शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
2
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
3
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
4
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
5
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
6
जगन्नाथ रथयात्रा: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
7
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
8
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
9
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
10
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
11
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
12
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
13
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
14
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
15
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
16
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
17
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
18
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
19
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
20
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!

निर्नायकी विद्रोह

By admin | Updated: October 12, 2016 07:25 IST

लोकशाहीमधील व्यवस्था कोणतीही असो, तिच्या विरोधात संघर्ष करणे वा अगदी विद्रोह आणि द्रोहदेखील करणे लोकशाही शासन व्यवस्था आपल्या नागरिकांना मूलभूत स्वातंत्र्याचे जे अधिकार बहाल करते

लोकशाहीमधील व्यवस्था कोणतीही असो, तिच्या विरोधात संघर्ष करणे वा अगदी विद्रोह आणि द्रोहदेखील करणे लोकशाही शासन व्यवस्था आपल्या नागरिकांना मूलभूत स्वातंत्र्याचे जे अधिकार बहाल करते, त्यात एकप्रकारे अनुस्यूतच असते. पण अशा संघर्षाचा किंवा विद्रोहाचा कुणी नायक असावा लागतो आणि जेव्हां तो उपलब्ध असतो तेव्हां त्याच्याशी किंवा त्यांच्याशी चर्चा करुन मार्ग काढणे सुलभ जात असते. सामान्यत: व्यवस्थेविरुद्धचा संघर्ष तिच्यातील दोषांचे निर्मूलन व्हावे हाच असतो, किंवा असावा लागतो. पण जेव्हां विद्रोह निर्नायकी असतो तेव्हां कशी गंभीर आणि चिंताजनक परिस्थिती निर्माण होते तिचा अनुभव संपूर्ण नाशिक जिल्ह्याने सलग दोन दिवस घेतला. नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील तळेगाव-अंजनेरी गावातील एका अजाण बालिकेवर झालेला शारीरिक अत्याचार सभ्य समाजाला लाज आणणारा होता यात वाद नाही आणि तो घडून गेल्यानंतर लोकांची तीव्र प्रतिक्रिया उमटणे हेदेखील अनैसर्गिक नाही. अशा जहाल प्रतिक्रियेचा रोख स्वाभाविकच शासन व्यवस्थेच्या विरोधातला असतो. त्यामुळे शासनाच्या कोणत्याही प्रतिनिधीचे ऐकूनच घ्यायचे नाही हेदेखील संतप्त जमावाच्या विशिष्ट मानसिकतेला धरुन असते असेही मान्य करता येईल. पण शनिवार रात्रीपासून ठिकठिकाणी ज्या विद्रोहाचे दर्शन घडत होते, तो शांत करण्यासाठी गेलेल्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे, विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींचे आणि केवळ तितकेच नव्हे तर विविध सामाजिक तसेच ज्ञाती संस्थांच्या नेत्यांचेही ऐकून घ्यायला जमाव तयार होत नव्हता. उलट त्यांच्यावरही आपला संताप व्यक्त करीत होता. असा निर्नायकी जमाव लोकशाहीसमोरील किती मोठा धोका ठरु शकतो, याचेच दर्शन त्यातून घडले. त्याची उकल करताना महाराष्ट्रात अलीकडच्या काळात जे शांततापूर्ण मोर्चे निघत आहेत त्यांना बदनाम करण्यासाठीच हे सारे कोणीतरी जाणीवपूर्वक करीत आहे, असे अनुमान काढणे हा फारच बाळबोधपणा झाला.