शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

‘कर’नहीं तो डर काहेका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 23:45 IST

सामान्य नागरिकांचा विविध कामांसाठी महापालिकेशी संबंध येतो. काहीवेळा प्रश्न सहज सुटतात, पण बुहतांश वेळी प्रश्न सुटण्याऐवजी अनागोंदी कारभार व मारावे लागणारे हेलपाटे यातून होणा-या मनस्तापामुळे ते अधिक क्लिष्ट होत जातात.

सामान्य नागरिकांचा विविध कामांसाठी महापालिकेशी संबंध येतो. काहीवेळा प्रश्न सहज सुटतात, पण बुहतांश वेळी प्रश्न सुटण्याऐवजी अनागोंदी कारभार व मारावे लागणारे हेलपाटे यातून होणा-या मनस्तापामुळे ते अधिक क्लिष्ट होत जातात. मालमत्ता कर आकारणीचे असेच एक भूत सध्या नागपूरकरांच्या मानगुटीवर बसले आहे. ते उतरविण्यासाठी महापालिका मात्र ठोस पावले उचलण्यास तयार नाही. नागरिकांना कराच्या भरमसाठ डिमांड पाठविल्या जात आहेत. काहींना डिमांडच मिळालेल्या नाहीत. कर न भरणा-यांना मालमत्ता जप्त करून लिलाव करण्याचे इशारे देणे सुरू आहे. तर दुसरीकडे कराची आकारणी कशी केली हे समजावून सांगण्यात यंत्रणेला रस नाही. कर विभागाला घरघर लागली आहे. यात भरडल्या जात असलेला सामान्य नागपूरकरही आता संतप्त होऊ लागला असून चुकीच्या पद्धतीने आकारलेला कर भरणारच नाही, जे होईल ते पाहिले जाईल, अशी आक्रमक भूमिका घेत आहे. ‘कर’ नहीं तो डर काहेका..! असे तो ठासून बोलू लागला आहे. शहराचा विकास हवा असेल तर कर भरणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. हे सर्वमान्यही आहे. मात्र, कोणत्याही कर प्रणालीत सुसूत्रता असली, पारदर्शकता असली की नागरिकांमध्येही विश्वास निर्माण होतो. खिशातून जाणारा एक-एक रुपया नेमका कशासाठी व कसा आकारण्यात आला याचा हिशेब पटला की लोक आनंदाने कर भरतात. या पारदर्शकतेमुळे महापालिकेची तिजोरी भरण्यासही मदत होते. मात्र, अविश्वास निर्माण झाला की अर्थचक्रच खोळंबते. तसाच काहीसा प्रकार महापालिकेच्या कर आकारणीत झाला आहे. महापालिकेने पाठविलेल्या मालमत्ता कराच्या डिमांड नागरिकांकडे पोहचताच अनेकांना धडकी भरली. गेल्या दोन वर्षांची टॅक्स डिमांडची तुलना केली असताना अनेकांना यावर्षी तिप्पट ते चौपट डिमांड पाठविण्यात आली आहे. काही भागात तर हा आकडा २० पटींपर्यंत पोहचला आहे. यामुळे नागरिकांमध्ये रोष वाढला आहे. महापालिकेने आक्षेप नोंदविण्यासाठी ३० डिसेंबरची मुदत दिली असली तरी सर्वच मालमत्ताधारक तक्र्रार करतातच असे नाही. त्यामुळे महापालिकेनेच डिमांड पाठविण्यापूर्वी मे. सायबरटेक सिस्टिम्स अ‍ॅन्ड सॉफ्टवेअर लि. कंपनीने सर्वेक्षणात केलेल्या त्रुटी दूर केल्या असत्या तर आज पुन्हा आकडेमोड करण्याची वेळ आली नसती. आज महापालिकेची तिजोरी रिकामी आहे. मालमत्ता कर हा उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. प्रशासकीय चुकांमुळे, नियोजनशून्यतेमुळे आता उत्पन्नाचा हा झराही आटण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कुठलीही शासकीय थकबाकी भरू नका, असे राजकीय आवाहन केल्यामुळे नागरिकांनाही बळ मिळाले आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका