शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

निर्नायकी विद्रोह

By admin | Updated: October 12, 2016 07:25 IST

लोकशाहीमधील व्यवस्था कोणतीही असो, तिच्या विरोधात संघर्ष करणे वा अगदी विद्रोह आणि द्रोहदेखील करणे लोकशाही शासन व्यवस्था आपल्या नागरिकांना मूलभूत स्वातंत्र्याचे जे अधिकार बहाल करते

लोकशाहीमधील व्यवस्था कोणतीही असो, तिच्या विरोधात संघर्ष करणे वा अगदी विद्रोह आणि द्रोहदेखील करणे लोकशाही शासन व्यवस्था आपल्या नागरिकांना मूलभूत स्वातंत्र्याचे जे अधिकार बहाल करते, त्यात एकप्रकारे अनुस्यूतच असते. पण अशा संघर्षाचा किंवा विद्रोहाचा कुणी नायक असावा लागतो आणि जेव्हां तो उपलब्ध असतो तेव्हां त्याच्याशी किंवा त्यांच्याशी चर्चा करुन मार्ग काढणे सुलभ जात असते. सामान्यत: व्यवस्थेविरुद्धचा संघर्ष तिच्यातील दोषांचे निर्मूलन व्हावे हाच असतो, किंवा असावा लागतो. पण जेव्हां विद्रोह निर्नायकी असतो तेव्हां कशी गंभीर आणि चिंताजनक परिस्थिती निर्माण होते तिचा अनुभव संपूर्ण नाशिक जिल्ह्याने सलग दोन दिवस घेतला. नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील तळेगाव-अंजनेरी गावातील एका अजाण बालिकेवर झालेला शारीरिक अत्याचार सभ्य समाजाला लाज आणणारा होता यात वाद नाही आणि तो घडून गेल्यानंतर लोकांची तीव्र प्रतिक्रिया उमटणे हेदेखील अनैसर्गिक नाही. अशा जहाल प्रतिक्रियेचा रोख स्वाभाविकच शासन व्यवस्थेच्या विरोधातला असतो. त्यामुळे शासनाच्या कोणत्याही प्रतिनिधीचे ऐकूनच घ्यायचे नाही हेदेखील संतप्त जमावाच्या विशिष्ट मानसिकतेला धरुन असते असेही मान्य करता येईल. पण शनिवार रात्रीपासून ठिकठिकाणी ज्या विद्रोहाचे दर्शन घडत होते, तो शांत करण्यासाठी गेलेल्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे, विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींचे आणि केवळ तितकेच नव्हे तर विविध सामाजिक तसेच ज्ञाती संस्थांच्या नेत्यांचेही ऐकून घ्यायला जमाव तयार होत नव्हता. उलट त्यांच्यावरही आपला संताप व्यक्त करीत होता. असा निर्नायकी जमाव लोकशाहीसमोरील किती मोठा धोका ठरु शकतो, याचेच दर्शन त्यातून घडले. त्याची उकल करताना महाराष्ट्रात अलीकडच्या काळात जे शांततापूर्ण मोर्चे निघत आहेत त्यांना बदनाम करण्यासाठीच हे सारे कोणीतरी जाणीवपूर्वक करीत आहे, असे अनुमान काढणे हा फारच बाळबोधपणा झाला.