शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

मराठवाड्यातील पाण्याचे दुर्भिक्ष्य

By admin | Updated: March 16, 2016 08:39 IST

पाण्याने गेल्या महिनाभरात २१ बळी घेतले. पैकी बीडमध्ये १२, लातुरात ५, तर उस्मानाबादमध्ये ४ जणांना जीव गमवावा लागला. आणखी किती बळी घेणार? पाणी शोधणे ही जिवावरची जोखीम झाली आहे.

- सुधीर महाजनपाण्याने गेल्या महिनाभरात २१ बळी घेतले. पैकी बीडमध्ये १२, लातुरात ५, तर उस्मानाबादमध्ये ४ जणांना जीव गमवावा लागला. आणखी किती बळी घेणार? पाणी शोधणे ही जिवावरची जोखीम झाली आहे. मराठवाड्यात फाल्गुनातच वैशाख वणवा पेटला आहे. तसा तो तीन वर्षांपासून पेटतोच आहे. पाणी नाही, चारा नाही, सगळीकडे एक भयाण भणंग अवस्था निर्माण झाली आहे. काही गोष्टी माणसाला अस्वस्थ करतात. पण या दुष्काळाने मराठवाड्याचा माणूस आता अस्वस्थ होत नाही. निसर्गाच्या माराने तो बधिर झाला आहे. परिस्थितीचे भान, आकलन आहे; पण काही सुचत नाही. वणवा जाळत असला तरी संवेदना चटके बसण्यापलीकडे गेल्या आहेत. फाटक्या आभाळाला ठिगळ लावलं तरी ऊन भाजून काढणार आहे, ठिगळाचा उपयोग नाही.हल्ली दुष्काळाने अन्नान्नदशा होत नाही; तो दाही दिशा फिरवतो. पार मोकळे पडले, जनावरे खपाटी गेली. जो तो पाणी शोधत फिरताना दिसतो. दिवसभर चर्चा पाण्याची आणि वाट पाहायची ती टँकरची. लातूर, बीड, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यात अशी परिस्थिती आहे. पारावर गप्पांचे फड रंगत नाहीत. सारे मूकपणे शून्यात नजर लावून बसलेले दिसतात. कोणाचा भाऊ तर कोणाचा पोरगा पोट भरायला शहरात गेला. गावात उरली म्हातारीकोतारी माणसं. पाण्याअभावी अवघ्या खेड्यांचा जीवन रसच आटला आहे.मुख्यमंत्र्यांनी लातुरात मंत्र्यांची बैठक घेतली. त्या अगोदर दिवसभर २९ तालुक्यांची पाहणी मंत्र्यांनी केली. घोषणा झाल्या. पाऊस घोषणांचा पडतो. तो लोकानी जेटलींच्या अर्थसंकल्पातही अनुभवला. दुष्काळी अनुदानाची घोषणा कधीच झाली; पण तेसुद्धा पूर्ण मिळणार नाही. तुकड्या तुकड्यांनी तुकडे फेकल्यासारखे. सरकारच्या करणी आणि कथनीतला हा फरक ठळक जाणवतो. आज मराठवाड्यात १५०० टँकर्स पाणी वाटत फिरतात आणि दिवसामागे ही संख्या वाढत जाणार आहे. मराठवाड्यातील ११ प्रमुख सिंचन प्रकल्पांमध्ये अवघे साडेसहा टक्के पाणी आहे. अजून मार्च अर्धा जायचा. बाष्पीभवनाचा वेग पाहिला तर एक महिन्याच्या पाण्याची वाफ होणार. ४० लाख लोकांना दीड हजार टँकरने पाणी पुरवठा होतो. एप्रिलअखेर मोजकी गावे वगळता सगळीकडे टँकर लागणार. म्हणजे एकदाचा मराठवाड्याचा ‘टँकरवाडा’ झाला. लोकसंख्येचा विचार केला तर १ कोटी ८७ लाख लोकसंख्या आहे; पण तेवढाच विचार करून चालणार नाही. ५५ लाख जनावरे जगवावी लागतील. माणसांचा विचार केला तरी १३५ लिटर पाणी मिळावे ही अपेक्षा आहे. १,८५००००० बाय १३५ गुणाकार केला, तर रोज किती लिटर पाणी लागणार याचा अंदाज येतो.सध्या लातूर शहराची अवस्था भयानक झाली आहे. महापालिकेने गेल्या १५ दिवसांपासून पाणीपुरवठाच केला नाही. कारण पाणीच नाही. मांजरा प्रकल्प कोरडेठाक मैदान बनले. पाण्याची वाहतूक पोलीस बंदोबस्तात करण्याची पाळी आली. येथे पाणी मूल्यवान आणि ज्वालाग्राही बनले आहे. किल्लारीचे पाणी नेण्यास गावकऱ्यांनी विरोध केला, रस्ते अडविले. जागोजागी हेच चित्र आहे. लातूर शहरात माणसं दिवसभर पाणी शोधताना दिसतात. हातगाडी, चारचाकी, रिक्षा, दुचाकी, इतकेच नव्हे तर गाढवांचाही वापर पाणी आणण्यासाठी केला जातो. लोकांनी तर रिक्षाच भाड्याने घेतल्या आहेत. लातूरमध्ये तर पाणी बचतीचे वेगवेगळे प्रकार चालू आहेत. ज्ञानप्रकाश बालविकास केंद्रात चार लिटर पाण्यात स्वच्छ अंघोळ कशी करता येते याचे प्रशिक्षणच मुलांना देण्यात आले. दुष्काळाची दाहकता अजून काय काय शिकवणार? पाण्याची काटकसर कशी करावी याचे प्रशिक्षण मुलांना देण्याचा हा उपक्रम स्तुत्यच म्हणावा लागेल. शंभर वर्षापूर्वी चिं. वि. जोशी या महान विनोदी लेखकाने ‘आमच्या गावातील पाण्याचे दुर्भिक्ष्य’ अशी कथा लिहून हसविले होते. लातूरकरांना हा अनुभव येत आहे पण क्षणोक्षणी रडवीत आहे.