शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

दुजाभाव नको

By admin | Updated: January 22, 2016 02:37 IST

मूल रडत नाही तोवर आईलाही पान्हा फुटत नाही असे म्हटले जाते ते खरे असल्याचा प्रत्यय वारंवार येत असतो. खरीप हंगाम पूर्णत: बुडाल्यानंतर राज्यभरातील शेतकरी

मूल रडत नाही तोवर आईलाही पान्हा फुटत नाही असे म्हटले जाते ते खरे असल्याचा प्रत्यय वारंवार येत असतो. खरीप हंगाम पूर्णत: बुडाल्यानंतर राज्यभरातील शेतकरी हवालदिल झाला होता. बेमोसमी पावसाच्या नुकसानीच्या जखमांचे व्रण ताजे असताना त्यावर मलमपट्टी करण्याऐवजी मीठच चोळले गेल्याने शेतकऱ्यांना कोणी वाली आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होऊ लागला होता. चहूबाजूने दुष्काळी मदतीची मागणी झाल्यावर राज्य शासन जागे झाले आणि नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे केंद्राकडे १५ हजार ७४७ गावांसाठी तीन हजार ५७८ कोटींच्या निधीची मागणी केली. परंतु केंद्राने दुष्काळी मदतीचा पहिला टप्पा म्हणून दोन हजार कोटींची मदत दिली. २० आॅक्टोबरच्या नजरअंदाज पैसेवारीच्या आधारे निवडक गावांना मदत दिली हे उत्तमच पण मदत मिळालेल्या गावांप्रमाणेच दुष्काळाचे चटके सोसत असलेल्या अजून १२ हजार गावांचे काय? अंतिम पैसेवारीनंतर या गावांची पीक आणेवारीदेखील ५० पैशाच्या आतच होती. ती गावेसुद्धा मदतीसाठी पात्र होती. फरक तो इतकाच की त्यांची नोंद अंतिम पैसेवारीनंतर झाली. यामुळे जर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीआरएफ) या बारा हजार गावातील शेतकऱ्यांना मदतीसाठी अपात्र ठरवित असेल तर एकप्रकारे तो त्यांच्यावर अन्याय केल्यासारखेच होईल. यातील बहुतांशी गावे सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या होणाऱ्या विदर्भातील आहेत. आधीच अस्मानी संकटांचा मुकाबला करताना हतबल झालेल्या बळीराजावर एनडीआरएफमुळे सुलतानी संकटाला सामोरे जायची वेळ येत असेल तर यापेक्षा शोकांतिका दुसरी कोणती असू शकेल. प्रशासनावर राजकीय दबाव आणून मदतीपासून डावलण्यात आलेल्या त्या बारा हजार गावात दुष्काळ दाखविण्याचा एनडीआरएफचा संशय आहे. शोध घेतला किंवा खरी माहिती जाणून घेतली तर संशयाच्या धुक्याचा पडदा दूर होऊ शकतो. परंतु केवळ संशयामुळे त्या बारा हजार गावातील शेतकऱ्यांवर अन्याय व्हायला नको. मदतीत दुजाभाव करण्याऐवजी शासकीय मदतीचा लाभ त्यांनाही झाल्यास आर्थिक संकटातून सावरण्याचे किमान बळ तरी त्यांच्या अंगी येऊ शकेल.