शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

नाटक दृकश्राव्य आणि रूपक

By admin | Updated: June 8, 2017 00:03 IST

संस्कृत साहित्यात नाटक आणि नाटककार ही संकल्पना खूप व्यापक अर्थानी आली आहे.

-डॉ. रामचंद्र देखणेसंस्कृत साहित्यात नाटक आणि नाटककार ही संकल्पना खूप व्यापक अर्थानी आली आहे. नाटककार हा केवळ नाट्यलेखक नसून तो कवी आहे. आणि नाटक ही केवळ संवादात्मक गद्यरचना नसून ते एक महाकाव्यही आहे. संस्कृत साहित्यात भास हा नाटककार म्हणून ख्यात असला तरी भास हा महाकवी म्हणूनही संबोधला गेला आहे.भासाचे स्वप्न वासवदत्त ही नाट्यकृती अजरामर ठरली आहे. इ.स. १९१० साली टी. सी. गणपतीशास्त्री हे विद्वान संशोधक पूर्वीच्या त्रावणकोक संस्थानात ग्रंथाचे संशोधन करीत असताना पद्मानाथ पुराजवळ मनाल्लीकर मठात त्यांना ३०० वर्षांपूर्वीचे मल्याळी लिपीतील जुने ग्रंथ सापडले. त्यात भासाची १३ नाटके भुर्जपत्रावर लिहिली होती. ‘मृच्छकटिक’ हे सर्वात प्राचीन नाटक समजले जाते. कालिदासाचे मालवीकाग्नि मित्रम् विक्रमोवर्षीयम आणि अभिज्ञान शाकुंतल ही नाटके संस्कृत नाट्यसृष्टीला उंचीवर नेऊन ठेवतात. या नाटकांमुळेच ‘काव्येशू नाटक रम्य तत्ररम्या शकुंतला!’ हे वचन नाट्य परंपरेत रूढ झाले. संस्कृत साहित्यात नाट्य आणि काव्य ही उत्तुंग प्रतिभेची दर्शने आहेत. संस्कृत साहित्यात नाटक हे साहित्याचे असे एक अंग आहे की, त्यात काव्य डोळ्यांनी पाहता येते. काव्यातील पात्रांसाठी मनोभूमिकेवर जसा कल्पनेने रंगमंच करावा लागतो तशी नाटकाला गरज नसते. तिथे कलेचा रंगमंच उभा असतो. म्हणून नाटकाला दृश्य काव्यही म्हटले जाते. नाटकाला साहित्यशास्त्रात रूपक असे म्हणतात. संत एकनाथ महाराजांनी भारुडाच्या माध्यमातून लोकांमध्ये रूढ असणारी अनेक रूपके मांडली आणि वासुदेव, गोंधळी, बैरागी, वेडा, मुका एडका, विंचू अशा बहुविध रूपकांमधून अंगाअंगात रंगमंच उभा केला. नाटकात पात्रांचा अभिनय घडविणारा प्रसंग आणि रंगमंच पाहायचा असतो आणि पात्रांचे संवाद आणि संगीत ऐकायचे असते. त्यापैकी जे दृश्य असते, तेच प्राधान्ये करून अभिनय असते. या अभिनय दृश्यांचे मूळ नाव रूपक असे आहे. एका अर्थाने नाटक हे महाकाव्यच आहे. भरताने नाटकाचे लक्षण सांगताना म्हटले आहे की, ‘‘देवता मनुष्य, राजे आणि लोकप्रसिद्ध महात्मे यांच्या पूर्ववृत्तानुचरित नाटक नाम तद्भवेत!’’ पूर्ववृत्ताचे अनुकरण म्हणजे नाटक होय. कोणत्याही कलाकृती या एकीकडे मनोरंजनासाठी तर दुसरीकडे समाजाला ज्ञान देण्यासाठी उभ्या असतात. त्या दृष्टीने अभिज्ञान, अभिनय आणि अभिव्यक्ती यांचे एकत्रिकरण म्हणजे नाटक होय. नाटक नसते तर मानवी मन व्यक्तही झाले नसते आणि मुक्तही झाले नसते. त्यासाठी संवाद घडावा लागतो. हा संवाद जेव्हा पात्रा-पात्रांशी आणि रसिकांशी होतो तेव्हा दृश्य रंगमंच उभा राहतो आणि हा संवाद जेव्हा स्वगत स्वरूपात मनाशी संवाद घडवितो तेव्हा मानवी मनातही एक अदृश्य रंगमंच साकारतो.