शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

वन्यप्राण्यांबद्दल असहिष्णुता बाळगू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 01:22 IST

वाघासह सर्व वन्यप्राणी, पक्षी हे अन्नसाखळीतील महत्त्वाचे घटक आहेत. माणसाचे जीवन हे त्यांच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. वन्यप्राण्यांबद्दल जनमानसात प्रेम आणि जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने १ ते ७ आॅक्टोबर हा वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येत असतो

वाघासह सर्व वन्यप्राणी, पक्षी हे अन्नसाखळीतील महत्त्वाचे घटक आहेत. माणसाचे जीवन हे त्यांच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. वन्यप्राण्यांबद्दल जनमानसात प्रेम आणि जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने १ ते ७ आॅक्टोबर हा वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येत असतो. यानिमित्त राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए.के. मिश्रा यांच्याशी सविता देव हरकरे यांनी केलेली बातचीत.वन्यजीव सप्ताह हा केवळ उत्सव न राहता वन्यजीव संवर्धनात जास्तीतजास्त लोकांचा सहभाग वाढणे आवश्यक नाही का?वन्यजीव संवर्धनात लोकांचे योगदान महत्त्वाचे आहे. वन्यप्राणी म्हटले की केवळ वनविभागाची जबाबदारी असा बहुदा समज करून घेतला जातो. तो चुकीचा आहे. वन्यप्राणी ही फक्त वनविभागाची नाही तर देशाची संपत्ती आहे. परंतु अलीकडे वन्यप्राण्यांप्रती लोकांची असहिष्णुता वाढत चालली आहे. हे योग्य नाही. त्यांना धोका मानू नये. आपली संस्कृती मिळूनमिसळून प्रेमाने राहण्याची आहे. याचे भान सर्वांनीच ठेवले पाहिजे. प्राण्यांना सांभाळणारा देश म्हणून आपली ख्याती आहे.वाढता मानव-वन्यजीव संघर्ष कसा कमी करणार? नरभक्षक वाघांच्या बंदोबस्ताचे काय?हा संघर्ष वर्षोनुवर्षे चालत आला आहे. त्यावर नियंत्रणासाठी वन्यजीव विभागाकडून अल्पमुदतीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्याचे परिणामही समोर आले आहेत. काही वर्षांपूर्वी मानव-वन्यजीव संघर्षात वर्षाला ५० लोक मृत्युमुखी पडत असत आता हा आकडा २५-३० वर आला आहे. महाराष्टÑात आणि प्रामुख्याने विदर्भात जंगल आणि शेती एकत्रित असल्याने खरी अडचण येते. वाघ गुराढोरांच्या आकर्षणाने शेतात येतात. कारण हरणं आणि सांबरांपेक्षा त्यांची शिकार सोपी असते. मात्र माणसाला मारण्याचा त्यांचा उद्देश नसतो. अलीकडच्या काळात हल्ल्याच्या ज्या घटना घडल्या त्यातील वाघही नरभक्षक नाहीत. अशाप्रसंगी संयमाची गरज असते. तेव्हा टोकाची भूमिका कुणी घेऊ नये.जंगल कमी आणि वाघ वाढल्याने त्यांचे स्थलांतरण करणार हे खरे आहे काय?वन्यजीव व्यवस्थापनातील यशामुळे आपल्या येथे मागील चार वर्षात वाघांची संख्या दुप्पट म्हणजे १०४ वरून २१० झाली आहे. त्यांच्या अधिवासासाठी जंगले कमी पडतात. त्यामुळे व्याघ्र व्यवस्थापनांतर्गत त्यांच्या स्थलांतरणाचा (ट्रान्सलोकेशन) विचार सुरू आहे. परंतु ही एक शास्रोक्त आणि प्रदीर्घ प्रक्रिया आहे. कुठल्याही वाघाला कुठेही सोडता येत नाही. संपूर्ण अध्ययनाअंतीच त्याबाबत निर्णय घेतला जाईल.विकास प्रकल्पांमुळे जंगलांचा ºहास होत आहे. मग वाघांचे अधिवास कसे सुरक्षित राहणार?मानवी विकासाच्या दृष्टीने आवश्यक प्रकल्पांमध्ये थोडाबहुत समझोता करावा लागत असला तरी जंगल व त्याच्या बाहेरचे क्षेत्र तसेच कॉरिडोर व्यवस्थापन आदींच्या माध्यमाने वन्यप्राण्यांच्या हालचाली थांबू नयेत याची पूर्ण काळजी घेतली जाते.वन्यजीव संवर्धनापेक्षा पर्यटनालाच अधिक महत्त्व दिल्या जात आहे काय?वन पर्यटन हे वन्यजीव व्यवस्थापनाचे अस्त्र आहे. लोकांना जंगलात फिरता आले प्राण्यांचा सहवास लाभला की त्यांच्याबद्दल प्रेम आणि जागरूकता निर्माण होईल आणि प्राण्यांच्या शिकारी कमी होतील. शिवाय पर्यटनात योग्य संतुलन राखण्यात आले आहे.