शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

संघाला समांतर लष्कर निर्माण करण्याची गरज का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 04:07 IST

संघ आपल्या स्वयंसेवकांचे लष्कर उभारणार ते पाकिस्तान आणि चीनशी लढण्यासाठी नको आहे. ती त्यांच्यात धमकच नाही. ते हवे आहे येथील व्यवस्था उलथवायला. त्यासाठी ओबीसी समाजाला धर्माची गोळी दिली आहे.

- डॉ. जितेंद्र आव्हाड(आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस)संघ आपल्या स्वयंसेवकांचे लष्कर उभारणार ते पाकिस्तान आणि चीनशी लढण्यासाठी नको आहे. ती त्यांच्यात धमकच नाही. ते हवे आहे येथील व्यवस्था उलथवायला. त्यासाठी ओबीसी समाजाला धर्माची गोळी दिली आहे.लष्कराला सहा महिने लागतील, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तीन दिवसात सेना उभारू शकतो, असे विधान संघाचे मुख्य मोहन भागवत यांनी केले. मुळात लष्करी प्रशिक्षण ही काही चेष्टा नव्हे. सियाचीनच्या बर्फात उणे ५५ अंशाच्या थंडीत किंवा कच्छच्या रणात ५५ अंशाच्या उन्हात पहारा करणे शाखेत जाऊन लाठ्याकाठ्या फिरवण्याइतकी सोपी गोष्ट नाही. एक लिटर पाण्यात अख्खा दिवस काढायचा किंवा प्रसंगी साप मारून खायचा हे गुळ पोळी खाणाºया किंवा वरण भातावर साजूक तुपाची धार असल्याशिवाय घशाखाली घास न उतरणाºयांना जमेल का हा एखाद्या विनोदी नाटकाचा विषय होऊ शकतो. पण रोज आपल्या प्राणांची आहुती देणाºया जवानांपेक्षा आपले स्वयंसेवक जास्त चांगले आहेत हे म्हणणाºया भागवतांना कुणाची उपमा देऊ या?शौर्याची किंवा बलिदानाची काहीही परंपरा नसलेला संघ जेव्हा अशी भाषा करतो, तेव्हा त्याचा अर्थ काय? १९६५ च्या युद्धामध्ये पाकिस्तानचे तीन रणगाडे हातबॉम्ब टाकून उद्ध्वस्त करणारा परमवीर अब्दुल हमीद, कारगिलचे शेवटचे शिखर सर करून तिरंगा फडकवताना आपल्या रेडिओवर खाली आपल्या कमांडरला ह्यह्यरकफ हए अफए अळ ळऌए ळडढह्णह्ण हा संदेश पाठवणारा कॅप्टन सचिन निंबाळकर किंवा २६/११ च्या हल्ल्यामध्ये मारला गेलेला कमांडो दलाचा मेजर संदीप उन्नीकृष्णन असे किती शूर सैनिक संघाच्या मुशीत तयार झाले? घरी आई आजारी असते किंवा गरोदर पत्नी असते, या सगळ्यांची पर्वा न करता सीमेवर आपले प्राण देण्यासाठी तयार असलेले किती शिपाईगडी संघाच्या शाखेत तयार झाले? केवळ त्यांच्या मृत्यूचे भांडवल करून गलिच्छ राजकारण खेळणाºया संघाने आपापली पोरं मात्र इंग्लंड, अमेरिकेत स्थायिक करून घेतली. म्हणजे मरणार आम्ही आणि तोरा मिरवणार हे. हे घृणास्पद काम मात्र संघाने १९२५ सालापासून चोख बजावले.इतिहासाचा विद्यार्थी म्हणून मला हिटलरचा काळ आठवतो. आपला उजवा हात हेन्रीच हिमलर याच्या पुढाकाराने त्याने एस.एस. ही संघटना नाझी पक्षाच्या अंतर्गत तयार केली. जर्मनीचं ‘‘वांशिक शुद्धीकरण’’ करण्यासाठी स्थापना झालेली ही संघटना फक्त हिटलरशी बांधिलकी मानत होती. तिला लष्करी दर्जा देण्यात आला. हिटलरच्या सर्व राजकीय विरोधकांना संपवायचं काम तिच्याकडे होतं.आर.एस.एस. ही एस.एस.च्या मार्गाने निघालेली संघटना आहे हे भागवत यांच्या विधानातून स्पष्ट होत आहे. अल्पसंख्यांक आणि दलित यांच्यावर आज बेधडक होणारे अत्याचार हा त्याचा सराव आहे. अन्यथा स्वत:ला सांस्कृतिक संघटना म्हणवणाºया संघाला समांतर लष्कर निर्माण करण्याची गरज का भासावी? तरुण पिढीला माहीत नसेल, संघाच्या विचारसरणीनुसार चालणाºया ज्या संघटना भारतात आहेत त्यात भोसला मिलिटरी स्कूल ही एक आहे. डॉ. बाळकृष्ण मुंजे यांनी तिची स्थापना केली. एकेकाळी काँग्रेसमध्ये टिळकांचे कट्टर समर्थक असलेले मुंजे कडवे हिंदुत्ववादी होते.संघाला इथे स्वातंत्र्योत्तर काळात निर्माण झालेली लोकशाही, घटना आणि तिरंगा कधीच मान्य नव्हता. आपले मुख्यालय असलेल्या रेशीमबागेवर तिरंगा फडकवणाºया दोन तरुणांवर संघाने ११ वर्षे खटला चालवला. फाळणी होऊनही जो मुस्लीम समाज या भारताला आपलं मानून इथे राहिला त्याला ते आपला मानायला तयार नाहीत.भागवतांच्या सारवासारवीला आता काही अर्थ नाही. एस.एस.चा भारतीय अवतार हा आर.एस.एस. असणार हे आता उघड आहे. 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ