्याने आपापले रंग दिले. गेल्या चार वर्षांत सुब्रमणियन यांचे सरकारशी केव्हा, कशावरून खटके वा मतभेद झाले याचा पडताळा सुरू झाला. प्रखर बुद्धिमत्तेचे लोक मोदींचे बुडते जहाज आता सोडून जाऊ लागले आहेत, या काँग्रेसच्या टीकेने या राजीनाम्यात राजकीय रंग भरला. सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार हे पडद्यामागचे पद. परंतु नीती आयोगाचे अरविंद पनगढिया, रिझर्व्ह बँकेचे रघुराम राजन व सुब्रमणियन यांची नावे व चेहरे लोकांच्या परिचयाचे झाले. देशाचे आर्थिक धोरण व त्यातील समस्यांचे भलेबुरे चित्र जनतेपुढे मांडण्याचे काम या मंडळींनी केले. पण हे तिघेही निरनिराळ्या परिस्थितीत मोदींना सोडून गेले. त्यामुळे त्यांचे जाणे सरकारच्या अपयशाच्या खात्यात टाकले गेले. असे करणे बरोबर नाही, त्याची गरजही नाही. डॉ. मनमोहन सिंग, पनगढिया, राजन व सुब्रमणियन मंडळींनी परदेशातून परत येऊन आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा देशाला लाभ दिला. आयुष्यातील मोक्याची वर्षे स्वदेशासाठी समर्पित केली. या अर्थशास्त्रींनी केलेली ही देशसेवाच आहे. त्यांचे नक्कीच अभिनंदन व्हायला हवे.