शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगार मुलांचे समर्थन का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 02:05 IST

विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच नागपूरला आलेले विष्णू कोकजे यांनी महिलांवरील वाढत्या अत्याचारांवर वक्तव्य केले.

विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच नागपूरला आलेले विष्णू कोकजे यांनी महिलांवरील वाढत्या अत्याचारांवर वक्तव्य केले. महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारी मुलांना घराबाहेर न काढता त्याला वाचविण्यासाठी कुटुंबीय धावपळ करतात. अशा मुलांचे समर्थनच का हवे, असा जळजळीत प्रश्न कोकजे यांनी उपस्थित केला. वर्तमान सामाजिक स्थिती लक्षात घेता, कोकजे यांचा हा मुद्दा विचारमंथन करायला भाग पाडणारा आहे. महिला अत्याचाराच्या घटना झाल्या की महिलांचे स्वातंत्र्य, पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण, कपडे घालण्याच्या पद्धती यासारख्या गोष्टींवर सर्वच विषयांचे अभ्यासक बनलेले ‘विशिष्ट’ तत्त्वचिंतक वृत्तवाहिन्यांवर बोंबलीच्या देठापासून आवाज काढत चर्चा करताना दिसतात. आजच्या युगातदेखील महिलांनी काय घालावे, काय घालू नये, याबाबत मतप्रदर्शन करण्यात अनेकांची आघाडी असते. मात्र या सामाजिक समस्येच्या मुळाशी जाण्याचा फारसा प्रयत्न होताना दिसत नाही. सामाजिक मर्यादा आणि कौटुंबिक संस्कार यांच्या सूत्राने मनुष्य बांधला गेला असतो व त्याचे पालन करणे ही जबाबदारी आहे, हेच लहानपणापासून मनावर बिंबविले जाते. एरवी समाजात मान वर करून चालणारे व महिला सक्षमीकरणावर मोठमोठी व्याख्यान देणाºया मंडळींच्या मुलांनीदेखील महिलांकडे वाकडी नजर ठेवल्याची उदाहरणे आहेत. अत्याचाºयाच्या बातम्या वाचून सामान्य घरांमध्येदेखील संताप व्यक्त करण्यात येतो. परंतु ‘आपल्या तो बाब्या, दुसºयाचे ते कार्ट’, अशी मानसकिता असलेले लोक स्वत:चा मुलगा महिलेला सन्मान देत नसेल तर त्याचे कान ओढायला पुढाकार घेत नाहीत. एखाद्या प्रकरणात मुलगा अडकला तर त्याला वाचविण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करतात. अशा एखाद्या मुलाला घरच्यांनीच बाहेरचा रस्ता दाखविल्याची उदाहरणे अपवादानेच दिसून येतात. मुलींच्या राहणीमानावर टीकाटिप्पणी करणारी मंडळी महिलांवर अत्याचार झाल्यानंतर मुलांचे संस्कार, त्यांचे नैतिक कर्तव्य, त्यांचे राहणीमान याबाबत फारशी चर्चा करताना दिसत नाही. आधुनिक समाजात महिलांना बरोबरीचा दर्जा व सन्मान मिळालाच पाहिजे. कायदे असले तरी जोपर्यंत कुटुंबातून योग्य संस्कार मिळत नाहीत, तोपर्यंत परस्त्री ही माता-भगिनी असते, ही भावनाच रुजू शकत नाही. समाजाने मुलांनादेखील प्रश्न विचारायला सुरुवात केली पाहिजे. वेळप्रसंगी ममत्व बाजूला सारून कठोर भूमिकादेखील घेतली पाहिजे. असे झाले तरच देशातील महिलांचे भविष्य सुरक्षित राहील व कोवळ्या कळ्या कुस्करल्या जाणार नाहीत, हे निश्चित.