शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

गुन्हेगार मुलांचे समर्थन का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 02:05 IST

विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच नागपूरला आलेले विष्णू कोकजे यांनी महिलांवरील वाढत्या अत्याचारांवर वक्तव्य केले.

विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच नागपूरला आलेले विष्णू कोकजे यांनी महिलांवरील वाढत्या अत्याचारांवर वक्तव्य केले. महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारी मुलांना घराबाहेर न काढता त्याला वाचविण्यासाठी कुटुंबीय धावपळ करतात. अशा मुलांचे समर्थनच का हवे, असा जळजळीत प्रश्न कोकजे यांनी उपस्थित केला. वर्तमान सामाजिक स्थिती लक्षात घेता, कोकजे यांचा हा मुद्दा विचारमंथन करायला भाग पाडणारा आहे. महिला अत्याचाराच्या घटना झाल्या की महिलांचे स्वातंत्र्य, पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण, कपडे घालण्याच्या पद्धती यासारख्या गोष्टींवर सर्वच विषयांचे अभ्यासक बनलेले ‘विशिष्ट’ तत्त्वचिंतक वृत्तवाहिन्यांवर बोंबलीच्या देठापासून आवाज काढत चर्चा करताना दिसतात. आजच्या युगातदेखील महिलांनी काय घालावे, काय घालू नये, याबाबत मतप्रदर्शन करण्यात अनेकांची आघाडी असते. मात्र या सामाजिक समस्येच्या मुळाशी जाण्याचा फारसा प्रयत्न होताना दिसत नाही. सामाजिक मर्यादा आणि कौटुंबिक संस्कार यांच्या सूत्राने मनुष्य बांधला गेला असतो व त्याचे पालन करणे ही जबाबदारी आहे, हेच लहानपणापासून मनावर बिंबविले जाते. एरवी समाजात मान वर करून चालणारे व महिला सक्षमीकरणावर मोठमोठी व्याख्यान देणाºया मंडळींच्या मुलांनीदेखील महिलांकडे वाकडी नजर ठेवल्याची उदाहरणे आहेत. अत्याचाºयाच्या बातम्या वाचून सामान्य घरांमध्येदेखील संताप व्यक्त करण्यात येतो. परंतु ‘आपल्या तो बाब्या, दुसºयाचे ते कार्ट’, अशी मानसकिता असलेले लोक स्वत:चा मुलगा महिलेला सन्मान देत नसेल तर त्याचे कान ओढायला पुढाकार घेत नाहीत. एखाद्या प्रकरणात मुलगा अडकला तर त्याला वाचविण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करतात. अशा एखाद्या मुलाला घरच्यांनीच बाहेरचा रस्ता दाखविल्याची उदाहरणे अपवादानेच दिसून येतात. मुलींच्या राहणीमानावर टीकाटिप्पणी करणारी मंडळी महिलांवर अत्याचार झाल्यानंतर मुलांचे संस्कार, त्यांचे नैतिक कर्तव्य, त्यांचे राहणीमान याबाबत फारशी चर्चा करताना दिसत नाही. आधुनिक समाजात महिलांना बरोबरीचा दर्जा व सन्मान मिळालाच पाहिजे. कायदे असले तरी जोपर्यंत कुटुंबातून योग्य संस्कार मिळत नाहीत, तोपर्यंत परस्त्री ही माता-भगिनी असते, ही भावनाच रुजू शकत नाही. समाजाने मुलांनादेखील प्रश्न विचारायला सुरुवात केली पाहिजे. वेळप्रसंगी ममत्व बाजूला सारून कठोर भूमिकादेखील घेतली पाहिजे. असे झाले तरच देशातील महिलांचे भविष्य सुरक्षित राहील व कोवळ्या कळ्या कुस्करल्या जाणार नाहीत, हे निश्चित.