शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

संघाला समांतर लष्कर निर्माण करण्याची गरज का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 04:07 IST

संघ आपल्या स्वयंसेवकांचे लष्कर उभारणार ते पाकिस्तान आणि चीनशी लढण्यासाठी नको आहे. ती त्यांच्यात धमकच नाही. ते हवे आहे येथील व्यवस्था उलथवायला. त्यासाठी ओबीसी समाजाला धर्माची गोळी दिली आहे.

- डॉ. जितेंद्र आव्हाड(आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस)संघ आपल्या स्वयंसेवकांचे लष्कर उभारणार ते पाकिस्तान आणि चीनशी लढण्यासाठी नको आहे. ती त्यांच्यात धमकच नाही. ते हवे आहे येथील व्यवस्था उलथवायला. त्यासाठी ओबीसी समाजाला धर्माची गोळी दिली आहे.लष्कराला सहा महिने लागतील, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तीन दिवसात सेना उभारू शकतो, असे विधान संघाचे मुख्य मोहन भागवत यांनी केले. मुळात लष्करी प्रशिक्षण ही काही चेष्टा नव्हे. सियाचीनच्या बर्फात उणे ५५ अंशाच्या थंडीत किंवा कच्छच्या रणात ५५ अंशाच्या उन्हात पहारा करणे शाखेत जाऊन लाठ्याकाठ्या फिरवण्याइतकी सोपी गोष्ट नाही. एक लिटर पाण्यात अख्खा दिवस काढायचा किंवा प्रसंगी साप मारून खायचा हे गुळ पोळी खाणाºया किंवा वरण भातावर साजूक तुपाची धार असल्याशिवाय घशाखाली घास न उतरणाºयांना जमेल का हा एखाद्या विनोदी नाटकाचा विषय होऊ शकतो. पण रोज आपल्या प्राणांची आहुती देणाºया जवानांपेक्षा आपले स्वयंसेवक जास्त चांगले आहेत हे म्हणणाºया भागवतांना कुणाची उपमा देऊ या?शौर्याची किंवा बलिदानाची काहीही परंपरा नसलेला संघ जेव्हा अशी भाषा करतो, तेव्हा त्याचा अर्थ काय? १९६५ च्या युद्धामध्ये पाकिस्तानचे तीन रणगाडे हातबॉम्ब टाकून उद्ध्वस्त करणारा परमवीर अब्दुल हमीद, कारगिलचे शेवटचे शिखर सर करून तिरंगा फडकवताना आपल्या रेडिओवर खाली आपल्या कमांडरला ह्यह्यरकफ हए अफए अळ ळऌए ळडढह्णह्ण हा संदेश पाठवणारा कॅप्टन सचिन निंबाळकर किंवा २६/११ च्या हल्ल्यामध्ये मारला गेलेला कमांडो दलाचा मेजर संदीप उन्नीकृष्णन असे किती शूर सैनिक संघाच्या मुशीत तयार झाले? घरी आई आजारी असते किंवा गरोदर पत्नी असते, या सगळ्यांची पर्वा न करता सीमेवर आपले प्राण देण्यासाठी तयार असलेले किती शिपाईगडी संघाच्या शाखेत तयार झाले? केवळ त्यांच्या मृत्यूचे भांडवल करून गलिच्छ राजकारण खेळणाºया संघाने आपापली पोरं मात्र इंग्लंड, अमेरिकेत स्थायिक करून घेतली. म्हणजे मरणार आम्ही आणि तोरा मिरवणार हे. हे घृणास्पद काम मात्र संघाने १९२५ सालापासून चोख बजावले.इतिहासाचा विद्यार्थी म्हणून मला हिटलरचा काळ आठवतो. आपला उजवा हात हेन्रीच हिमलर याच्या पुढाकाराने त्याने एस.एस. ही संघटना नाझी पक्षाच्या अंतर्गत तयार केली. जर्मनीचं ‘‘वांशिक शुद्धीकरण’’ करण्यासाठी स्थापना झालेली ही संघटना फक्त हिटलरशी बांधिलकी मानत होती. तिला लष्करी दर्जा देण्यात आला. हिटलरच्या सर्व राजकीय विरोधकांना संपवायचं काम तिच्याकडे होतं.आर.एस.एस. ही एस.एस.च्या मार्गाने निघालेली संघटना आहे हे भागवत यांच्या विधानातून स्पष्ट होत आहे. अल्पसंख्यांक आणि दलित यांच्यावर आज बेधडक होणारे अत्याचार हा त्याचा सराव आहे. अन्यथा स्वत:ला सांस्कृतिक संघटना म्हणवणाºया संघाला समांतर लष्कर निर्माण करण्याची गरज का भासावी? तरुण पिढीला माहीत नसेल, संघाच्या विचारसरणीनुसार चालणाºया ज्या संघटना भारतात आहेत त्यात भोसला मिलिटरी स्कूल ही एक आहे. डॉ. बाळकृष्ण मुंजे यांनी तिची स्थापना केली. एकेकाळी काँग्रेसमध्ये टिळकांचे कट्टर समर्थक असलेले मुंजे कडवे हिंदुत्ववादी होते.संघाला इथे स्वातंत्र्योत्तर काळात निर्माण झालेली लोकशाही, घटना आणि तिरंगा कधीच मान्य नव्हता. आपले मुख्यालय असलेल्या रेशीमबागेवर तिरंगा फडकवणाºया दोन तरुणांवर संघाने ११ वर्षे खटला चालवला. फाळणी होऊनही जो मुस्लीम समाज या भारताला आपलं मानून इथे राहिला त्याला ते आपला मानायला तयार नाहीत.भागवतांच्या सारवासारवीला आता काही अर्थ नाही. एस.एस.चा भारतीय अवतार हा आर.एस.एस. असणार हे आता उघड आहे. 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ