शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
4
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
5
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
6
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
7
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
8
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
9
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
10
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
11
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
13
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
14
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
15
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
16
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
17
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
18
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
19
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
20
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची

मराठवाड्यातील पाण्याचे दुर्भिक्ष्य

By admin | Updated: March 16, 2016 08:39 IST

पाण्याने गेल्या महिनाभरात २१ बळी घेतले. पैकी बीडमध्ये १२, लातुरात ५, तर उस्मानाबादमध्ये ४ जणांना जीव गमवावा लागला. आणखी किती बळी घेणार? पाणी शोधणे ही जिवावरची जोखीम झाली आहे.

- सुधीर महाजनपाण्याने गेल्या महिनाभरात २१ बळी घेतले. पैकी बीडमध्ये १२, लातुरात ५, तर उस्मानाबादमध्ये ४ जणांना जीव गमवावा लागला. आणखी किती बळी घेणार? पाणी शोधणे ही जिवावरची जोखीम झाली आहे. मराठवाड्यात फाल्गुनातच वैशाख वणवा पेटला आहे. तसा तो तीन वर्षांपासून पेटतोच आहे. पाणी नाही, चारा नाही, सगळीकडे एक भयाण भणंग अवस्था निर्माण झाली आहे. काही गोष्टी माणसाला अस्वस्थ करतात. पण या दुष्काळाने मराठवाड्याचा माणूस आता अस्वस्थ होत नाही. निसर्गाच्या माराने तो बधिर झाला आहे. परिस्थितीचे भान, आकलन आहे; पण काही सुचत नाही. वणवा जाळत असला तरी संवेदना चटके बसण्यापलीकडे गेल्या आहेत. फाटक्या आभाळाला ठिगळ लावलं तरी ऊन भाजून काढणार आहे, ठिगळाचा उपयोग नाही.हल्ली दुष्काळाने अन्नान्नदशा होत नाही; तो दाही दिशा फिरवतो. पार मोकळे पडले, जनावरे खपाटी गेली. जो तो पाणी शोधत फिरताना दिसतो. दिवसभर चर्चा पाण्याची आणि वाट पाहायची ती टँकरची. लातूर, बीड, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यात अशी परिस्थिती आहे. पारावर गप्पांचे फड रंगत नाहीत. सारे मूकपणे शून्यात नजर लावून बसलेले दिसतात. कोणाचा भाऊ तर कोणाचा पोरगा पोट भरायला शहरात गेला. गावात उरली म्हातारीकोतारी माणसं. पाण्याअभावी अवघ्या खेड्यांचा जीवन रसच आटला आहे.मुख्यमंत्र्यांनी लातुरात मंत्र्यांची बैठक घेतली. त्या अगोदर दिवसभर २९ तालुक्यांची पाहणी मंत्र्यांनी केली. घोषणा झाल्या. पाऊस घोषणांचा पडतो. तो लोकानी जेटलींच्या अर्थसंकल्पातही अनुभवला. दुष्काळी अनुदानाची घोषणा कधीच झाली; पण तेसुद्धा पूर्ण मिळणार नाही. तुकड्या तुकड्यांनी तुकडे फेकल्यासारखे. सरकारच्या करणी आणि कथनीतला हा फरक ठळक जाणवतो. आज मराठवाड्यात १५०० टँकर्स पाणी वाटत फिरतात आणि दिवसामागे ही संख्या वाढत जाणार आहे. मराठवाड्यातील ११ प्रमुख सिंचन प्रकल्पांमध्ये अवघे साडेसहा टक्के पाणी आहे. अजून मार्च अर्धा जायचा. बाष्पीभवनाचा वेग पाहिला तर एक महिन्याच्या पाण्याची वाफ होणार. ४० लाख लोकांना दीड हजार टँकरने पाणी पुरवठा होतो. एप्रिलअखेर मोजकी गावे वगळता सगळीकडे टँकर लागणार. म्हणजे एकदाचा मराठवाड्याचा ‘टँकरवाडा’ झाला. लोकसंख्येचा विचार केला तर १ कोटी ८७ लाख लोकसंख्या आहे; पण तेवढाच विचार करून चालणार नाही. ५५ लाख जनावरे जगवावी लागतील. माणसांचा विचार केला तरी १३५ लिटर पाणी मिळावे ही अपेक्षा आहे. १,८५००००० बाय १३५ गुणाकार केला, तर रोज किती लिटर पाणी लागणार याचा अंदाज येतो.सध्या लातूर शहराची अवस्था भयानक झाली आहे. महापालिकेने गेल्या १५ दिवसांपासून पाणीपुरवठाच केला नाही. कारण पाणीच नाही. मांजरा प्रकल्प कोरडेठाक मैदान बनले. पाण्याची वाहतूक पोलीस बंदोबस्तात करण्याची पाळी आली. येथे पाणी मूल्यवान आणि ज्वालाग्राही बनले आहे. किल्लारीचे पाणी नेण्यास गावकऱ्यांनी विरोध केला, रस्ते अडविले. जागोजागी हेच चित्र आहे. लातूर शहरात माणसं दिवसभर पाणी शोधताना दिसतात. हातगाडी, चारचाकी, रिक्षा, दुचाकी, इतकेच नव्हे तर गाढवांचाही वापर पाणी आणण्यासाठी केला जातो. लोकांनी तर रिक्षाच भाड्याने घेतल्या आहेत. लातूरमध्ये तर पाणी बचतीचे वेगवेगळे प्रकार चालू आहेत. ज्ञानप्रकाश बालविकास केंद्रात चार लिटर पाण्यात स्वच्छ अंघोळ कशी करता येते याचे प्रशिक्षणच मुलांना देण्यात आले. दुष्काळाची दाहकता अजून काय काय शिकवणार? पाण्याची काटकसर कशी करावी याचे प्रशिक्षण मुलांना देण्याचा हा उपक्रम स्तुत्यच म्हणावा लागेल. शंभर वर्षापूर्वी चिं. वि. जोशी या महान विनोदी लेखकाने ‘आमच्या गावातील पाण्याचे दुर्भिक्ष्य’ अशी कथा लिहून हसविले होते. लातूरकरांना हा अनुभव येत आहे पण क्षणोक्षणी रडवीत आहे.