शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

संघाला समांतर लष्कर निर्माण करण्याची गरज का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 04:07 IST

संघ आपल्या स्वयंसेवकांचे लष्कर उभारणार ते पाकिस्तान आणि चीनशी लढण्यासाठी नको आहे. ती त्यांच्यात धमकच नाही. ते हवे आहे येथील व्यवस्था उलथवायला. त्यासाठी ओबीसी समाजाला धर्माची गोळी दिली आहे.

- डॉ. जितेंद्र आव्हाड(आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस)संघ आपल्या स्वयंसेवकांचे लष्कर उभारणार ते पाकिस्तान आणि चीनशी लढण्यासाठी नको आहे. ती त्यांच्यात धमकच नाही. ते हवे आहे येथील व्यवस्था उलथवायला. त्यासाठी ओबीसी समाजाला धर्माची गोळी दिली आहे.लष्कराला सहा महिने लागतील, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तीन दिवसात सेना उभारू शकतो, असे विधान संघाचे मुख्य मोहन भागवत यांनी केले. मुळात लष्करी प्रशिक्षण ही काही चेष्टा नव्हे. सियाचीनच्या बर्फात उणे ५५ अंशाच्या थंडीत किंवा कच्छच्या रणात ५५ अंशाच्या उन्हात पहारा करणे शाखेत जाऊन लाठ्याकाठ्या फिरवण्याइतकी सोपी गोष्ट नाही. एक लिटर पाण्यात अख्खा दिवस काढायचा किंवा प्रसंगी साप मारून खायचा हे गुळ पोळी खाणाºया किंवा वरण भातावर साजूक तुपाची धार असल्याशिवाय घशाखाली घास न उतरणाºयांना जमेल का हा एखाद्या विनोदी नाटकाचा विषय होऊ शकतो. पण रोज आपल्या प्राणांची आहुती देणाºया जवानांपेक्षा आपले स्वयंसेवक जास्त चांगले आहेत हे म्हणणाºया भागवतांना कुणाची उपमा देऊ या?शौर्याची किंवा बलिदानाची काहीही परंपरा नसलेला संघ जेव्हा अशी भाषा करतो, तेव्हा त्याचा अर्थ काय? १९६५ च्या युद्धामध्ये पाकिस्तानचे तीन रणगाडे हातबॉम्ब टाकून उद्ध्वस्त करणारा परमवीर अब्दुल हमीद, कारगिलचे शेवटचे शिखर सर करून तिरंगा फडकवताना आपल्या रेडिओवर खाली आपल्या कमांडरला ह्यह्यरकफ हए अफए अळ ळऌए ळडढह्णह्ण हा संदेश पाठवणारा कॅप्टन सचिन निंबाळकर किंवा २६/११ च्या हल्ल्यामध्ये मारला गेलेला कमांडो दलाचा मेजर संदीप उन्नीकृष्णन असे किती शूर सैनिक संघाच्या मुशीत तयार झाले? घरी आई आजारी असते किंवा गरोदर पत्नी असते, या सगळ्यांची पर्वा न करता सीमेवर आपले प्राण देण्यासाठी तयार असलेले किती शिपाईगडी संघाच्या शाखेत तयार झाले? केवळ त्यांच्या मृत्यूचे भांडवल करून गलिच्छ राजकारण खेळणाºया संघाने आपापली पोरं मात्र इंग्लंड, अमेरिकेत स्थायिक करून घेतली. म्हणजे मरणार आम्ही आणि तोरा मिरवणार हे. हे घृणास्पद काम मात्र संघाने १९२५ सालापासून चोख बजावले.इतिहासाचा विद्यार्थी म्हणून मला हिटलरचा काळ आठवतो. आपला उजवा हात हेन्रीच हिमलर याच्या पुढाकाराने त्याने एस.एस. ही संघटना नाझी पक्षाच्या अंतर्गत तयार केली. जर्मनीचं ‘‘वांशिक शुद्धीकरण’’ करण्यासाठी स्थापना झालेली ही संघटना फक्त हिटलरशी बांधिलकी मानत होती. तिला लष्करी दर्जा देण्यात आला. हिटलरच्या सर्व राजकीय विरोधकांना संपवायचं काम तिच्याकडे होतं.आर.एस.एस. ही एस.एस.च्या मार्गाने निघालेली संघटना आहे हे भागवत यांच्या विधानातून स्पष्ट होत आहे. अल्पसंख्यांक आणि दलित यांच्यावर आज बेधडक होणारे अत्याचार हा त्याचा सराव आहे. अन्यथा स्वत:ला सांस्कृतिक संघटना म्हणवणाºया संघाला समांतर लष्कर निर्माण करण्याची गरज का भासावी? तरुण पिढीला माहीत नसेल, संघाच्या विचारसरणीनुसार चालणाºया ज्या संघटना भारतात आहेत त्यात भोसला मिलिटरी स्कूल ही एक आहे. डॉ. बाळकृष्ण मुंजे यांनी तिची स्थापना केली. एकेकाळी काँग्रेसमध्ये टिळकांचे कट्टर समर्थक असलेले मुंजे कडवे हिंदुत्ववादी होते.संघाला इथे स्वातंत्र्योत्तर काळात निर्माण झालेली लोकशाही, घटना आणि तिरंगा कधीच मान्य नव्हता. आपले मुख्यालय असलेल्या रेशीमबागेवर तिरंगा फडकवणाºया दोन तरुणांवर संघाने ११ वर्षे खटला चालवला. फाळणी होऊनही जो मुस्लीम समाज या भारताला आपलं मानून इथे राहिला त्याला ते आपला मानायला तयार नाहीत.भागवतांच्या सारवासारवीला आता काही अर्थ नाही. एस.एस.चा भारतीय अवतार हा आर.एस.एस. असणार हे आता उघड आहे. 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ