शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
3
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
4
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
5
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
6
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
8
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
9
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
10
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
11
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
12
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
13
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
14
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
15
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
16
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
17
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
18
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
19
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
20
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजीला पर्याय आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 23:38 IST

बोलीभाषांच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्रस्ताव मांडण्यात आला.

बोलीभाषांच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्रस्ताव मांडण्यात आला. बोलीभाषांचे संवर्धन करण्यासाठी शिक्षणप्रणालीत भारतीय भाषांचा जास्तीत जास्त उपयोग व्हायला हवा. प्राथमिक शिक्षणासोबतच तांत्रिक व वैद्यकीय शिक्षणदेखील भारतीय भाषांत व्हावे अशी सूचना संघाने केली आहे. आता संघानेच प्रस्ताव मांडला असल्यामुळे साहजिकच केंद्र व राज्य शासनांकडून त्या हिशेबाने पावले उचलण्यात येतील. अगोदरचा इतिहास हेच सांगतो. प्राथमिक शिक्षण मातृभाषेत व्हायला हवे, यात दुमत असण्याचे कारणच नाही. मात्र तांत्रिक व वैद्यकीय शिक्षणासंदर्भातील सूचनेवर अनेक आक्षेप येण्याची शक्यता आहे. जगभरातील संशोधन इंग्रजी भाषेतच आहे. शिवाय या अभ्यासक्रमांमधील विविध संकल्पना व विषय हे इंग्रजीतच आहेत. संशोधनपत्रिकादेखील इंग्रजी भाषेतच प्रसिद्ध होतात. अशा स्थितीत इंग्रजीपासून दूर राहून हे अभ्यासक्रम शिकता येतील का, असा प्रश्न निश्चित उपस्थित होऊ शकतो. जर भारतीय भाषांमध्ये शिक्षण द्यायचे असेल तर सर्व अभ्यासक्रमांचे अभ्याससाहित्य सर्वात अगोदर त्या हिशेबाने बदलावे लागेल. सोबतच शिक्षकांनादेखील या भाषांचा अभ्यास करावा लागेल. सव्वाशे कोटीहून जास्त लोकसंख्या असलेल्या देशात ही बाब निश्चितच आव्हानात्मक आहे. त्यामुळे संघाची सूचना किती व्यवहार्य आहे, असा टीकात्मक सूर शिक्षण वर्तुळातून उपस्थित होत आहे. परंतु याच पैलूची दुसरी बाजूदेखील विचार करण्याजोगी आहे. जपानसारख्या देशात इंग्रजी नव्हे तर स्थानिक भाषेत शिक्षण होते. जगातील अनेक विकसित देशांत तेथील स्थानिक भाषेलाच महत्त्व दिले जाते. भाषांमध्ये संस्कृती असते व परंपरा एका पिढीहून दुसºया पिढीकडे नेण्याचे त्या माध्यम असतात. अनेकदा इंग्रजी चांगली नाही, म्हणून हुशार विद्यार्थी तांत्रिक व वैद्यकीय अभ्यासक्रमांत प्रवेश घेऊ शकत नाही. ‘आयएएस’ अधिकारी होण्यासाठी इंग्रजीची अट नाही. कारण व्यक्तीमधील हुशारी व संवेदनशीलता यांची चाचणी त्यात होत असते. वैद्यकीय क्षेत्रात तर संवेदनशीलतेला फार महत्त्व आहे. एखादी व्यक्ती इंग्रजीत चांगली नसेल पण समोरच्याची वेदना जाणणारी असेल तर ती निश्चितच चांगली वैद्यकीय तज्ज्ञ होऊच शकते. एखाद्या समस्येचे निदान झाल्यावर उपायदेखील अभिप्रेत असतो. संघानेदेखील सूचनांसमवेत त्यांच्या अंमलबजावणीची ‘ब्लूप्रिंट’ मांडली असती तर संकल्पनांचे चित्र स्पष्ट झाले असते. इंग्रजी हवी की नको हा चर्चेचा विषय आहेच. मात्र भारतीय भाषांमधून शिक्षण सर्वांना संधी देणारे ठरेल.