शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
3
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
4
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
5
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
6
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
7
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
8
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
9
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
10
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
11
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
12
"सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
13
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
14
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
15
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
16
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
17
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
18
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
19
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
20
Paresh Rawal : "आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?

मराठवाड्यातील पाण्याचे दुर्भिक्ष्य

By admin | Updated: March 16, 2016 08:39 IST

पाण्याने गेल्या महिनाभरात २१ बळी घेतले. पैकी बीडमध्ये १२, लातुरात ५, तर उस्मानाबादमध्ये ४ जणांना जीव गमवावा लागला. आणखी किती बळी घेणार? पाणी शोधणे ही जिवावरची जोखीम झाली आहे.

- सुधीर महाजनपाण्याने गेल्या महिनाभरात २१ बळी घेतले. पैकी बीडमध्ये १२, लातुरात ५, तर उस्मानाबादमध्ये ४ जणांना जीव गमवावा लागला. आणखी किती बळी घेणार? पाणी शोधणे ही जिवावरची जोखीम झाली आहे. मराठवाड्यात फाल्गुनातच वैशाख वणवा पेटला आहे. तसा तो तीन वर्षांपासून पेटतोच आहे. पाणी नाही, चारा नाही, सगळीकडे एक भयाण भणंग अवस्था निर्माण झाली आहे. काही गोष्टी माणसाला अस्वस्थ करतात. पण या दुष्काळाने मराठवाड्याचा माणूस आता अस्वस्थ होत नाही. निसर्गाच्या माराने तो बधिर झाला आहे. परिस्थितीचे भान, आकलन आहे; पण काही सुचत नाही. वणवा जाळत असला तरी संवेदना चटके बसण्यापलीकडे गेल्या आहेत. फाटक्या आभाळाला ठिगळ लावलं तरी ऊन भाजून काढणार आहे, ठिगळाचा उपयोग नाही.हल्ली दुष्काळाने अन्नान्नदशा होत नाही; तो दाही दिशा फिरवतो. पार मोकळे पडले, जनावरे खपाटी गेली. जो तो पाणी शोधत फिरताना दिसतो. दिवसभर चर्चा पाण्याची आणि वाट पाहायची ती टँकरची. लातूर, बीड, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यात अशी परिस्थिती आहे. पारावर गप्पांचे फड रंगत नाहीत. सारे मूकपणे शून्यात नजर लावून बसलेले दिसतात. कोणाचा भाऊ तर कोणाचा पोरगा पोट भरायला शहरात गेला. गावात उरली म्हातारीकोतारी माणसं. पाण्याअभावी अवघ्या खेड्यांचा जीवन रसच आटला आहे.मुख्यमंत्र्यांनी लातुरात मंत्र्यांची बैठक घेतली. त्या अगोदर दिवसभर २९ तालुक्यांची पाहणी मंत्र्यांनी केली. घोषणा झाल्या. पाऊस घोषणांचा पडतो. तो लोकानी जेटलींच्या अर्थसंकल्पातही अनुभवला. दुष्काळी अनुदानाची घोषणा कधीच झाली; पण तेसुद्धा पूर्ण मिळणार नाही. तुकड्या तुकड्यांनी तुकडे फेकल्यासारखे. सरकारच्या करणी आणि कथनीतला हा फरक ठळक जाणवतो. आज मराठवाड्यात १५०० टँकर्स पाणी वाटत फिरतात आणि दिवसामागे ही संख्या वाढत जाणार आहे. मराठवाड्यातील ११ प्रमुख सिंचन प्रकल्पांमध्ये अवघे साडेसहा टक्के पाणी आहे. अजून मार्च अर्धा जायचा. बाष्पीभवनाचा वेग पाहिला तर एक महिन्याच्या पाण्याची वाफ होणार. ४० लाख लोकांना दीड हजार टँकरने पाणी पुरवठा होतो. एप्रिलअखेर मोजकी गावे वगळता सगळीकडे टँकर लागणार. म्हणजे एकदाचा मराठवाड्याचा ‘टँकरवाडा’ झाला. लोकसंख्येचा विचार केला तर १ कोटी ८७ लाख लोकसंख्या आहे; पण तेवढाच विचार करून चालणार नाही. ५५ लाख जनावरे जगवावी लागतील. माणसांचा विचार केला तरी १३५ लिटर पाणी मिळावे ही अपेक्षा आहे. १,८५००००० बाय १३५ गुणाकार केला, तर रोज किती लिटर पाणी लागणार याचा अंदाज येतो.सध्या लातूर शहराची अवस्था भयानक झाली आहे. महापालिकेने गेल्या १५ दिवसांपासून पाणीपुरवठाच केला नाही. कारण पाणीच नाही. मांजरा प्रकल्प कोरडेठाक मैदान बनले. पाण्याची वाहतूक पोलीस बंदोबस्तात करण्याची पाळी आली. येथे पाणी मूल्यवान आणि ज्वालाग्राही बनले आहे. किल्लारीचे पाणी नेण्यास गावकऱ्यांनी विरोध केला, रस्ते अडविले. जागोजागी हेच चित्र आहे. लातूर शहरात माणसं दिवसभर पाणी शोधताना दिसतात. हातगाडी, चारचाकी, रिक्षा, दुचाकी, इतकेच नव्हे तर गाढवांचाही वापर पाणी आणण्यासाठी केला जातो. लोकांनी तर रिक्षाच भाड्याने घेतल्या आहेत. लातूरमध्ये तर पाणी बचतीचे वेगवेगळे प्रकार चालू आहेत. ज्ञानप्रकाश बालविकास केंद्रात चार लिटर पाण्यात स्वच्छ अंघोळ कशी करता येते याचे प्रशिक्षणच मुलांना देण्यात आले. दुष्काळाची दाहकता अजून काय काय शिकवणार? पाण्याची काटकसर कशी करावी याचे प्रशिक्षण मुलांना देण्याचा हा उपक्रम स्तुत्यच म्हणावा लागेल. शंभर वर्षापूर्वी चिं. वि. जोशी या महान विनोदी लेखकाने ‘आमच्या गावातील पाण्याचे दुर्भिक्ष्य’ अशी कथा लिहून हसविले होते. लातूरकरांना हा अनुभव येत आहे पण क्षणोक्षणी रडवीत आहे.