शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
4
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
5
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
6
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
7
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
8
"ही कुणाची चप्पल घातलीस?" आईने बदललेली चप्पल विचारताच गतिमंद मुलीने सांगितला झालेल्या अत्याचाराचा थरार !
9
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
10
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
11
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
12
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
13
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
14
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
15
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
16
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
17
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
18
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
19
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
20
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा

नाटक दृकश्राव्य आणि रूपक

By admin | Updated: June 8, 2017 00:03 IST

संस्कृत साहित्यात नाटक आणि नाटककार ही संकल्पना खूप व्यापक अर्थानी आली आहे.

-डॉ. रामचंद्र देखणेसंस्कृत साहित्यात नाटक आणि नाटककार ही संकल्पना खूप व्यापक अर्थानी आली आहे. नाटककार हा केवळ नाट्यलेखक नसून तो कवी आहे. आणि नाटक ही केवळ संवादात्मक गद्यरचना नसून ते एक महाकाव्यही आहे. संस्कृत साहित्यात भास हा नाटककार म्हणून ख्यात असला तरी भास हा महाकवी म्हणूनही संबोधला गेला आहे.भासाचे स्वप्न वासवदत्त ही नाट्यकृती अजरामर ठरली आहे. इ.स. १९१० साली टी. सी. गणपतीशास्त्री हे विद्वान संशोधक पूर्वीच्या त्रावणकोक संस्थानात ग्रंथाचे संशोधन करीत असताना पद्मानाथ पुराजवळ मनाल्लीकर मठात त्यांना ३०० वर्षांपूर्वीचे मल्याळी लिपीतील जुने ग्रंथ सापडले. त्यात भासाची १३ नाटके भुर्जपत्रावर लिहिली होती. ‘मृच्छकटिक’ हे सर्वात प्राचीन नाटक समजले जाते. कालिदासाचे मालवीकाग्नि मित्रम् विक्रमोवर्षीयम आणि अभिज्ञान शाकुंतल ही नाटके संस्कृत नाट्यसृष्टीला उंचीवर नेऊन ठेवतात. या नाटकांमुळेच ‘काव्येशू नाटक रम्य तत्ररम्या शकुंतला!’ हे वचन नाट्य परंपरेत रूढ झाले. संस्कृत साहित्यात नाट्य आणि काव्य ही उत्तुंग प्रतिभेची दर्शने आहेत. संस्कृत साहित्यात नाटक हे साहित्याचे असे एक अंग आहे की, त्यात काव्य डोळ्यांनी पाहता येते. काव्यातील पात्रांसाठी मनोभूमिकेवर जसा कल्पनेने रंगमंच करावा लागतो तशी नाटकाला गरज नसते. तिथे कलेचा रंगमंच उभा असतो. म्हणून नाटकाला दृश्य काव्यही म्हटले जाते. नाटकाला साहित्यशास्त्रात रूपक असे म्हणतात. संत एकनाथ महाराजांनी भारुडाच्या माध्यमातून लोकांमध्ये रूढ असणारी अनेक रूपके मांडली आणि वासुदेव, गोंधळी, बैरागी, वेडा, मुका एडका, विंचू अशा बहुविध रूपकांमधून अंगाअंगात रंगमंच उभा केला. नाटकात पात्रांचा अभिनय घडविणारा प्रसंग आणि रंगमंच पाहायचा असतो आणि पात्रांचे संवाद आणि संगीत ऐकायचे असते. त्यापैकी जे दृश्य असते, तेच प्राधान्ये करून अभिनय असते. या अभिनय दृश्यांचे मूळ नाव रूपक असे आहे. एका अर्थाने नाटक हे महाकाव्यच आहे. भरताने नाटकाचे लक्षण सांगताना म्हटले आहे की, ‘‘देवता मनुष्य, राजे आणि लोकप्रसिद्ध महात्मे यांच्या पूर्ववृत्तानुचरित नाटक नाम तद्भवेत!’’ पूर्ववृत्ताचे अनुकरण म्हणजे नाटक होय. कोणत्याही कलाकृती या एकीकडे मनोरंजनासाठी तर दुसरीकडे समाजाला ज्ञान देण्यासाठी उभ्या असतात. त्या दृष्टीने अभिज्ञान, अभिनय आणि अभिव्यक्ती यांचे एकत्रिकरण म्हणजे नाटक होय. नाटक नसते तर मानवी मन व्यक्तही झाले नसते आणि मुक्तही झाले नसते. त्यासाठी संवाद घडावा लागतो. हा संवाद जेव्हा पात्रा-पात्रांशी आणि रसिकांशी होतो तेव्हा दृश्य रंगमंच उभा राहतो आणि हा संवाद जेव्हा स्वगत स्वरूपात मनाशी संवाद घडवितो तेव्हा मानवी मनातही एक अदृश्य रंगमंच साकारतो.