शहरं
Join us  
Trending Stories
1
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
2
Asia Cup Final : सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
3
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
4
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
5
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
6
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
7
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
8
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
9
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
10
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
11
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
12
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
13
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
14
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
15
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
16
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
17
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
18
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
19
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
20
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'

मूळ दुखण्याकडे दुर्लक्ष नको

By admin | Updated: August 27, 2016 05:54 IST

वैद्यकीय व्यवसायाच्या अडचणी मांडत असताना तिथे निर्माण झालेल्या समस्यांकडे काणाडोळा करणे धोकादायक आहे.

वैद्यकीय व्यवसायाच्या अडचणी मांडत असताना तिथे निर्माण झालेल्या समस्यांकडे काणाडोळा करणे धोकादायक आहे. संघटनेचे बळ मोठे असते आणि संघटीत वर्ग स्वत:चे म्हणणे उच्चरवाने मांडू शकतो हे समाजात आपल्याला दिसून येते. शिक्षक, प्राध्यापक, वकील, डॉक्टर, अभियंते, बिल्डर, व्यापारी, सरकारी कर्मचारी अशा नोकरदार ते व्यापारी-व्यावसायिक या सर्वच घटकांच्या प्रभावशाली संघटना कार्यरत आहेत. लोकशाहीत मतपेढीला महत्त्व असल्याने सरकारदेखील अशा घटकांविषयी निर्णय घेताना त्याच्या परिणामांविषयी विचार करीत असते. त्यामुळे या घटकांची वार्षिक अधिवेशने ही शक्तीपरीक्षा आणि समस्या, अडचणींचा ऊहापोह करण्यावर केंद्रित राहातात. समाजापुढील ज्वलंत समस्यांविषयी जबाबदार घटक म्हणून काय भूमिका घेता येईल याविषयी अपवादाने चर्चा होते, असा एकंदर अनुभव आहे. असाच अनुभव आयएमएच्या (इंडियन मेडिकल असोसिएनशन) जळगाव येथे झालेल्या दोन दिवसीय अधिवेशनातही आला. या अधिवेशनात डॉक्टरांवरील हल्ले, रुग्णालयाची तोडफोड, पीसीएनडीटी (गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र कायदा) नुसार कारवाई, बोगस डॉक्टरांवरील कारवाईला टाळाटाळ, पॅथॉलॉजीविषयीच्या निर्णयातील धरसोडपणा, नवीन दवाखान्यांच्या नोंदणीसाठी अडवणूक, मेडिकल कौन्सिलच्या अडचणी या वैद्यकीय व्यावसायिकांच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर चर्चा झाली. सरकारची अडवणुकीची भूमिका कायम राहिल्यास संपाचा इशारादेखील या अधिवेशनात देण्यात आला. ंअर्थात रेडिओलॉजिस्ट संघटनेने यापूर्वीदेखील संप केलेलाच आहे. मात्र इतर घटकांनी संप करणे आणि डॉक्टरांनी संप करणे यात मोठा फरक आहे. रुग्णाच्या जीवन मरणाशी या व्यवसायाचा संबंध असल्याने डॉक्टर आणि सरकार या दोन्ही घटकांमध्ये सामंजस्य आणि तारतम्य असण्याची आवश्यकता आहे. आयएमएच्या प्रतिपादनानुसार राज्यात खाजगी वैद्यकीय सेवा ८० टक्के आणि सरकारी सेवा केवळ २० टक्के आहे. अशा स्थितीत डॉक्टरांनी संपावर जायचे म्हटल्यास किती भयावह स्थिती निर्माण होईले, याची कल्पना करता येऊ शकते. गर्भलिंग निदानामुळे मुलींच्या संख्येत झालेली मोठी घट लक्षात घेऊन सरकारने अशा तपासणी व निदानावर निर्बंध घातले. याचा अर्थ वैद्यकीय व्यवसायात हा प्रकार सुरु होता. आणि ते सर्वोच्च संस्था असलेल्या आयएमएला रोखता आले नाही. आता या कायद्याची कठोर अंमलबजावणी होत असताना जळगावात हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण ९२२ एवढे झाले आहे, याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. आयुर्वेदिक व्यावसायिकांना अ‍ॅलोपॅथी या आधुनिक औशधोपचार पद्धतीचा वापर करण्यास सरकारने दिलेल्या परवानगीला अधिवेशनात विरोध करण्यात आला. हा विरोध अनाठायी आहे. ग्रामीण भागात एकूणच वैद्यकीय व्यावसायिकांची वानवा आहे. ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रातही आनंदीआनंद आहे. अशा वेळी आयुर्वेदिक, होमिओपॅथी आणि युनानी व्यावसायिक रुग्णसेवा देत आहेत. अ‍ॅलोपॅथीचा छोटा अभ्यासक्रम त्यांनी करावा, असा आग्रह धरणे सयुिक्तकच ठरु शकते.डॉक्टरांवरील हल्ले आणि रुग्णालयांची तोडफोड हे प्रकार गंभीर आहेत. सरकारने ते रोखण्यासाठी कठोर पावले उचलायला हवी, याबाबत दुमत नाही. काही काळापूर्वी डॉक्टरांना देवदूत मानले जात होते. फॅमिली डॉक्टर या संकल्पनेमुळे रुग्णांशी पिढ्यान्पिढ्यांचे संबंध असायचे. ही परिस्थिती बदलली. समाज बदलला आणि डॉक्टरदेखील अधिक व्यावसायिक झाले. अत्याधुनिक यंत्रांमुळे असाध्य रोगांचे निदान व उपचार होऊ लागले. पंचतारांकित हॉटेल्सच्या तोडीस तोड अशी सर्वसुविधायुक्त रुग्णालये उभारली गेली. ही प्रगती होत असताना रुग्णांशी असलेला संवाद कमी झाला. याविषयीची गांभीर्याने केलेली चर्चा अधिवेशनात अपेक्षित होती.- मिलिंद कुलकर्णी