शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
2
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
3
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या नूर खान बेसवर हल्ला; Video समोर आला...
5
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
7
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
8
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
9
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
10
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
11
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
12
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
13
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
14
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
15
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
16
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
17
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
18
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
19
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
20
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा

खंत की हतबलता

By admin | Updated: November 3, 2015 03:41 IST

राज्यात जेव्हां केव्हां सत्ताबदल होतो आणि कालचे सत्ताधीश आजचे विरोधक बनतात तेव्हां आम्ही विरोधात असल्याने नोकरशहा आमचे ऐकत नाहीत, आमची

राज्यात जेव्हां केव्हां सत्ताबदल होतो आणि कालचे सत्ताधीश आजचे विरोधक बनतात तेव्हां आम्ही विरोधात असल्याने नोकरशहा आमचे ऐकत नाहीत, आमची कामे अडवून ठेवतात, अशी तक्रार आजच्या विरोधी पक्षातले आमदार करीत असतात. परंतु आज तीच आणि तशीच तक्रार सत्ताधारी पक्षातला कोणी आमदार वा मंत्री नव्हे तर राज्याचा प्रमुख असलेला मुख्यमंत्रीच करीत असेल तर एक तर ती खंत समजली जाते वा हतबलता. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस स्वत:च जर असे म्हणत असतील की राज्याची नोकरशाही नव्या सरकारला सहकार्य करीत नाही, तर मग नक्कीच कुठेतरी काहीतरी चुकत असले पाहिजे. अशी तक्रार आजवर त्यांच्या एकाही पूर्वसुरीने केल्याचे उदाहरण नमूद नाही. वास्तविक पाहता मंत्री परिषद आणि नोकरशाही एकाच रथाची दोन चाके असल्याचे रास्तपणे म्हटले जाते. साहजिकच रथाच्या विनाअडथळा मार्गक्रमणासाठी या दोन्ही चाकांनी परस्परात योग्य समतोल आणि समन्वय राखणे गरजेचे असते. नोकरशाही जात्याच नाठाळ असते आणि तिच्यात नकारात्मकता ओतप्रोत भरलेली असते. ती एक तर अभ्यासाने सरळ होते वा जरबेने. फडणवीस यांची ख्याती एक अभ्यासू आमदार अशी सांगितली जाते. त्यांच्या सरकारला अधूनमधून हलकेसे धक्के देण्याचे काम सत्तेतील भागीदार शिवसेना करीत असली तरी आपल्या सरकारच्या स्थैर्याला कोणताही धोका नसल्याचे मुख्यमंत्रीच वारंवार सांगत असतात आणि दिल्लीचा व विशेषत: पंतप्रधानांचा त्यांच्यावर वरदहस्त आहे. ही सारी स्थिती त्यांच्या आवाजत जरब निर्माण होण्यास अत्यंत पोषक अशीच आहे. असे असताना आघाडी सरकारच्या काळात राज्याच्या नोकरशाहीला त्या सरकारच्या पद्धतीने काम करण्याची सवय लागल्याने नव्या सरकारची पद्धत स्वीकारण्याबाबत ती असहकार्य करते, असे मुख्यमंत्र्यांनी म्हणणे जनतेत वेगळाच संदेश घेऊन जाण्यास कारणीभूत ठरु शकते. यात एक शक्यता संभवते. युतीच्या याआधीच्या राजवटीतील मंत्री आणि विशेषत: सेनेचे मंत्री अधिकाऱ्यांना जी अवमानकारक वागणूक देत असत त्या वागणुकीच्या स्मृती पुसल्या गेल्या नसाव्यात. परिणामी नोकरशहांमध्ये फडणवीस सरकारबाबतही किंतु असणे संभवते. तरीही लोकानी तुमच्या हाती त्यांचे भवितव्य सोपविल्यानंतर ज्यावर मांड ठोकायची तो घोडा नाठाळ आहे अशी तक्रार करण्यात हशील नाही. नाठाळाला वठणीवर आणून त्यावर घट्ट मांड ठोकणे भागच आहे.